AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचे एकमेव शहर, जेथे एकही कार नाही ! तरीही पर्यटकांचे आवडते ठिकाण

भारतामध्ये पर्यटनासाठी एकाहून अधिक पर्यटन स्थळं स्थान आहेत, येथे पर्यटकांची मोठी गर्दी उसळलेली असते. देशात उत्तर ते दक्षिणेपर्यंत… पूर्व ते पश्चिमेपर्यंत हिल स्टेशन, समुद्र तट, धार्मिक स्थळं फेमस आहेत.

भारताचे एकमेव शहर, जेथे एकही कार नाही ! तरीही पर्यटकांचे आवडते ठिकाण
| Updated on: May 07, 2025 | 9:09 PM
Share

भारत म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणी आहे. येथे प्रत्येक शहराला स्वत:चा इतिहास आहे. या शहरांना पाहण्यासाठी लांबून लांबून पर्यटक येत असतात. पर्यटकांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळत असते. अलिकडे व्हीलेज टुरिझमला देखील लोकांना जवळून पाहायचे असते. यासाठी एकाहून एक अनोख्या गावांची सैर केली जात आहे.

आज आपण भारताच्या अशा गावाला भेट देणार आहोत. जेथे एकही कार किंवा वाहन चालत नाही. येथे येणाऱ्या लोकांना घोड्यांवरुनच प्रवास करावा लागतो. हा पर्यटकांसाठी स्वतंत्रपणे वेगळाच अनुभव आहे. यामुळे पर्यटकांचा प्रवास सुखद बनला आहे.

भारत एकमेव शहर

वास्तविक, महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान ( Matheran City ) देशातच नाही तर संपूर्ण आशियातील एकमेव शहर आहे. जेथे कोणत्याही प्रकारचे वाहन चालविण्यास मनाई आहे. या शहराला लोक ऑटोमोबाईल वाहन फ्री सिटी म्हणून ओळखले जाते. येथे फिरण्यासाठी अडीच किलोमीटरचे अंतर पायी पार करावे लागते. किंवा तुम्हाला घोड्यांवरुन सर्व पॉईंट पाहावे लागती. हे भारताचे सर्वात लहान हिल स्टेशन आहे. जे केवळ ७ किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे.

घोडस्वारी आणि टॉय ट्रेनची मजा

माथेरान येथे गिरीस्थान नगर परिषदही देखील आहे. येथे सहा हजाराच्या आसपास लोक संख्या आहे. माथेरान डोंगरावर वसले आहे.मुंबईपासून सर्वात जवळ असूनही येथे थंडगार वातावरण असते. समुद्रसपाटीपासून २,६३५ फूट उंचीवर आहे. चार बाजूंनी घेरल्यामुळे पर्यटकांना येथे आनंद मिळतो. येथील पर्यावरणाचे नुकसान होऊ नये म्हणून येथे राज्य सरकारने माथेरान इको संवदेनशील म्हणून जाहीर केले आहे.येथे तुम्ही घोडेस्वारीसह मिनी ट्रेनचा आनंद देखील घेऊ शकतात. साल १९०७ मध्ये टॉय ट्रेनचा प्रवास सुरु केला. माथेरानचा जंगलातून २० किलोमीटर अंतरावर आहे.

आल्हादायक वातावरण

वर्षभर येथेआल्हादायक वातावरण असते.येथे थंडीत आणि पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेता येतो. आपला माथेरानला धरतीचा स्वर्ग देखील म्हटले तर वावगे नाही. हार्ट पॉईंट, ट्री हील पॉईंट येथे तुम्ही जाऊन निसर्गाचा आनंद घेऊ शकता. तसेच रामबाग,पॅनारोमा पॉईंट येथे सुर्योदय आणि सुर्यास्ताचे अनोखे दृश्य पाहू शकता.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.