AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्यापारी मक्याचे पैसेच देईना, वैतागलेल्या शेतकऱ्याची नव्या कृषी कायद्याअंतर्गत तक्रार, अखेर शेतकऱ्याला न्याय

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यामुळे शिरपूर तालुक्यातील भटाणे गावचे शेतकरी जितेंद्र भोई यांना न्याय मिळाला आहे (Agricultural Act of the Central Government brought justice to the Dhule farmer).

व्यापारी मक्याचे पैसेच देईना, वैतागलेल्या शेतकऱ्याची नव्या कृषी कायद्याअंतर्गत तक्रार, अखेर शेतकऱ्याला न्याय
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 29, 2020 | 11:22 PM
Share

धुळे : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यामुळे शिरपूर तालुक्यातील भटाणे गावचे शेतकरी जितेंद्र भोई यांना न्याय मिळाला आहे. विशेष म्हणजे जितेंद्र भोई यांना न्याय मिळाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रेडिओवरील ‘मन की बात’ कार्यक्रमात जितेंद्र भोई यांचा उल्लेख केला. त्यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’ची टीम भटाणे गावात दाखल झाली. यावेळी जितेंद्र भोई यांनी आपला अनुभव ‘टीव्ही 9 मराठी’ सोबत शेअर केला (Agricultural Act of the Central Government brought justice to the Dhule farmer).

“माझ्याकडे उन्हाळ्यात मक्याचं पीक आलं होतं. लॉकडाऊन काळात मला मका विकता आला नाही. दरम्यानच्या काळात मध्य प्रदेशच्या एका व्यापाऱ्याला मी मका विकला. व्यापाऱ्याने मका घेतल्यानंतर आठ दिवसांनी आरटीजीएस करतो, असं सांगितलं. मात्र, आठ दिवसांनी त्याने आरटीजीएस केलं नाही. या व्यापाऱ्याचा मोबाईल स्वीच ऑफ यायचा. जेव्हा फोन लागायचा तेव्हा टाळाटाळ करायचा किंवा बरोबर उत्तर द्यायचा नाही”, असं जितेंद्र भोई यांनी सांगितलं.

“मी खूप प्रयत्न केले, मात्र, व्यापाऱ्याने अडीच-तीन महिने पैसे दिले नाहीत. दरम्यान, माझ्या एका मित्राने कृषी कायद्याची माहिती दिली. या कायद्याअंतर्गत मी व्यापाऱ्याची तक्रार केली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने व्यापाऱ्याला नोटीस बजावली. अखेर व्यापाऱ्यानेही पैसे देऊ, असं आश्वासन दिलं”, असं जितेंद्र भोई म्हणाले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात माझा उल्लेख केला त्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. व्यापाऱ्यांनी अशाप्रकारे फसवणूक केली तर इतर शेतकऱ्यांनाही कृषी कायद्याअंतर्गत न्याय मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनीही या कायद्याचा अवलंब करावा”, असं आवाहन जितेंद्र भोई यांनी केला (Agricultural Act of the Central Government brought justice to the Dhule farmer).

हेही वाचा : कपाशीच्या शेतात गांजाची लागवड, धु्ळ्यात अवैध गांजाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला बेड्या, 14 लाखांची पीकं जप्त

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.