अजिबात सहन करणार नाही… भारताचा अत्यंत मोठा इशारा, 1.4 अब्ज भारतीय..

अमेरिका युद्धात भारताची भूमिका संयमाची राहिली. इराण आणि अमेरिका युद्धात जगाला फटका बसला. होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने तोंडचे पाणी पळाले. होर्मुज खाडीत अजूनही तणाव कायम आहे. भारताने नुकताच चांगलेच फटकारले आहे.

अजिबात सहन करणार नाही... भारताचा अत्यंत मोठा इशारा, 1.4 अब्ज भारतीय..
Ambassador Harish P
| Updated on: Apr 17, 2026 | 8:43 AM

भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. भारतासाठी होर्मुज खाडी अत्यंत महत्वाची आहे. भारताने होर्मुज खाडीतील जहाजांवरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. मध्य पूर्वेवरील संयुक्त राष्ट्रांच्या चर्चेदरम्यान भारताने तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. भारतीय राजदूतांनी म्हटले की, होर्मुज खाडीत भारतीय जहाजांना टार्गेट करून हल्ला करण्यात आला. होर्मुज खाडीतील स्थितीमुळे निष्पाप खलाशांचे प्राण धोक्यात आहेत. नौकानयनाच्या स्वातंत्र्यात अडथळा आणणे हे आम्ही मुळीत सहन करणार नाहीत. संयुक्त राष्ट्र महासभेत मध्य-पूर्वेतील परिस्थितीवर चर्चा झाली. यावेळी भारताचे प्रतिनिधी राजदूत हरीश पी यांनी चिंता व्यक्त केली. हरीश पी. यांनी म्हटले की, परिस्थिती कोणतीही असो पण जहाजांवरील हल्ले आम्ही अजिबात सहन करणार नाहीत.

हरीश यांनी पुढे म्हटले की, भारताच्या ऊर्जा आणि आर्थिक सुरक्षेसाठी होर्मुज खाडीतून व्यापारी जहाजांची सुरक्षित वाहतूक झाली पाहिजे. या संघर्षात जहाजांना टार्गेट करून हल्ले झाली, याचा आम्ही निषेध करतो. आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर केला पाहिजे. होर्मुज खाडी सुरक्षित लवकरात लवकर व्हावी, ही आमची तीव्र मागणी असल्याचेही त्यांनी म्हटले.

मुळात म्हणजे भारताने युद्धात सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आणि तणाव टाळण्याचे आवाहन केले. संवाद आणि राजनैतिकतेचा मार्ग अवलंबून मार्ग काढण्याचे आवाहन केले. भारताने या परिषदेमध्ये जाहीर भूमिका घेतली. कोणत्याही परिस्थितीमध्ये जहाजांवरील हल्ले सहन करणार नसल्याचे स्पष्ट सांगण्यात आले. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने संयुक्त कारवाई करत मोठा हल्ला इराणवर केला.

या हल्ल्यानंतर इराणने देखील ज्या ज्या देशात अमेरिकेने लष्करतळ आहेत, अशा ठिकाणी मोठा हल्ला केला. इराणने अमेरिकेने सळो की पळो करून सोडले. इराण आणि अमेरिका युद्धात फक्त तीन देशांचे नुकसान झाले नाही तर जागतिक बाजारपेठेत अस्थिर झाली. युद्धात अनेक देश होरपळले. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने अनेक देशात लॉकडाऊनही स्थिती निर्माण झाली. होर्मुज खाडी बंद असल्याने भारतातही परिणाम बघायला मिळाली.

Follow Us