AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंधन संपले, GPS बिघडले, भारतीय कार चालकाचा सौदीत मृत्यू, कार वाट चुकून थेट वाळवंटात…

रुबा अल-खली वाळवंट अत्यंत प्रतिकूल हवामानासाठी कुप्रसिद्ध आहे. येथे जो जातो तो परत येत नाही असे म्हटले जाते...पाणी आणि अन्नपाण्यावाचून तडफडून मृत्यू

इंधन संपले, GPS बिघडले, भारतीय कार चालकाचा सौदीत मृत्यू, कार वाट चुकून थेट वाळवंटात...
GPS glitches and car runs out fuel indian worker died in saudi
| Updated on: Aug 26, 2024 | 5:00 PM
Share

जीपीएस लोकेशनमुळे अनेकदा कार चालक वाट चुकल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. यापूर्वी दक्षिण भारतातील केरळात जीपीएस यंत्रणेवर विसंबल्याने कार चालक थेट नदीच्या पात्रात गेल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतू कारचे इंधन संपल्याने जीपीएस बंद पडले, त्यामुळे वाट चुकल्याने मृत्यू ओढल्याची घटना सौदी अरबमध्ये घडली आहे. सौदीत अरेबियातील राहणाऱ्या भारतीय तंत्रज्ञांचा कारचे इंधन संपल्याने GPS बंद पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा 27 वर्षीय भारतीय तंत्रज्ञ त्याच्या सहकाऱ्यासह एका कारमधून सौदीतील रुबा अल-खली वाळवंटात चुकल्याने दोघांचा देखील मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मूळचे तेलंगणातील करीमनगरात राहणारे शाहबाज खान हे सौदीत टॉवर टेक्निशियन म्हणून काम करीत होते. शाहबाज आणि त्यांचे सहकारी पाच दिवसांपूर्वी रुटीन एसाईमेंटसाठी कारने प्रवास करीत होते. त्यावेळी त्यांनी GPS ने त्यांच्या कारची दिशा भरकटवल्याने ते थेट रुबा अल-खली वाळवंटात गेले. तेथे त्यांच्या कारचे इंधन देखील संपल्याने त्यांच्यावर मोठा बाका प्रसंग ओढवला. त्यानंतर सौदी प्रशासनाला दोघाचे निपचित पडलेले मृतदेहच हाती लागले.

मोबाईलचे नेटवर्क बंद पडले

कारचे इंधन संपल्याने जीपीएस यंत्रणेचा वापर करता येत नसल्याने कारची दिशा चुकली आणि शाहबाज खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. जीपीएस शिवाय त्या दोघांना दिशा शोधणे जमले नाही. आणि त्याची कार सौदीतील रुबा अल-खली वाळवंटात अडकली.वाळवंटात त्यांच्या मोबाईलचे नेटवर्क देखील बंद पडले आणि वाळवंटातील प्रचंड तापमान आणि उष्णतेमुळे डिहायड्रेशन होऊन या दोघांचा मृत्यू झाला असावा असे म्हटले जाते.

 अत्यंत प्रतिकूल  वाळवंट

रुबा अल-खली वाळवंटाला एम्प्टी क्वार्टर देखील म्हटले जाते. चार देशांमध्ये पसरलेले हे वाळवंट अत्यंत प्रतिकूल परिस्थितीसाठी कुप्रसिद्ध आहे. वाळवंटात मानवी वस्ती, उंट आणि वन्यजीव नसल्याने हरवलेल्या प्रवाशांना मदत मिळणे किंवा भूप्रदेशात शोधणे जवळजवळ अशक्य असते. पाणी किंवा अन्न नसताना आणि कडक उन्हामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. शाहबाज आणि त्याच्या साथीदाराचा अशाप्रकारे मृत्यू ओढवल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष