AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sri Lanka Crisis : श्रीलंकेत अराजक..! आर्थिक संकटात सापडल्यानं इतिहासातली सर्वाधिक वाईट अवस्था, ‘हे’ पाच घटक जबाबदार; जाणून घ्या…

सध्या श्रीलंकेची सर्वात वाईट आर्थिक स्थिती आहे. महागाईमुळे (Inflation) जीवनावश्यक गोष्टींचे भाव गगनाला भिडले आहेत. तसेच बेरोजगारीही शिगेला पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेतील नागरिकांमध्ये सध्या प्रचंड नाराजी आहे,

Sri Lanka Crisis : श्रीलंकेत अराजक..! आर्थिक संकटात सापडल्यानं इतिहासातली सर्वाधिक वाईट अवस्था, 'हे' पाच घटक जबाबदार; जाणून घ्या...
श्रीलंकेतील नागरिकांचं आंदोलनImage Credit source: Twitter
| Updated on: Jul 14, 2022 | 7:30 AM
Share

Sri Lanka Crisis : श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र सध्या ते काळजीवाहू पंतप्रधान आहेत. राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी राजीनामा देण्यापूर्वीच श्रीलंकेतून पलायन केले. ते आपली पत्नी आणि दोन सुरक्षारक्षकांसह मालदीवमध्ये गेले आहेत. श्रीलंकेच्या घटनेनुसार, राष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यास, पंतप्रधान कार्यवाहक राष्ट्रपती बनतात. दरम्यान, विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे. राजधानी कोलंबोमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण असून तेथे आणीबाणी लागू करण्यात आली आहे. सध्या श्रीलंकेची सर्वात वाईट आर्थिक स्थिती आहे. महागाईमुळे (Inflation) जीवनावश्यक गोष्टींचे भाव गगनाला भिडले आहेत. तसेच बेरोजगारीही शिगेला पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेतील नागरिकांमध्ये सध्या प्रचंड नाराजी आहे, लोक रस्त्यावर उतरून तीव्र निषेध करत आहेत. ही परिस्थिती निर्माण होण्याची कारण काय आहेत, याबद्दल तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या, श्रीलंकेची दुरवस्था का झाली…

  1. परदेशी कर्ज – श्रीलंकेतील संकटाचे सर्वात मोठे कारण म्हणजे परदेशातून आलेले कर्ज. श्रीलंकेने चीनसारख्या देशांकडून कर्जाच्या स्वरूपात मोठी रक्कम घेतली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीलंकेत अनावश्यक पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी कर्जाचा बोजा वाढला आहे. श्रीलंकेवर सध्या 51 अब्ज डॉलरचे विदेशी कर्ज आहे आणि ते देशाच्या गळ्याला फास बनला आहे.
  2. परकीय चलनाचा साठ्याची कमतरता – देशातील परकीय चलनाच्या साठ्यातही लक्षणीय घट झाली आहे. अहवालानुसार, मार्चमध्ये श्रीलंकेचा परकीय चलन साठा 16.1 टक्क्यांनी घसरून $1.93 अब्ज झाला आहे आणि कर्जाच्या पेमेंटमध्ये प्रचंड घट झाली आहे.
  3. कोरोना महामारी – टीकाकारांवर विश्वास ठेवायचा असेल तर या परिस्थितीमागे कोविड-19 जबाबदार आहे. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा असलेल्या पर्यटन क्षेत्रावर कोविडचा मोठा परिणाम झाला. श्रीलंकेत पर्यटनासाठी मोठ्या संख्येने परदेशी लोक येतात, मात्र कोरोना महामारीमुळे त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून परकीय चलनात मोठी घट झाली आहे. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, 2018मध्ये श्रीलंकेने पर्यटनातून 4.4 अब्ज आणि GDPमध्ये 5.6% योगदान दिले, परंतु 2020मध्ये ते 0.8% इतके कमी झाले.
  4. कर कपात – परकीय कर्ज आणि कोरोना महामारीशिवाय सरकारची चुकीची धोरणेही कारणीभूत आहेत. राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांच्या नेतृत्वाखालील श्रीलंकन ​​सरकारने मोठ्या कर कपात केली, ज्यामुळे सरकारी महसूल आणि वित्तीय धोरणांवर परिणाम झाला आणि बजेट तूट वाढली. सरकारच्या या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. या संकटासाठी टीकाकार सरकारच्या या निर्णयाला जबाबदार धरतात.
  5. आयातीवर सरकारी बंदी – कर कपातीशिवाय अनेक गोष्टींच्या आयातीवर सरकारने बंदी घातली होती. त्यापैकी मुख्य म्हणजे रासायनिक अन्न, ज्याचा पिकांवर मोठा परिणाम झाला. त्याचवेळी, श्रीलंकन ​​जनतेला परदेशातून खाण्यापिण्याच्या वस्तू आणाव्या लागल्या, हे देशातील महागाईचे सर्वात मोठे कारण बनले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.