AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय रेल्वेला 4G स्पेक्ट्रम वापरण्यास मिळणार, रेल्वेवर त्याचा काय परिणाम होणार?

केंद्रीय माहिती आणि प्रसारण प्रकाश जावडेकर यांनी केंद्र सरकारनं 4G स्प्रेक्ट्रम रेल्वेला वापरण्यास परवानगी दिली आहे, अशी माहिती दिली. (Indian Railway 4G spectrum)

भारतीय रेल्वेला 4G स्पेक्ट्रम वापरण्यास मिळणार, रेल्वेवर त्याचा काय परिणाम होणार?
भारतीय रेल्वे
| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 5:54 PM
Share

नवी दिल्ली: केंद्रीय माहिती आणि प्रसारण प्रकाश जावडेकर यांनी केंद्र सरकारनं 4G स्प्रेक्ट्रम रेल्वेला वापरण्यास परवानगी दिली आहे, अशी माहिती दिली. आतापर्यंत रेल्वे संदेशवहनासाठी 2G स्पेक्ट्रम वापरत होते. आता रेल्वेला 700 मेगा हर्टझ बँड दिला जाईल. रेल्वेला या निर्णयाचा फायदा होईल आणि सुरक्षा यावर फरक पडेल, असं सांगण्यात आलं आहे.( Government of India gave permission for 4G spectrum use for railway signal system)

अत्याधुनिक स्पेक्ट्रमच्या वापरामुळं रियल टाईम कम्युनिकेशन होणार आहे. ऑटोमेटिक ट्रेन प्रोटेक्शन व्यवस्थेमुळे रेल्वे व्यवस्था मजबूत होणार आहे. रेल्वेला 4G स्पेक्ट्रम संदेशवहन प्रणाली विकसित करण्यासाठी 25 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हे काम येत्या 5 वर्षात पूर्ण होईल.

दोन ट्रेन समोरासमोर येणार नाहीत

4G तंत्रज्ञानावर आधारित ऑटोमेटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टीम वापरात येतईल. एटीपी सिस्टीमद्वारे रेल्वेचे होणारे अपघात टाळता येतात. कारण यामध्ये ट्रेन चालकाला अगोदर माहिती मिळते. दोन ट्रेनचा अपघात होण्याची शक्यता या सिस्टीममध्ये राहत नाही. एटीपी सिस्टीममध्ये कोणतीही ट्रेन सिग्नल जंप करु शकतात नाही. संकटाच्या वेळी सिग्नल मोडून ट्रेनला पुढं जाता येत नाही. यामुळे ट्रेनच्या अतिवेगावर नियंत्रण ठेवलं जातं.

रेल्वे अपघात रोखले जाणार

एटीपी यंत्रणा सॅटेलाईटद्वारे नियंत्रित केली जाते. एखादी ट्रेन निश्चित वेगापेक्षा अधिक वेगानं धावतं असेल, धोक्याची सूचना मान्य करत नसेल तर सॅटेलाईट सिग्नल यंत्रणा एटीपी कंट्रोल रुमला माहिती देईल. या यंत्रणेत अँटी कॉलिजन टेक्नॉलॉजी देखील येईल. यामुळे दोन्ही ट्रेन एकमेकांना धडकणार नाहीत.

4G स्पेक्ट्रम रेल्वेला मिळाल्यामुळे रेल्वे वाहतूक सुरु असताना संपर्क, नियंत्रण, प्रवासी माहिती, रेल्वेचं लाईव्ह लोकेशन, रेल्वे डब्यांचं निरीक्षण, इत्यादी कामं सुकर होणार आहेत. वाय फाय नेटवर्कमध्ये वाढ हेणार आहे. रेल्वेनं आतापर्यंत 6 हजार पेक्षा जास्त स्टेशनवर वाय फाय सेवा सुरु केली आहे.

संबंधित बातम्या:

VIDEO | ट्रेन जेव्हा 100च्या स्पीडने असते तेव्हा केबिनमध्ये काय घडतं?, ड्रायव्हर कशी करतात गाडी कंट्रोल?, वाचा

SBI Alert : या खातेदारांना जमा करावे लागेल आधार खाते आणि पॅनकार्ड, चेक करा तुमचेही नाव आहे का?

(Government of India gave permission for 4G spectrum use for railway signal system)

ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.
सुनेत्रा पवारांसह दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क
सुनेत्रा पवारांसह दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क.
शोकाकुल वातावरणात बारामतीत निवडणूक! रोहित पवारांनीही केलं मतदान
शोकाकुल वातावरणात बारामतीत निवडणूक! रोहित पवारांनीही केलं मतदान.
नाचरेवाडीत पावणे चार तासांपासून मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद
नाचरेवाडीत पावणे चार तासांपासून मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद.
12 तारखेला विलीनीकरणाबाबत बोलेल; रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं
12 तारखेला विलीनीकरणाबाबत बोलेल; रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं.
येत्या काळात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार;रोहित पवारांचं सूचक विधान
येत्या काळात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार;रोहित पवारांचं सूचक विधान.
आमदार विलास भुमरेंनी मतदानावेळी ईव्हीएम जवळ मुलालाही नेलं!
आमदार विलास भुमरेंनी मतदानावेळी ईव्हीएम जवळ मुलालाही नेलं!.
Mumbai Mayor : मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडेंची वर्णी!
Mumbai Mayor : मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडेंची वर्णी!.
नदीतूनच प्रवास... मतदार म्हणतात, रस्ता नाही, तर मत नाही
नदीतूनच प्रवास... मतदार म्हणतात, रस्ता नाही, तर मत नाही.