AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकशाही जिंदाबाद! NCSL Summit मध्ये भारतीय आमदारांचा बुलंद आवाज, सर्वात मोठ्या प्रतिनिधीमंडळाची अमेरिकेत एकच चर्चा

Indian Delegation in NCSL Summit : भारतातील 24 राज्यांतील 130 हून अधिक आमदारांनी अमेरिकेत लोकशाही जिंदाबादचा नारा दिला. अमेरिकन लोकांना भारतीय जिवंत लोकशाहीचे दर्शन झाले. NCSL च्या शिखर संमेलनात विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आमदारांनी सहभाग नोंदवला.

लोकशाही जिंदाबाद! NCSL Summit मध्ये भारतीय आमदारांचा बुलंद आवाज, सर्वात मोठ्या प्रतिनिधीमंडळाची अमेरिकेत एकच चर्चा
भारतीय आमदारांचा डंका
| Updated on: Aug 09, 2025 | 10:55 AM
Share

अमेरिकेत लोकशाहीचा आवाज बुलंद झाला. अमेरिकेतील बोस्टन शहरात नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेटर्स (NCSL) पार पडली. त्यामध्ये भारतातील 24 राज्यातील 130 हून अधिक विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे आतापर्यंतचे हे सर्वात मोठे शिष्टमंडळ ठरले आहे. भारताच्या विविधतेत एकतेचे जगाने येथे दर्शन घेतले. भारतीय शिष्टमंडळाने येथील विविध कार्यक्रमात सहभाग घेतला. देशाचे प्रतिनिधीत्व केले.

NLC भारताचे संस्थापक डॉ. राहुल कराड यांनी अमेरिकेतील या लोकशाही बळकटी करण्याच्या प्रयत्नावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की हे केवळ शिष्टमंडळ नव्हते. तर भारतीय लोकशाहीची शक्ती आणि विविधतेतील एकतेचे जिवंत प्रतिक आहे. भारतातातील विविध राज्यातील कायदेमंडळातील हे प्रतिनिधी जगभरातील 7,000 हून अधिक प्रतिनिधींशी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता), आरोग्य, वाहतूक आणि जागतिक प्रशासन यासारख्या विषयांवर संवाद साधत आहेत. भारतीय लोकशाहीसाठी हे नवीन पर्व आणि अभिमानाचा क्षण आहे. भारताने विविध जागतिक मंचावर दहशतवादाविरोधातील आवाज मजबूत केला आहे. भारताने नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेटर्स समिटमध्ये पण दहशतवादाविरोधात ठोस भूमिका मांडली.

Indian Delegation in NCSL Summit1

समिटमध्ये भारताचा दहशतवादाविरोधात आवाज

भारताने विविध जागतिक मंचावर दहशतवादाविरोधातील आवाज मजबूत केला आहे. भारताने नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेटर्स समिटमध्ये पण दहशतवादाविरोधात ठोस भूमिका मांडली. उत्तर प्रदेशमधील बांसगाव मतदारसंघातील भाजप आमदार विमलेश पासवान यांनी दहशतवादाविरोधात आवाज उठवला. गोळ्या आणि बंदुकीने दहशतवादाची भाषा सुरु होते. तर संवाद,सहअस्तित्व आणि धैर्याने मानवता समोर येते असे त्यांनी स्पष्ट केले.

जागतिक मंचावर भारताने दहशतवादाविरोधात आवाज उठवला. भारतीय जनता पक्षाच्या विधायकाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याविषयीची एक पोस्ट शेअर केली. त्यात अमेरिकेतील बोस्टन येथे आयोजित नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेटर्स (National Conference of State Legislatures) मध्ये जगाच्या सर्वात मोठ्या समस्येवर, दहशतवादावर भारताने आवाज उठवल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. भारतातील 24 राज्यातील 130 हून अधिक विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांनी या समिटमध्ये सहभाग नोंदवला.

आयुर्वेद क्षेत्रात 3 नवीन ऑल इंडिया आयुर्वेद इन्स्टिट्यूट स्थापन होणार
आयुर्वेद क्षेत्रात 3 नवीन ऑल इंडिया आयुर्वेद इन्स्टिट्यूट स्थापन होणार.
लाडक्या बहिणींना खुशखबर! सरकार महिलांसाठी 'SHE-MART' तयार करणार
लाडक्या बहिणींना खुशखबर! सरकार महिलांसाठी 'SHE-MART' तयार करणार.
बजेटमध्ये शेतकऱ्यांना काय? निर्मला सीतारमण यांनी केली मोठी घोषणा
बजेटमध्ये शेतकऱ्यांना काय? निर्मला सीतारमण यांनी केली मोठी घोषणा.
अर्थसंकल्प 2026–27: अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर केंद्र सरकारचा भर
अर्थसंकल्प 2026–27: अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर केंद्र सरकारचा भर.
प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी हॉस्टेल उभारणार! सीतारमण यांनी केली घोषणा
प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी हॉस्टेल उभारणार! सीतारमण यांनी केली घोषणा.
मधुमेह आणि कॅन्सरवरची औषधं स्वस्त करणार; सीतारमण यांची मोठी घोषणा
मधुमेह आणि कॅन्सरवरची औषधं स्वस्त करणार; सीतारमण यांची मोठी घोषणा.
मुंबई-पुणे हायस्पीड रेल कॉरिडॉर तयार करणार! सीतारमण यांची घोषणा
मुंबई-पुणे हायस्पीड रेल कॉरिडॉर तयार करणार! सीतारमण यांची घोषणा.
खादी, हँडलूम उत्पादनाच्या वाढीवर भर - निर्मला सीतारमण
खादी, हँडलूम उत्पादनाच्या वाढीवर भर - निर्मला सीतारमण.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात.
12 वर्षांपासून नियोजनबद्ध विकास सुरु; सीतारमण यांनी दिली माहिती
12 वर्षांपासून नियोजनबद्ध विकास सुरु; सीतारमण यांनी दिली माहिती.