AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुबईला जाणाऱ्या भारतीयांचा व्हिसा का होतोय कॅन्सल? प्रवाशांना आर्थिक फटका

दुबईला मोठ्या प्रमाणात भारतीय फिरायला जात असतात. दुबईला जगातील सर्वाधिक पर्यटक भेट देतात. ज्यामध्ये भारतीयांची संख्या अधिक आहे. पण दुबईला जाणाऱ्या भारतीयांना व्हिसा मिळणे आता कठीण झाले आहे. कारण व्हिसा नाकारण्याचं प्रमाण वाढलं आहे. काय आहे या मागचं कारण जाणून घ्या.

दुबईला जाणाऱ्या भारतीयांचा व्हिसा का होतोय कॅन्सल? प्रवाशांना आर्थिक फटका
| Updated on: Dec 11, 2024 | 3:51 PM
Share

दुबईला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण दुबईला जाणाऱ्या लोकांचा व्हिसा नाकारण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ज्या भारतीयांना दुबईला जायचे आहे त्यांनी आधी व्हिसा कन्फर्म झाल्यानंतरच पुढचं नियोजन करणं चांगलं ठरेल. अन्यथा तुम्हामा मोठा आर्थिक फटका बसू शकतो. दुबईसाठी भारतीयांचा व्हिसा नाकारण्याचे प्रमाण वाढले आहे. याचे कारण दुबईने नवीन व्हिसा नियम जारी केले आहे. दुबईला जाण्यासाठी आता या कडक नियमांचं पालन करावे लागणार आहे. कागदपत्रे आणि आर्थिक आवश्यकतांमुळे छाननी वाढली आहे. त्यामुळे व्हिसा नाकारण्याचे प्रमाणही वाढलंय. दुबईसाठी प्रत्येक 100 व्हिसा अर्जांमागे पाच ते सहा अर्ज नाकारले जात आहेत.

दुबईकडून नवीन नियम लागू

UAE ने व्हिसाचा गैरवापर टाळण्यासाठी नियमात बदल केले आहेत. इमिग्रेशन कायद्यांचे पालन करावा म्हणून हे बदल करण्यात आले आहेत. या नियमांनुसार, अर्जदाराना आता ते जेथे थांबणार आहेत त्याचा पत्ता, रिटर्न तिकीट आणि बँक बॅलन्स यांची संपूर्ण माहिती कागदपत्रांसह सादर करावी लागणार आहेत. जे मित्र किंवा नातेवाईकांकडे जाणार आहेत त्यांना त्यांच्या होस्टकडून अतिरिक्त कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. जसे की भाडे करार, UAE ID आणि निवास व्हिसा. त्यामुळे भारतीय प्रवाशांना आता दुबईला जाताना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बँक खात्यात किती रक्कम असावी

दुबईसाठी जर तुम्हाला व्हिसा हवा असेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्यात किती पैसे आहेत याची देखील माहिती द्यावी लागणार आहे. नव्या नियमानुसार किमान रक्कम किती असावी याबाबत देखील मर्यादा ठेवण्यात आली आहे. तुम्ही दुबईला किती दिवस राहणार आहेत यावरुन ती रक्कम ठरवली जाणार आहे. जर तुम्ही दोन महिन्यांसाठी दुबईला जाणार आहात तर तुमच्या खात्यात 5,000 दिरहम आणि तीन महिन्यांसाठी जाणार आहात तर तुमच्या खात्यात 3,000 दिरहम आवश्यक आहेत.

प्रवाशांचे आर्थिक नुकसान

अनेक प्रकरणात सर्व कागदपत्र असताना देखील व्हिसा नाकारला गेल्याची तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे भारतीय प्रवाशांचे आणि ट्रॅव्हल एजंटचेही नुकसान होत आहे. ट्रॅव्हल एजंट्सने माहिती दिली आहे की, व्हिसा नाकारण्याचं प्रमाण अचानक वाढलं आहे. त्यामुळे केवळ व्हिसा शुल्कच नाही तर आधीच बुक केलेली विमान तिकिटे आणि हॉटेल बुकिंगचे पैसेही बुडत आहेत.

नवीन नियमांच्या आधी दुबई व्हिसा नाकारण्याचे प्रमाण केवळ एक ते दोन टक्के होते. पण नवीन नियम लागू झाल्यापासून दररोज 100 अर्जांपैकी किमान 5-6 व्हिसा नाकारले जात आहेत.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.