AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युक्रेनमधील भारतीयांसाठी आम्ही 24 तास बांधिल; दूतावासकडून भारतीय नागरिकांना आवाहन

रशियाकडून क्षेपणास्त्रांचा हल्ला होत असल्याने त्या युक्रेनमधील हवाई मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होताना स्वतःसह बरोबर असलेल्या भारतीयांना सुरक्षित ठेवा असे आवाहन करण्यात आले आहे.

युक्रेनमधील भारतीयांसाठी आम्ही 24 तास बांधिल; दूतावासकडून भारतीय नागरिकांना आवाहन
Partha SatpathyImage Credit source: ANI
| Edited By: | Updated on: Feb 24, 2022 | 10:23 PM
Share

मुंबईः रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा (Missile) मारा केल्यानंतर युक्रेनमधील (Ukraine) जनजीवन विस्कळीत झाले आहे. स्थानीक नागरिकांसह त्या ठिकाणी असलेल्या स्थलांरीत नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. युक्रेनमध्ये अनेक देशातील नागरिक, विद्यार्थी आणि महिला तिथे जाऊन राहिल्या आहेत. सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्याने भारतीय दूतावासचे राजदूत पार्थो सँटपँथी यांनी युक्रेनमधील भारतीयांना (Indian Citizens) सुरक्षित ठिकाणी राहण्याचे थांबण्याचे आवाहन केले आहे. हे आवाहन करत असताना त्यांनी सांगितले आहे की, युद्ध काळात तुम्ही तुमचा धीर खचू देऊ नका, भारतीय दूतावास तुमच्या सेवेसाठी आणि मदतीसाठी 24 तास बांधिल आहे असेही त्यांनी सांगितले आहे.

युक्रेनची राजधानी कीवसह परिसरातील अनेक शहरांवर रशियाने हल्ला केला आहे. त्यामुळे युक्रेनमधील सर्व जनजीवन आणि नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधा विस्कळीत झाल्या आहेत. युक्रेनमधील विमानतळे, रेल्वे आणि महामार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे स्थलांतरित होऊन आलेल्या नागरिकांचा राहण्याचा आणि त्यांच्या जगण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. म्हणून भारतीय दूतावासचे राजदूत पार्थो सँटपँथी यांनी सुरक्षिततेची काळजी घ्या असा संदेश नागरिकांना दिला आहे.

वाहनव्यवस्था कोलमडली

रशियाकडून क्षेपणास्त्रांचा हल्ला होत असल्याने त्या युक्रेनमधील हवाई मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होताना स्वतःसह बरोबर असलेल्या भारतीयांना सुरक्षित ठेवा असे आवाहन करण्यात आले आहे. रशियाच्या भूमिकेमुळे वाहनव्यवस्था कोलमडली आहे, त्यामुळे भारतीयांना स्थलांतरित होताना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भारतीयांनी सुरक्षित स्थळी जात असताना स्वतःची काळजी घेऊन आपल्या मित्र परिवारांकडे स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या स्थलांतर करत असताना तुम्हाला काही अडचणी जाणवत असतील तर भारतीय दूतावासला संपर्क करा असेही आवाहन या विभागाने केले आहे.

भारतीय दूतावासकडे पोहचू शकता

युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांची राहण्याची व्यवस्था होत नसेल तर ओळखीच्या भारतीयांकडे थांबण्यास सांगितले आहे, तसेच युक्रेनमध्ये असणाऱ्या भारतीय मित्र परिवाराचा आसरा घ्या असेही सांगण्यात आले आहे. सुरक्षित स्थळी पोहचण्याचे आवाहन जरी करण्यात आले असले तरी युक्रेनमधील भारतीयांच्या सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता असल्याचे भारतीय दूतावासकडून सांगण्यात आले आहे, तसेच तुम्ही जर भारतीय दूतावासकडे सुरक्षितपणे पोहचू शकत असाल तर तिकडे पोहचण्याचा प्रयत्न करा असेही आवाहन करण्यात आले आहे. तसेच भारतयी नागरिकांनी या युद्धकाळात धीर ठेवण्याबरोबरच आम्ही तुमच्या मदतीसाठी 24 तास बांधिल आहोत असेही सांगण्या आहे.

संबंधित बातम्या

रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत 160 अब्ज पौंड संपत्तीचे मालक; अलिशान कारची संख्या ऐकून थक्क व्हाल

Russia Ukraine War Live Video: यूक्रेनला बेचिराख करणारी रशियन विमानांचे हल्ले पाहिलात? धमाके, दहशत आणि युद्ध

Russia Ukraine Crisis : जगाला अणु युद्धाचा धोका! रशियाच्या यूक्रेनवरील हल्ल्यातनंतर माजी NATO चीफ यांचा इशारा

Follow Us
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.