AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्यापारी मक्याचे पैसेच देईना, वैतागलेल्या शेतकऱ्याची नव्या कृषी कायद्याअंतर्गत तक्रार, अखेर शेतकऱ्याला न्याय

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यामुळे शिरपूर तालुक्यातील भटाणे गावचे शेतकरी जितेंद्र भोई यांना न्याय मिळाला आहे (Agricultural Act of the Central Government brought justice to the Dhule farmer).

व्यापारी मक्याचे पैसेच देईना, वैतागलेल्या शेतकऱ्याची नव्या कृषी कायद्याअंतर्गत तक्रार, अखेर शेतकऱ्याला न्याय
| Updated on: Nov 29, 2020 | 11:22 PM
Share

धुळे : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यामुळे शिरपूर तालुक्यातील भटाणे गावचे शेतकरी जितेंद्र भोई यांना न्याय मिळाला आहे. विशेष म्हणजे जितेंद्र भोई यांना न्याय मिळाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रेडिओवरील ‘मन की बात’ कार्यक्रमात जितेंद्र भोई यांचा उल्लेख केला. त्यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’ची टीम भटाणे गावात दाखल झाली. यावेळी जितेंद्र भोई यांनी आपला अनुभव ‘टीव्ही 9 मराठी’ सोबत शेअर केला (Agricultural Act of the Central Government brought justice to the Dhule farmer).

“माझ्याकडे उन्हाळ्यात मक्याचं पीक आलं होतं. लॉकडाऊन काळात मला मका विकता आला नाही. दरम्यानच्या काळात मध्य प्रदेशच्या एका व्यापाऱ्याला मी मका विकला. व्यापाऱ्याने मका घेतल्यानंतर आठ दिवसांनी आरटीजीएस करतो, असं सांगितलं. मात्र, आठ दिवसांनी त्याने आरटीजीएस केलं नाही. या व्यापाऱ्याचा मोबाईल स्वीच ऑफ यायचा. जेव्हा फोन लागायचा तेव्हा टाळाटाळ करायचा किंवा बरोबर उत्तर द्यायचा नाही”, असं जितेंद्र भोई यांनी सांगितलं.

“मी खूप प्रयत्न केले, मात्र, व्यापाऱ्याने अडीच-तीन महिने पैसे दिले नाहीत. दरम्यान, माझ्या एका मित्राने कृषी कायद्याची माहिती दिली. या कायद्याअंतर्गत मी व्यापाऱ्याची तक्रार केली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने व्यापाऱ्याला नोटीस बजावली. अखेर व्यापाऱ्यानेही पैसे देऊ, असं आश्वासन दिलं”, असं जितेंद्र भोई म्हणाले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात माझा उल्लेख केला त्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. व्यापाऱ्यांनी अशाप्रकारे फसवणूक केली तर इतर शेतकऱ्यांनाही कृषी कायद्याअंतर्गत न्याय मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनीही या कायद्याचा अवलंब करावा”, असं आवाहन जितेंद्र भोई यांनी केला (Agricultural Act of the Central Government brought justice to the Dhule farmer).

हेही वाचा : कपाशीच्या शेतात गांजाची लागवड, धु्ळ्यात अवैध गांजाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला बेड्या, 14 लाखांची पीकं जप्त

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.