लोकशाही जिंदाबाद! NCSL Summit मध्ये भारतीय आमदारांचा बुलंद आवाज, सर्वात मोठ्या प्रतिनिधीमंडळाची अमेरिकेत एकच चर्चा
Indian Delegation in NCSL Summit : भारतातील 24 राज्यांतील 130 हून अधिक आमदारांनी अमेरिकेत लोकशाही जिंदाबादचा नारा दिला. अमेरिकन लोकांना भारतीय जिवंत लोकशाहीचे दर्शन झाले. NCSL च्या शिखर संमेलनात विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आमदारांनी सहभाग नोंदवला.

अमेरिकेत लोकशाहीचा आवाज बुलंद झाला. अमेरिकेतील बोस्टन शहरात नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेटर्स (NCSL) पार पडली. त्यामध्ये भारतातील 24 राज्यातील 130 हून अधिक विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे आतापर्यंतचे हे सर्वात मोठे शिष्टमंडळ ठरले आहे. भारताच्या विविधतेत एकतेचे जगाने येथे दर्शन घेतले. भारतीय शिष्टमंडळाने येथील विविध कार्यक्रमात सहभाग घेतला. देशाचे प्रतिनिधीत्व केले.
NLC भारताचे संस्थापक डॉ. राहुल कराड यांनी अमेरिकेतील या लोकशाही बळकटी करण्याच्या प्रयत्नावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की हे केवळ शिष्टमंडळ नव्हते. तर भारतीय लोकशाहीची शक्ती आणि विविधतेतील एकतेचे जिवंत प्रतिक आहे. भारतातातील विविध राज्यातील कायदेमंडळातील हे प्रतिनिधी जगभरातील 7,000 हून अधिक प्रतिनिधींशी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता), आरोग्य, वाहतूक आणि जागतिक प्रशासन यासारख्या विषयांवर संवाद साधत आहेत. भारतीय लोकशाहीसाठी हे नवीन पर्व आणि अभिमानाचा क्षण आहे. भारताने विविध जागतिक मंचावर दहशतवादाविरोधातील आवाज मजबूत केला आहे. भारताने नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेटर्स समिटमध्ये पण दहशतवादाविरोधात ठोस भूमिका मांडली.

समिटमध्ये भारताचा दहशतवादाविरोधात आवाज
भारताने विविध जागतिक मंचावर दहशतवादाविरोधातील आवाज मजबूत केला आहे. भारताने नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेटर्स समिटमध्ये पण दहशतवादाविरोधात ठोस भूमिका मांडली. उत्तर प्रदेशमधील बांसगाव मतदारसंघातील भाजप आमदार विमलेश पासवान यांनी दहशतवादाविरोधात आवाज उठवला. गोळ्या आणि बंदुकीने दहशतवादाची भाषा सुरु होते. तर संवाद,सहअस्तित्व आणि धैर्याने मानवता समोर येते असे त्यांनी स्पष्ट केले.

जागतिक मंचावर भारताने दहशतवादाविरोधात आवाज उठवला. भारतीय जनता पक्षाच्या विधायकाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याविषयीची एक पोस्ट शेअर केली. त्यात अमेरिकेतील बोस्टन येथे आयोजित नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेटर्स (National Conference of State Legislatures) मध्ये जगाच्या सर्वात मोठ्या समस्येवर, दहशतवादावर भारताने आवाज उठवल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. भारतातील 24 राज्यातील 130 हून अधिक विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांनी या समिटमध्ये सहभाग नोंदवला.
