AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकार मला लष्कराबरोबर लढायला लावत आहे, मुर्खांनी देश काबीज केला; इम्रान खान यांचा हल्लाबोल

इम्रान खान यांनी सांगितले की, माझ्या अटकेनंतर पोलिसांनी शांततापूर्ण आंदोलकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये किमान 25 नागरिक ठार झाले आणि शेकडो जखमी झाले. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी.

सरकार मला लष्कराबरोबर लढायला लावत आहे, मुर्खांनी देश काबीज केला; इम्रान खान यांचा हल्लाबोल
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: May 19, 2023 | 7:21 AM
Share

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) प्रमुख इम्रान खान यांनी पुन्हा एकदा शहबाज शरीफ सरकारवर हल्लाबोल केला आहे. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफला संपवण्याचा सरकारचा डाव असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे. आता मला पुन्हा अटक करून तुरुंगात टाकले जाऊ शकते. त्यामुळे सरकार मला लष्कराशी लढायला लावत आहे, पण कोणीही स्वत:च्या सैन्याशी लढू शकत नसल्याचेही मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

माझ्या अटकेनंतर झालेल्या हिंसाचारात पोलिसांच्या गोळीबारात झालेल्या मृत्यूंची चौकशी व्हायला हवी, असंही इम्रान खान यांनी सांगितले.

या हिंसाचारात पीटीआयच्या 25 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. पोलीस त्यांना दहशतवादी म्हणत आहेत. जर ते दहशतवादी असतील तर पोलिसांनी त्यांची छायाचित्रे अद्याप का प्रसिद्ध केली नाहीत.

इम्रान खान यांनी ट्विट केले होते की, देशात गुन्हेगार आणि मूर्खांच्या गटाचे वर्चस्व आहे जे नैतिकता आणि मूल्ये पूर्णपणे विरहित आहेत.

अशा वेळी जेव्हा देश सर्वात वाईट आर्थिक संकट, इतिहासातील सर्वोच्च महागाई आणि वाढती बेरोजगारी यांच्याशी झुंजत आहे, तेव्हा सत्ताधारी पक्ष आपली सर्व शक्ती देशातील सर्वात मोठ्या आणि एकमेव संघीय पातळीवरील राजकीय पक्षासाठी वाहून घेतले आहे.

इम्रान खान यांनी ट्विट केले होते की, देशात गुन्हेगार आणि मूर्खांच्या गटाचे वर्चस्व आहे. जे नैतिकता आणि मूल्ये पूर्णपणे विरहित आहेत.

अशा वेळी जेव्हा देश सर्वात वाईट आर्थिक संकट, इतिहासातील सर्वोच्च महागाई आणि वाढती बेरोजगारी यांच्याशी झुंजत आहे, तेव्हा सत्ताधारी पक्ष आपली सर्व शक्ती देशातील सर्वात मोठ्या आणि एकमेव संघीय पातळीवरील राजकीय पक्षासाठी वाहून घेत आहे. खूप उशीर होण्यापूर्वी संपूर्ण देशाने याविरोधात आवाज उठवण्याची वेळ आली असल्याचेही सांगण्यात आले आहे.

इम्रान खान यांनी सांगितले की, माझ्या अटकेनंतर पोलिसांनी शांततापूर्ण आंदोलकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये किमान 25 नागरिक ठार झाले आणि शेकडो जखमी झाले. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी. फ्रान्समध्ये निदर्शने झाली. आंदोलक पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब फेकतानाही दिसले, परंतु पोलिसांनी कधीही प्रत्युत्तर दिले नाही.

Follow Us
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
राहुल गांधींच्या भूमिकेवर कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका