AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो एक निर्णय पाकिस्तानला पडतोय भारी; पाकने गुडघे टेकले, आमचं भारतासोबत बोलणं करून द्या, या देशाला शाहबाज शरीफ यांची विनंती

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे, पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं असे अनेक निर्णय घेतले ज्यामुळे पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत.

तो एक निर्णय पाकिस्तानला पडतोय भारी; पाकने गुडघे टेकले, आमचं भारतासोबत बोलणं करून द्या, या देशाला शाहबाज शरीफ यांची विनंती
| Updated on: Jun 25, 2025 | 7:30 PM
Share

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे, पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं असे अनेक निर्णय घेतले ज्यामुळे पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत. भारतानं पहलगाम हल्ल्यानंतर केलेली सर्वात मोठी पहिली कारवाई म्हणजे सिंधू जल वाटप कराराला दिलेली स्थगीती, त्यानंतर पाकिस्तानसोबतचा सर्व प्रकारचा व्यापार देखील बंद करण्यात आला, भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले, त्यानंतर भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला, भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त झाले, या एअर स्ट्राईकमध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले.

भारतानं सिंधू नदी जल वाटप कराराला स्थगिती दिल्यामुळे आता पाकिस्तान चांगलाच अडचणीत सापडला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अनेक देशांना विनंती केली आहे की, आमचं भारतासोबत बोलणं करू द्या, मात्र पाकव्यप्त काश्मीर आणि दहशतवाद हे दोन मुद्दे वगळता इतर कोणत्याही मुद्द्यांवर पाकिस्तानसोबत बोलणं होणार नसल्याची आक्रमक भूमिका भारतानं घेतली आहे.

पाकिस्तानकडून आतापर्यंत अनेक देशांना विनंती करण्यात आली आहे की, आमचं भारतासोबत बोलणं करू द्या म्हणून, आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सौदी अरेबियाला विनंती केली आहे, आमचं भारतासोबत बोलणं करून द्या असं पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सौदीला म्हटलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार शरीफ यांनी मंगळवारी सौदी अरेबियाचे प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांना फोन केला होता, यादरम्यान त्यांनी आमचं भारतासोबत बोलणं करून द्यावं अशी विनंती त्यांनी मोहम्मद बिन सलमान यांना केली आहे.

पाकिस्तानी रेडिओच्या वृत्तानुसार शहबाज शरीफ यांनी सौदी अरेबियाचे प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांना फोन केला होता, त्यावेळी त्यांनी आमचं बोलणं भारतासोबत करून द्या, अशी विनंती त्यांना केली. आम्ही पाकिस्तान, जम्मू -काश्मीर, पाणी, व्यापार आणि दहशतवाद अशा प्रत्येक विषयांवर भारतासोबत चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सौदी अरेबियाला सांगितल्याची माहिती समोर येत आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.