AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi: भारतातील परिस्थिती चांगली नाही, भाजपने सगळीकडे रॉकेल ओतलंय; राहुल गांधींची टीका

Rahul Gandhi: आमची भाजपसोबत वैचारिक लढाई सुरू आहे. ही एक राष्ट्रीय वैचारिक लढाई आहे. भाजप आणि संघ भारताला एक भूगोल म्हणून पाहत आहे.

Rahul Gandhi: भारतातील परिस्थिती चांगली नाही, भाजपने सगळीकडे रॉकेल ओतलंय; राहुल गांधींची टीका
भारतातील परिस्थिती चांगली नाही, भाजपने सगळीकडे रॉकेल ओतलंय; राहुल गांधींची टीकाImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 21, 2022 | 10:24 AM
Share

लंडन: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंब्रिज विद्यापीठातील आयडियाज फॉर इंडिया संमेलनात भाग घेतला. यावेळी त्यांनी भाजपवर (bjp) जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसला (congress) पूर्वीसारखा भारत निर्माण करायचा आहे. त्यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे. मात्र, आमचा आवाज दाबण्याचं काम भाजपकडून केलं जात आहे, असं सांगतानाच भारतातील परिस्थिती चांगली नाही. भाजपने चारही बाजूने रॉकेल ओतून ठेवलं आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. भाजप आणि संघ भारताला एक भूगोल म्हणून पाहत असल्याची टीकाही त्यांनी केली. तसेच चीनच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. या आयडियाज फॉर संमेलनात सीताराम येचुरी, सलमान खुर्शीद, तेजस्वी यादव, महुआ मोईत्रा आणि मनोज झा आदी विरोधी पक्षाचे नेतेही सहभागी झाले आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष असून त्यातून आम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याची कबुलीही राहुल गांधी यांनी दिली.

पूर्वीसारखाच भारत निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठीच आमचा संघर्ष सुरू आहे. भाजप लोकांचा आवाज दाबत आहे. तर आम्ही लोकांचा आवाज ऐकण्याचं काम करत आहोत. देशाने ज्या संस्था निर्माण केल्यात त्यावरच हल्ला केला जात आहे. त्यावर डीप स्टेटचा ताबा आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह

आमची भाजपसोबत वैचारिक लढाई सुरू आहे. ही एक राष्ट्रीय वैचारिक लढाई आहे. भाजप आणि संघ भारताला एक भूगोल म्हणून पाहत आहे. मात्र, काँग्रेससाठी भारत हा लोकांपासून तयार होतो, असं सांगतानाच अंतर्गत कलह, बंड, पक्षांतर आणि निवडणुकीतील पराभव आदी मुद्द्यांनी काँग्रेसला घेरलं आहे, अशी कबुलीही त्यांनी दिली.

ध्रुवीकरणामुळेच भाजप सत्तेत

भाजपच्या सत्ताकाळात रोजगार घटले आहेत. त्यानंतरही केवळ ध्रुवीकरणामुळे भाजप सत्तेत आहे. भारतात आज चांगली परिस्थिती नाही. भाजपने चोहोबाजूने रॉकेल ओतून ठेवलं आहे. जिथे वेगवेगळे विचार मांडले जाऊ शकतात. चर्चा होऊ शकते आणि संवाद साधला जाऊ शकतो, असा भारत आम्हाला निर्माण करायचा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

खासगी क्षेत्राचा एकाधिकार

एका कंपनीसाठीही सर्व विमानतळ, सर्व बंदरे, सर्व जुन्या गोष्टींना नियंत्रित करणं अधिक धोकादायक आहे. खासगी क्षेत्राचा एकाधिकार अशा प्रकारे कधीच अस्तित्वात आला नव्हता. सत्ता आणि भांडवलाचं केंद्रीकरणासह हे कधीच अस्तित्वात आलं नव्हतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.