AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सापांचं सर्वात गुपित रहस्य, फळभाज्यांना दंश केला तर… माणसालाही मोठा धोका? वाचून हैराण व्हाल!

Snake Fact : सापाने चावल्यास भाज्या विषारी होऊ शकतात का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. याविषयी विज्ञान काय सांगते, हे सविस्तर जाणून घेऊयात.

सापांचं सर्वात गुपित रहस्य, फळभाज्यांना दंश केला तर... माणसालाही मोठा धोका? वाचून हैराण व्हाल!
Snake Fact Image Credit source: AI
| Updated on: Apr 27, 2026 | 6:45 PM
Share

साप दिसताच अनेकांची भंबेरी उडते, कारण सापाने दंश केला तर आपला जीव जाऊ शकतो. अनेकदा साप शेतात आढळतो, त्यामुळे तुम्हाला असे वाटले आहे का की, जर साप शेतात जमिनीवर असलेल्या एखाद्या भोपळ्याला किंवा वांग्याला चावला तर त्या भाजीमध्ये विष पसरते का? तसेच ती भाजी खाल्ल्यास माणसाच्या जीवाला धोका होऊ शकतो का? आज आम्ही तुम्हाला याबाबत विज्ञान काय सांगते याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

साप चावल्याने भाजी विषारी होते का?

शेतात असलेल्या एखाद्या भाजीला सापाने दंश करण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण साप निर्जीव वस्तूंवर किंवा वनस्पतींवर हल्ला करत नाहीत. मात्र चुकून जर सापाने एखाद्या भाजीला चावा घेतला आणि विष भाजीला लागले, तरी त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता खूप कमी असते. यामागे काही महत्त्वाची वैज्ञानिक कारणे आहेत.

वेनम आणि पॉइजनमधील फरक

सापाचे विष हे वेनमअसते, ते पॉइजन नसते. वेनमचा परिणाम ते थेट रक्तात गेल्यास होतो. जर ते पोटात गेले आणि तोंडात किंवा पचनसंस्थेत जखम नसेल, तर पोटातील आम्ल (HCL) ते प्रथिनांप्रमाणे पचवते. त्यामुळे या विषाचा कोणताही परिणाम होत नाही.

वनस्पतींची शोषण क्षमता

वनस्पती मानवी शरीराप्रमाणे विष संपूर्ण प्रणालीत पसरवत नाहीत. सापाचे विष हे जटिल प्रथिनांचे मिश्रण असते, जे वनस्पतींच्या पेशींमार्फत भाजीच्या आतील भागात सहज पसरत नाही. त्यामुळे एखाद्या भाजीवर सापाचे विष पसरले असले तरी त्याचा फार परिणाम होत नाही.

साप आणि भाज्यांबाबत महत्त्वाच्या गोष्टी

  • हल्ल्याची प्रवृत्ती : साप साधारणपणे उंदीर, बेडूक किंवा माणसांसारख्या जिवंत प्राण्यांवर हल्ला करतात. त्या कधीही भाज्यांना दंश करत नाहीत.
  • स्वच्छता : जर भाजीच्या बाहेरील भागावर सापाचे विष लागले असेल, तर भाजी नीट धुतल्याने आणि शिजवल्याने ते नष्ट होण्याची शक्यता असते.
  • पचनसंस्था : मानवी पचनसंस्था अशा जटिल प्रथिनांना तोडून टाकते.
  • भाज्या धुणे आवश्यक : साप चावला नसला तरी सापाच्या शरीरावरील बॅक्टेरिया किंवा सालेमोनेला सारखे जंतू भाज्यांवर लागू शकतात, त्यामुळे भाज्या नेहमी स्वच्छ धुवूनच खाव्यात.

दरम्यान, सापाने दंश केलेली भाजी खाल्याने मृत्यू होता असं जर तुम्हाला सांगितलं तर असत्य आहे. विज्ञानानुसार सापाच्या विषाचा फासरा परिणाम होत नाही. असं असलं तरी तुम्ही फळे खाण्यापूर्वी स्वच्छ धुवावीत तसेच भाज्या धूवून नंतर त्या पूर्णपणे शिजवाव्यात आणि नंतर त्याचे सेवन करावे.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...