India-China Relation | जयशंकर यांनी चीनला चांगलच झापलं, गलवानचा उल्लेख करुन काय म्हणाले?

| Updated on: Mar 08, 2024 | 9:22 AM

India-China Relation | जापानला गेलेले परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनला चांगलाच सुनावलय. परराष्ट्र संबंधांबद्दल विश्लेषण करताना त्यांनी काही मुद्दे मांडले.

India-China Relation | जयशंकर यांनी चीनला चांगलच झापलं, गलवानचा उल्लेख करुन काय म्हणाले?
s jaishankar
Follow us on

India-China Relation | परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सध्या जापान दौऱ्यावर आहेत. ते टोक्यो येथे एक थिंक टँक कार्यक्रम रायसीना गोलमेज सम्मेलनात सहभागी झाले होते. त्यावेळी जयशंकर यांनी चीनच्या नापाक कृत्यांचा उल्लेख केला. चीनने भारतासोबतच्या लिखित कराराच उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला. परराष्ट्र मंत्र्यांनी 2020 मध्ये सीमारेषेवर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षासाठी चीनला जबाबदार धरलं.

बदलत्या जागतिक व्यवस्थेवर जयशंकर यांनी विस्ताराने चर्चा केली. “हिंद-प्रशांत क्षेत्रात शक्ती परिवर्तन हे एक मोठ वास्तव आहे. जशी तुमची क्षमता आणि प्रभाव बदलतो, तसा महत्वाकांक्षांमध्ये सुद्धा बदल होतो. तुम्हाला काय आवडत? आणि काय नाही? हा मुद्दाच नाहीय. प्रत्येकाला वस्तुस्थितीचा सामना करावा लागेल” असं जयशंकर म्हणाले.

अनेक गोष्टींवर तुमची असहमती असू शकते, पण….

भारत-चीन संबंधांबद्दल बोलताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, “1975 ते 2020 पर्यंत 45 वर्षात सीमारेषेवर कुठलाही हिंसाचार झाला नाही. पण 2020 मध्ये सगळच बदललं” “अनेक गोष्टींवर तुमची असहमती असू शकते, पण जेव्हा कुठला देश शेजारी देशाबरोबरच्या लिखित कराराच पालन करत नाही, तेव्हा दोन्ही देशांचे संबंध, स्थिरतेबद्दल प्रश्न निर्माण होण स्वाभाविक आहे. प्रामाणिकपणे सांगायच झाल्यास हेतूबद्दल प्रश्न निर्माण होतो” असं जयशंकर म्हणाले.

भारताच चीनला जशास तस उत्तर

5 मे 2020 रोजी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये पँगॉग तळ्याजवळच्या क्षेत्रात हिंसक झडप झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये पूर्व लडाख सीमेवर तणाव निर्माण झाला. भारताने चीनला जशास तस उत्तर दिलं. त्यानंतर जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात भीषण संघर्ष झाला. दोन्ही देशांमधील संबंध बिघडले. अनेक दशकानंतर भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये असा हिंसक संघर्ष झाला होता. ड्रॅगच्या या कृतीवर भारताने स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की, “सीमावर्ती भागात शांतता स्थापित होणार नाही, तो पर्यंत दोन्ही देशांचे संबंध सामान्य होऊ शकत नाही”