PAK AFG War : पाक विरुद्ध युद्ध , अफगाणिस्तानच्या माजी महिला खासदाराला भारतावर प्रचंड विश्वास, म्हणाल्या भारतचं यांची…

PAK AFG War : अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या युद्धा दरम्यान अजून भारताची भूमिका समोर आलेली नाही. पण सर्वसामान्य अफगाणि नागरिकाप्रमाणे तिथल्या माजी महिला खासदाराला भारताबद्दल प्रचंड विश्वास आहे. तिने एक मोठी मागणी केली आहे.

PAK AFG War : पाक विरुद्ध युद्ध , अफगाणिस्तानच्या माजी महिला खासदाराला भारतावर प्रचंड विश्वास, म्हणाल्या भारतचं यांची...
Ex Afghanistan MP Mariam Solaimankhil
Image Credit source: AP/PTI/ANI
| Updated on: Feb 28, 2026 | 11:43 AM

अफगाणिस्तान-पाकिस्तान युद्ध सुरु असताना अफगाणिस्तानच्या माजी खासदार मरियम सोलेमानखिल यांनी भारताकडे मोठी मागणी केली आहे. त्यांनी भारताबद्दल प्रचंड मोठा विश्वास व्यक्त केला आहे. मरियम सोलेमानखिल या सध्या विजनवासात आहेत. म्हणजे त्यांचं वास्तव्य अफगाणिस्तानात नाहीय. “पाकिस्तानचा अनेक दशकांपासून दहशतवादाला असलेला पाठिंबा तसच त्यांच्या धोकादाय अणवस्त्रांबाबत भारताने आता निर्णायक भूमिका घ्यावी” अशी सोलेमानखिल यांनी मागणी केली आहे. “आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या कारवाया उघड करुन त्यांच्यावर जागतिक निर्बंध आणण्यास भारत सक्षम आहे” असा विश्वास मरियम सोलेमानखिल यांनी व्यक्त केला.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सोलेमानखिल यांनी आपल्या या भावना व्यक्त केल्या. सध्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये जोरदार लढाई सुरु आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तावर रविवारी एअर स्ट्राइक केला. त्यानंतर गुरुवारी रात्री अफगाणि फौजांनी डुरंड लाईनवरील पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्या. त्यांच्या 55 सैनिकांना मारलं. मग, पाकिस्तानने त्याच रात्री अफगाणिस्तानात एअर स्ट्राइक केला. काल सकाळी अफगाणि एअरफोर्सने पाकिस्तानवर एअर स्ट्राइक करुन या कारवाईचा बदला घेतला

आणि भारत हे करण्यास सक्षम

पाकिस्तानच्या दहशतवाला पुरस्कृत करण्याच्या धोरणामुळे लाखो लोकांच्या आयुष्यावर जो परिणाम झालाय, त्यासाठी भारत त्यांना जबाबदार ठरवून उत्तर मागू शकतो. हुकूमशाही पद्धतीने तिथे जो कारभार चाललाय त्यावर सुद्धा मरियम सोलेमानखिल यांनी टीका केली. “पाकिस्तानकडे अणवस्त्र असल्याने ते खूप धोकादायक आहेत हे भारताने आंतरराष्ट्रीय समुदायासमोर आणलं पाहिजे. जो देश ओसामा बिन लादेनला आश्रय देतो, अनेक दहशतवादी संघटना बनवतो आणि आम्हीच ही घाणेरडी काम केली, याची कबुली देतो आणि तरी त्यांच्याकडे अणवस्त्र आहेत? त्यांच्यावर निर्बंध आणले पाहिजेत. त्यांना जबाबदार धरलं पाहिजे. लगेचच त्यांची अणवस्त्र संपवली पाहिजेत आणि भारत हे करण्यास सक्षम आहे” असा विश्वास मरियम सोलेमानखिल यांनी व्यक्त केला.


भारताची भूमिका काय?

आम्हीच दहशतवादाचे पीडित आहोत या पाकिस्तानी दाव्यावर त्यांनी जोरदार टीका केली. “पाकिस्तानची लष्करी हुकूमशाही आणि रावळपिंडीमध्ये बसलेले जनरल्स हे यु्द्धामधून बिझनेस करतात” असा आरोप सोलेमानखिल यांनी केला. सध्या अफगाणिस्तान-पाकिस्तानमध्ये सुद्धा असलेल्या युद्धावर भारताचं बारीक लक्ष आहे. भारताची भूमिका अजून समोर आलेली नाही.

Follow Us