AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माणूस किती अंश तापमान सहन करू शकतो?, एवढे तापमान झाले की निघतो घाम

जगातील कोट्यवधी लोकं जागतिक तापमान वाढीच्या समस्येशी लढत आहेत. जगातील शास्त्रज्ञ आणि हवामान विभागाचे अधिकारी चिंताग्रस्त झाले आहेत.

माणूस किती अंश तापमान सहन करू शकतो?, एवढे तापमान झाले की निघतो घाम
| Updated on: Aug 05, 2023 | 4:57 PM
Share

जागतिक तापमान वाढ होत आहे. अख्ख जग तापमान वाढीच्या विषयावर गंभीर आहे. यातून सुटका करण्यासाठी वेगवेगळे उपाय सुचवले जात आहेत. पण, दरवर्षी तापमानात वाढ होत आहे. तापमान वाढीचे रेकॉर्ड होत आहेत. यामुळे शास्त्रत्र चिंता करत आहेत. युरोप, आशिया, उत्तर अमेरिकेत तापमान रेकॉर्ड तोडत आहे. जगातील कोट्यवधी लोकं जागतिक तापमान वाढीच्या समस्येशी लढत आहेत. जगातील शास्त्रज्ञ आणि हवामान विभागाचे अधिकारी चिंताग्रस्त झाले आहेत. या तापमान वाढीचा सामना कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. आपण उन्हाळ्यात खूप तापमान असल्याचं म्हणतो. किती तापमान मानवासाठी योग्य असते. यावर शास्त्रज्ञांचे काय म्हणणं आहे, हे आपण पाहणार आहोत.

आद्रतेचा तापमानावर परिणाम

वयस्क तसेच युवकांना दैनंदिनीत किती तापमान हवे, यावर शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. पेन स्टेटचे शास्त्रज्ञ म्हणतात, फक्त तापमानचं नव्हे, तर आद्रताही त्यावर परिणाम करते. आद्रतेचा परिणाम तापमानावर होतो.

तापमान वाढ तोडते रेकॉर्ड

आद्रता आणि तापमान हे दोन्ही घटक मानवासाठी धोकादायक ठरत आहेत. यावर शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. दरवर्षी तापमान वाढ रेकॉर्ड तोडत आहे. यामुळे शास्त्रज्ञ चिंताग्रस्त झाले आहेत. तापमान वाढीसोबत आद्रताही वाढत आहे.

एवढे तापमान असते सुरक्षित

तापमानाबाबत २०१० ला एक जर्नल प्रकाशित करण्यात आलं. त्या अध्ययनानुसार ३५ डिग्री तापमान मानवासाठी योग्य असतो. त्यापेक्षा जास्त तापमान झाल्यास गर्मी होते. शरीरातून घाम निघू लागतो. म्हणून पंख्याची किंवा कुलरची गरज पडते.

का वाढते तापमान

रस्ते सिमेंटचे होत आहेत. सिमेंट हे डेड सेल्स आहेत. त्यामुळे तापमान वाढ होते. वाहनांची संख्या वाढत आहे. या वाहनांमधून धूर निघतो. यामुळेसुद्धा तापमान वाढ होते. शिवाय वेगवेगळ्या कारणांनी वृक्षांची कत्तल केली जाते. पण, त्या प्रमाणात झाडं लावून जगवली जात नाही. त्यामुळे देशात तापमान वाढ होत आहे. जगातील बहुतेक देश हे तापमान वाढीच्या समस्येने त्रस्त आहेत.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.