AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंधन संपले, GPS बिघडले, भारतीय कार चालकाचा सौदीत मृत्यू, कार वाट चुकून थेट वाळवंटात…

रुबा अल-खली वाळवंट अत्यंत प्रतिकूल हवामानासाठी कुप्रसिद्ध आहे. येथे जो जातो तो परत येत नाही असे म्हटले जाते...पाणी आणि अन्नपाण्यावाचून तडफडून मृत्यू

इंधन संपले, GPS बिघडले, भारतीय कार चालकाचा सौदीत मृत्यू, कार वाट चुकून थेट वाळवंटात...
GPS glitches and car runs out fuel indian worker died in saudi
| Updated on: Aug 26, 2024 | 5:00 PM
Share

जीपीएस लोकेशनमुळे अनेकदा कार चालक वाट चुकल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. यापूर्वी दक्षिण भारतातील केरळात जीपीएस यंत्रणेवर विसंबल्याने कार चालक थेट नदीच्या पात्रात गेल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतू कारचे इंधन संपल्याने जीपीएस बंद पडले, त्यामुळे वाट चुकल्याने मृत्यू ओढल्याची घटना सौदी अरबमध्ये घडली आहे. सौदीत अरेबियातील राहणाऱ्या भारतीय तंत्रज्ञांचा कारचे इंधन संपल्याने GPS बंद पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा 27 वर्षीय भारतीय तंत्रज्ञ त्याच्या सहकाऱ्यासह एका कारमधून सौदीतील रुबा अल-खली वाळवंटात चुकल्याने दोघांचा देखील मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मूळचे तेलंगणातील करीमनगरात राहणारे शाहबाज खान हे सौदीत टॉवर टेक्निशियन म्हणून काम करीत होते. शाहबाज आणि त्यांचे सहकारी पाच दिवसांपूर्वी रुटीन एसाईमेंटसाठी कारने प्रवास करीत होते. त्यावेळी त्यांनी GPS ने त्यांच्या कारची दिशा भरकटवल्याने ते थेट रुबा अल-खली वाळवंटात गेले. तेथे त्यांच्या कारचे इंधन देखील संपल्याने त्यांच्यावर मोठा बाका प्रसंग ओढवला. त्यानंतर सौदी प्रशासनाला दोघाचे निपचित पडलेले मृतदेहच हाती लागले.

मोबाईलचे नेटवर्क बंद पडले

कारचे इंधन संपल्याने जीपीएस यंत्रणेचा वापर करता येत नसल्याने कारची दिशा चुकली आणि शाहबाज खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. जीपीएस शिवाय त्या दोघांना दिशा शोधणे जमले नाही. आणि त्याची कार सौदीतील रुबा अल-खली वाळवंटात अडकली.वाळवंटात त्यांच्या मोबाईलचे नेटवर्क देखील बंद पडले आणि वाळवंटातील प्रचंड तापमान आणि उष्णतेमुळे डिहायड्रेशन होऊन या दोघांचा मृत्यू झाला असावा असे म्हटले जाते.

 अत्यंत प्रतिकूल  वाळवंट

रुबा अल-खली वाळवंटाला एम्प्टी क्वार्टर देखील म्हटले जाते. चार देशांमध्ये पसरलेले हे वाळवंट अत्यंत प्रतिकूल परिस्थितीसाठी कुप्रसिद्ध आहे. वाळवंटात मानवी वस्ती, उंट आणि वन्यजीव नसल्याने हरवलेल्या प्रवाशांना मदत मिळणे किंवा भूप्रदेशात शोधणे जवळजवळ अशक्य असते. पाणी किंवा अन्न नसताना आणि कडक उन्हामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. शाहबाज आणि त्याच्या साथीदाराचा अशाप्रकारे मृत्यू ओढवल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Follow Us
स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ
Rahul Gandhi | स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या एका वक्तव्याने सभागृहात प्रचंड गदारोळ
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...