भारताचा नाही चीनचा अधिकार, पाकिस्तानच्या दाव्याने सरकली थेट पायाखालची जमीन, मोठी खळबळ, थेट..

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून संबंध ताणले गेले आहेत. त्यामध्येच धक्कादायक माहिती पुढे येतंय. जल सिंधू कराराच्या मुद्द्यात पाकिस्तानने आता थेट चीनला ओढले आहे. त्यांनी धक्कादायक विधान सिंधू नदीच्या पाण्याबद्दल केले.

भारताचा नाही चीनचा अधिकार,  पाकिस्तानच्या दाव्याने सरकली थेट पायाखालची जमीन, मोठी खळबळ, थेट..
PIndus River Waters
| Updated on: Jul 03, 2026 | 11:38 AM

भारताने सिंधू जल कराराला स्थगिती देत पाकिस्तानला भीकेला लावले. पाकिस्तान आज पाण्यासाठी मोतल आहे. पाण्यासाठी त्यांना भीक मागावी लागत आहे. मात्र, पाकिस्तानकडून मोठा डाव रचण्यात आला. मात्र, पाकिस्तानच्या या डावाला चीननेही भीक घातली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तान सिंधू जल कराराचा फायदा घेत आहे. भारतानेही अनेक दशक कोणताही विचार न करता पाकिस्तानला पाणी दिले. मात्र, पहलगामध्ये पाकिस्तानने ज्या पद्धतीने भारतातील पर्यटकांवर हल्ला केला त्यानंतर पाकिस्तानमध्ये माणूसकी राहिली नसल्याचे स्पष्ट झाले आणि भारताने मोठा निर्णय घेत सिंधू जल करार पहिल्या दणका स्थगित केला. जागतिक मंचावर याविरोधात अनेकदा पाकिस्तानने भारताविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाकिस्तानला कोणीही भीक घातली नाही.

सिंधू नदीच्या पाण्याचे मुख्य स्रोत भारताच्या ताब्यात आहेत. भारताने पाकिस्तानमध्ये जाणारे पूर्ण पाणी रोखले आहे. यात आता पाकिस्तानने चीनला ओढले आहे. सिंधू नदीच्या पाण्यावर फक्त भारताचाच नाही तर पाकिस्तानसोबतच चीनचाही अधिकार असल्याचे पाकिस्तानने म्हटले. भारतावरील दबाव वाढण्यासाठी त्यांनी यात चीनला घेतले. मात्र, चीनला या गोष्टींमध्ये पडायचे नाही.

काही वर्षांच्या विचार करता सध्याच्या घडीला भारत आणि चीनचे संबंध ठीक आहे. त्यामुळे पाकिस्तानने कितीही कीहीही केले तरीही या वादात चीन अजिबातच पडणार नाही. पाकिस्तानसाठी सिंधू नदीचे पाणी खूप जास्त महत्वाचे आहे. पिण्याचे पाणी, जल स्तर आणि सर्वात महत्वाचे शेती याच पाण्यावर अवलंबून आहे. जर भारताने या करारांतर्गत मिळालेल्या अधिकारांचा पूर्णपणे वापर केला किंवा आपल्या प्रकल्पांचा वेग वाढवला, तर भविष्यात पाकिस्तानची वाट लागेल.

जल सिंधू कराराबाबत भारताची भूमिक अगदी स्पष्ट आहे. पाकिस्तान आमच्या देशात मोठ्या लष्करी कारवाई घडवतो, यासोबतच आमच्या लोकांचे जीव घेतो मग आम्ही मानवतेचा विचार करून पाकिस्तानला पाणी नक्की काय द्यावे? यासोबतच सिंधू नदीचे पाणी इतरत्र वळवण्यासाठी भारताचे मोठे प्लॅनिंग आहे. त्याबाबत कोट्यावधी प्रकल्पासाठी सरकारने जाहीर केले असून त्याचे कामही सुरू आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us