AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुरुद्वारा की इतिहासाचं भंडार? अझमगडच्या ‘या’ गुरुद्वाराची कथा, एकदा नक्की वाचा!

गुरुद्वारा म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते पवित्र आणि शांत जागा. पण तुम्हाला माहित आहे का, भारतात एक असा गुरुद्वारा आहे जिथे तुम्हाला फक्त आशीर्वादच नाही, तर शेकडो वर्षांपूर्वीचा, हाताने लिहिलेला इतिहासाचा खजिना बघायला मिळतो? उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये लपलेलं हे अद्भुत ठिकाण, जिथे स्वतः तीन शीख गुरूंनी तपश्चर्या केली आणि जिथे त्यांचे ठेवलेले प्राचीन ग्रंथ आजही सुरक्षित आहेत! चला, जाणून घेऊया जगातल्या या एकमेव गुरुद्वाराची विस्मयकारक कहाणी!

गुरुद्वारा की इतिहासाचं भंडार? अझमगडच्या 'या' गुरुद्वाराची कथा, एकदा नक्की वाचा!
Gurudwaras in Nizamabad Image Credit source: tv9 marathi
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: Mayuri Sajerao | Updated on: May 02, 2025 | 10:53 AM
Share

तुम्हाला माहिती आहे का, उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यात असं एक ठिकाण आहे, जिथे शिखांचे तीन-तीन गुरू स्वतः वास्तव्य करून गेले आहेत? होय, निजामाबाद या गावात वसलेला हा गुरुद्वारा फक्त एक प्रार्थनास्थळ नाही, तर थेट इतिहासाचा जिवंत पुरावा आहे.

कथा आहे त्या काळाची, जेव्हा गुरू नानक देवजींनी आपल्या पवित्र यात्रेत या ठिकाणी थांबून साधना केली. त्यांच्यानंतर गुरू तेग बहादूर आणि दहावे गुरू गुरू गोविंद सिंग यांनीही याच भूमीत आपले पावन पाय टेकवले. इतकंच नाही, तर गुरू नानक देवांचे सुपुत्र श्रीचंद्रजी महाराज हे देखील इथे आले होते. तुम्ही कल्पना करू शकता का, एका छोट्याशा गावात अशा तिन्ही महान गुरूंचा इतिहास दडलेला आहे?

ही जागा शोधण्याचं श्रेय जातं बाबा कृपालदासजी महाराज यांना. ते गुरू अमरदासजींच्या वंशातील होते. त्यांच्या शोध मोहिमेचं फलित म्हणजे हे गुरुद्वाराचं आजचं अस्तित्व! पुढे त्यांच्या पवित्र कुटुंबातूनच या ठिकाणचा वारसा पुढे नेला गेला आणि हा ऐतिहासिक ठेवाही जपला गेला.

पण खरी कमाल तर इथे ठेवलेल्या त्या हस्तलिखित शीख ग्रंथांची आहे. जवळपास २५ जुने, शतकांपूर्वी हाताने लिहिलेले ग्रंथ आजही या गुरुद्वारात सुरक्षित जतन करून ठेवले आहेत. असं म्हणतात, या ग्रंथांसोबत गुरू नानक देवांनी स्वतःच्या लाकडी पादुकाही इथे ठेवल्या होत्या.

इतिहासाच्या या खुणा इथेच थांबत नाहीत. १९७४ साली या गुरुद्वाराच्या विहिरीतून प्राचीन शस्त्रसाठा सापडला. ढाल, तलवारी, भाले, कट्यारी आणि बंदुका — या सर्व वस्तू पाहताना असं वाटतं की, एखाद्या जुन्या युद्धकथेच्या पानात आपण जगत आहोत.

तर अशी ही पवित्र, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक स्थळाची गोष्ट, जिथे आजही देशविदेशातून भाविक मनःशांती आणि आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी करतात. एकदा तरी इथे भेट द्यायलाच हवी, नाही का?

Follow Us
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीस...
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीसांच्या उपस्थितीत करार मंजूर
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार...
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार, इतकेच काय तर शिंदे गट...
चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार,
पुणे : चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार, नेमकं काय घडलं?
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा..
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा दिवस महत्त्वाचा; ठाकरे गटात मोठ्या हालचाली!
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक