AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्यापारी मक्याचे पैसेच देईना, वैतागलेल्या शेतकऱ्याची नव्या कृषी कायद्याअंतर्गत तक्रार, अखेर शेतकऱ्याला न्याय

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यामुळे शिरपूर तालुक्यातील भटाणे गावचे शेतकरी जितेंद्र भोई यांना न्याय मिळाला आहे (Agricultural Act of the Central Government brought justice to the Dhule farmer).

व्यापारी मक्याचे पैसेच देईना, वैतागलेल्या शेतकऱ्याची नव्या कृषी कायद्याअंतर्गत तक्रार, अखेर शेतकऱ्याला न्याय
| Updated on: Nov 29, 2020 | 11:22 PM
Share

धुळे : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यामुळे शिरपूर तालुक्यातील भटाणे गावचे शेतकरी जितेंद्र भोई यांना न्याय मिळाला आहे. विशेष म्हणजे जितेंद्र भोई यांना न्याय मिळाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रेडिओवरील ‘मन की बात’ कार्यक्रमात जितेंद्र भोई यांचा उल्लेख केला. त्यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’ची टीम भटाणे गावात दाखल झाली. यावेळी जितेंद्र भोई यांनी आपला अनुभव ‘टीव्ही 9 मराठी’ सोबत शेअर केला (Agricultural Act of the Central Government brought justice to the Dhule farmer).

“माझ्याकडे उन्हाळ्यात मक्याचं पीक आलं होतं. लॉकडाऊन काळात मला मका विकता आला नाही. दरम्यानच्या काळात मध्य प्रदेशच्या एका व्यापाऱ्याला मी मका विकला. व्यापाऱ्याने मका घेतल्यानंतर आठ दिवसांनी आरटीजीएस करतो, असं सांगितलं. मात्र, आठ दिवसांनी त्याने आरटीजीएस केलं नाही. या व्यापाऱ्याचा मोबाईल स्वीच ऑफ यायचा. जेव्हा फोन लागायचा तेव्हा टाळाटाळ करायचा किंवा बरोबर उत्तर द्यायचा नाही”, असं जितेंद्र भोई यांनी सांगितलं.

“मी खूप प्रयत्न केले, मात्र, व्यापाऱ्याने अडीच-तीन महिने पैसे दिले नाहीत. दरम्यान, माझ्या एका मित्राने कृषी कायद्याची माहिती दिली. या कायद्याअंतर्गत मी व्यापाऱ्याची तक्रार केली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने व्यापाऱ्याला नोटीस बजावली. अखेर व्यापाऱ्यानेही पैसे देऊ, असं आश्वासन दिलं”, असं जितेंद्र भोई म्हणाले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात माझा उल्लेख केला त्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. व्यापाऱ्यांनी अशाप्रकारे फसवणूक केली तर इतर शेतकऱ्यांनाही कृषी कायद्याअंतर्गत न्याय मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनीही या कायद्याचा अवलंब करावा”, असं आवाहन जितेंद्र भोई यांनी केला (Agricultural Act of the Central Government brought justice to the Dhule farmer).

हेही वाचा : कपाशीच्या शेतात गांजाची लागवड, धु्ळ्यात अवैध गांजाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला बेड्या, 14 लाखांची पीकं जप्त

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....