AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या कारवाईच्या भीतीमुळे पाकिस्तानची झोप उडाली, ISI प्रमुख आसिम मलिक यांना बनवले NSA

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानमध्ये 2022 पासून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) पद रिक्त आहे. पाकिस्तानचे यापूर्वी एनएसए मोईद यूसुफ होते. त्यांच्या निवृत्तीनंतर हे पद गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त आहे. आता आसिम यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.

भारताच्या कारवाईच्या भीतीमुळे पाकिस्तानची झोप उडाली,  ISI प्रमुख आसिम मलिक यांना बनवले NSA
ISI प्रमुख आसिम मलिक
| Updated on: May 01, 2025 | 9:33 AM
Share

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानवर कारवाई करणार आहे. त्याचे पडसाद पाकिस्तानमध्ये चांगलेच उमटत आहे. पाकिस्तान सरकारने भारताच्या कारवाईची प्रचंड धास्ती घेतली आहे. भारताने पाकिस्तानी नेत्यांची झोप उडवली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरुनही पाकिस्तानला फटकारले जात आहे. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. आयएसआय चीफ आसिम मलिक यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनवण्यात आले आहे. आसिम यांना हा अतिरिक्त प्रभारी पदभार मिळाला आहे.

आसिम मलिक यांना मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात आयएसआय प्रमुख नियुक्त करण्यात आले होते. ‘द एक्सप्रेस ट्रीब्यून’ ने दिलेल्या बातमीनुसार आसिम मलिक यांना पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार करण्यात आले आहे. भारतासोबत वाढलेल्या तणावादरम्यान पाकिस्तानने मलिक यांना नवीन जबाबदारी दिली आहे. पाकिस्तानचे मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी भारत 24 ते 36 तासांत हल्ला करणार असल्याचे म्हटले होते.

2022 पासून एनएसए पद रिक्त

पाकिस्तानमध्ये 2022 पासून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) पद रिक्त आहे. पाकिस्तानचे यापूर्वी एनएसए मोईद यूसुफ होते. त्यांच्या निवृत्तीनंतर हे पद गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त आहे. आता आसिम यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. ते आयएसआय प्रमुखसोबत ही अतिरिक्त जबाबदारीसुद्धा सांभाळणार आहे.

भारताने एनएसए बोर्डात केले बदल

पाकिस्तानच्या पूर्वी भारताने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळात मोठे बदल केले. भारताने रॉ चे प्रमुख राहिलेले आलोक जोशी यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे चेअरमन बनवले आहे. या मंडळात सात सदस्य आहेत. त्यातमध्ये आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समधील निवृत्त अधिकारी आहेत.

पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने कठोर भूमिका घेतली. त्यामुळे भारत कधीही हल्ला करु शकतो, अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. त्यामुळे पाकिस्तानने अलीकडेच संयुक्त राष्ट्र आणि रशियाशी चर्चा केली.

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....