AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Knowledge | चित्राप्रमाणे सुंदर दिसणारं, पाण्यावर वसलेलं शहर ‘व्हेनिस’, जाणून घ्या का आणि कसं वसवलं?

‘व्हेनिस’  (Venice city) जगातील अशी एक जागा, जिथे जाऊन तिथले मनमोहक दृश्य पाहणे प्रत्येकाचे स्वप्न आहे. पाण्यावर तरंगणारे एक सुंदर शहर, जे सर्वांना स्वतःकडे आकर्षित करते. पण, हे शहर फक्त पाण्यावरच का वसले आहे?, याचा विचार कधी तुमच्या मनात आला आहे का?

Knowledge | चित्राप्रमाणे सुंदर दिसणारं, पाण्यावर वसलेलं शहर ‘व्हेनिस’, जाणून घ्या का आणि कसं वसवलं?
व्हेनिस शहर
| Edited By: | Updated on: Jun 18, 2021 | 12:31 PM
Share

मुंबई : ‘व्हेनिस’  (Venice city) जगातील अशी एक जागा, जिथे जाऊन तिथले मनमोहक दृश्य पाहणे प्रत्येकाचे स्वप्न आहे. पाण्यावर तरंगणारे एक सुंदर शहर, जे सर्वांना स्वतःकडे आकर्षित करते. पण, हे शहर फक्त पाण्यावरच का वसले आहे?, याचा विचार कधी तुमच्या मनात आला आहे का? व्हेनिस शहराचा स्वतःचा असा इतिहास आहे आणि त्याचा इतिहास जाणून घेतल्यावर हे शहर पाण्यावर का आहे, हे आपल्याला समजेल. चला तर, जाणून घेऊया या स्वप्नवत शहराची कथा…(Know about Venice city why this city built on water)

120 बेटांवर वसलेय ‘व्हेनिस’

व्हेनिसमधील सौंदर्य येथे असलेल्या प्रत्येक कलाकृतींमध्ये स्पष्टपणे दिसते. पाण्यावरील शहर म्हणूनच नव्हे, तर हे तरंगणारे शहर म्हणून देखील ओळखले जाते. पाचव्या शतकात व्हेनिस शहराची स्थापना सुरू झाली. त्यावेळी सतत होणारी हल्ले आणि सैन्याची आक्रमणे याने येथील लोक त्रस्त झाले होते. अशा परिस्थितीत लोकांनी खाडीकडील भागात शरण घेण्यास सुरुवात केली. या ठिकाणी बरीच छोटी छोटी बेटे होती. असे म्हणतात की, व्हेनिस सुमारे 120 बेटांवर बांधले गेले आहे आणि पुलाच्या मदतीने ते एकमेकांशी जोडलेले आहे. शहर बांधायच्या उद्देशाने लोकांना दलदलीची जमीन समतल करावी लागली. या आधी त्यावर घरे आणि इमारती कोणत्याही प्रकारे बांधता आल्याच नसत्या.

लाकडाच्या मदतीने बांधले शहर

आता असा प्रश्न तुमच्या मनात येईल की, जेव्हा जमीन इतकी दलदली होती, तेव्हा त्यावर एक शहर कसे बांधले गेले? व्हेनिसच्या लोकांनी यासाठी लाखो ओक वृक्षांच्या खोडांचा उपयोग केला. त्यांनी चिखलाखालील खड्याचे ठिकाणी येईपर्यंत ही खोडं जमिनीखाली रोवले. ही झाडाची खोडं अगदी जवळ लावलेले होते. खांबा दरम्यानची जागा बर्‍याच गोष्टींनी भरली होती. लोकांनी घरे बांधण्यासाठी या वनस्पती तंत्राचाही वापर केला. व्हेनिस कालवे आणि पुलांचे शहर म्हणून देखील ओळखले जाते. व्हेनिस शहर अड्रिएटिक समुद्रावर वसलेले आहे. यामुळे व्हेनिसचे धोरणात्मक महत्त्वही खूप जास्त आहे.

व्हेनिस शहरातील कालवा

आपण व्हेनिसमध्ये चालत फिरू शकता, कारण तेथे रस्ते कमी आणि कालवे जास्त आहेत. म्हणून, हे शहर बोटींवर म्हणजे गंडोलावर पाहणे अधिक चांगले होईल. येथे येणारे पर्यटक बोटीवर बसून पाण्यावर तरंगणार्‍या या सुंदर शहराचा आनंद लुटतात. व्हेनिसचा सर्वात मोठा कालवा म्हणजे ग्रँड कॅनाल. हा कालवा व्हेनिस शहराचे दोन भागात विभाजन करतो. लाखो पर्यटक दरवर्षी व्हेनिसमध्ये येतात. सद्य घडीला या शहराची लोकसंख्या 3 लाख इतकी आहे. या शहरात 150 कालवे आणि 400 पूल असून, या शहरात फिरण्यासाठी छोट्या बोटी महत्वाचे साधन आहेत. आपण एकतर बोटीने प्रवास करू शकता किंवा आपल्याला चालत फिरावे लागते. पाण्यामुळे कोणतीही अडचण येऊ नये म्हणून हे कालवे बांधले गेले आहेत.

(Know about Venice city why this city built on water)

हेही वाचा :

Fact Check | खरंच उत्तर प्रदेशचे विभाजन होणार ? केंद्र सरकारची भूमिका काय ?

एका दिवसांत आपण किती शब्द बोलता माहितीये? जाणून घ्या याबद्दलची रंजक माहिती…

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.