AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताशिवाय कोणीच नाही, इराणने थोपटली भारताची पाठ, थेट केला मोठा दावा, त्यांच्याशिवाय..

इराण आणि अमेरिका युद्धात जग होरपळले आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. स्थिती गंभीर होत आहे. एका महिन्यापेक्षा अधिक काळ युद्धाला झाला. यादरम्यानच काही देश युद्ध थांबवण्याकरिता प्रयत्न करत आहेत. भारताचे नुकताच इराणकडून काैतुक करण्यात आले.

भारताशिवाय कोणीच नाही, इराणने थोपटली भारताची पाठ, थेट केला मोठा दावा, त्यांच्याशिवाय..
Iran and india
| Updated on: Apr 06, 2026 | 1:02 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने मोठा हल्ला इराणवर केला. त्यानंतर इराणकडून अमेरिकेच्या लष्कर तळांना टार्गेट करून हल्ले करण्यात आली. एक महिना युद्ध चालण्याचे संकेत होते. मात्र, एक महिना उलटूनही युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. इराणने या युद्धात होर्मुज खाडी बंद केली. होर्मुज खाडी बंद असल्याने जग जैरीस आले. तुर्की, इजिप्त आणि पाकिस्तान यांच्याकडून युद्ध थांबवण्याकरिता मध्यस्थी केली जात आहे. पण यश काही मिळत नाहीये. यादरम्यानच इराणकडून भारताचे काैतुक करण्यात आले. भारत युद्ध थांबवण्याची मागणी करत आहे. इराण आणि इस्त्रायल दोन्ही भारताचे मित्र आहेत. कोणत्याही पद्धतीने युद्ध अधिक भडकण्यापेक्षा युद्ध थांबण्याची भूमिका भारताची आहे.

इराणच्या सर्वाेच्च नेत्यांचे भारतातील प्रतिनिधी अब्दुल माजिक हकीम इलाही यांनी यादरम्यानच्या परिस्थितीवर बोलताना म्हटले की, या युद्धात भारत महत्वाची भूमिका बजावू शकतो. एएनआयच्या वृत्तानुसार, अब्दुल माजिक हकीम इलाही यांनी म्हटले, भारताची डिप्लोमेसी खूप जास्त चांगली आहे. विशेष म्हणजे हे विधान अशावेळी आहे, होर्मुज खाडी खुली करण्यासाठी इराणला वेळ देण्यात आला.

त्यांनी पुढे म्हटले की, भारत निश्चितपणे तणाव कमी करण्यात सकारात्मक भूमिका निभावू शकतो. आपल्या संतुलित परराष्ट्र धोरणामुळे भारत तणाव कमी करण्यास आणि संवादाला चालना देण्यास मदत करू शकतो, असेही त्यांनी म्हटले. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनीही एस. जयशंकर आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्यावर फोनवरून संवाद साधला.

इराणचे म्हणणे आहे की, अमेरिका आणि इस्त्रायल त्यांच्या पायाभूत सुविधा, हॉस्पिटल, शाळा, लोकवस्ती, कंपन्या, परमाणु केंद्रांना टार्गेट करून हल्ले करत आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात मागील काही तासापासून अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कोणत्याही स्थितीमध्ये युद्धबंदी व्हावी, ही जगाची इच्छा आहे. कारण सर्वजण युद्धात होरपळत आहेत. महागाई प्रचंड वाढली आणि कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ होत आहे.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?