‘निसर्ग’ चक्रीवादळाचा फटका बसलेल्या दापोली-मंडणगडसाठी 25 कोटींची मदत

| Updated on: Jun 14, 2020 | 8:19 AM

निसर्ग चक्रीवादळाचा फार मोठ्या प्रमाणावर फटका बसलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड तालुक्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला (Nisarga Cyclone Ratnagiri) आहे.

निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या दापोली-मंडणगडसाठी 25 कोटींची मदत
Follow us on

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा फार मोठ्या प्रमाणावर फटका बसलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड तालुक्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला (Nisarga Cyclone Ratnagiri) आहे. येत्या आठ दिवसांच्या आत लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. मदत मिळणाऱ्या वादळग्रस्तांच्या लाभार्थ्यांची यादी मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते तालुक्यातील गावाच्या सरपंचांना देण्यात आली (Nisarga Cyclone Ratnagiri) आहे.

निसर्ग वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री अस्लम शेख हे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी दापोली आणि मंडणगड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या 25 कोटी निधीच्या वाटपासाठी लाभार्थ्यांच्या यादीचे वितरण दोन्ही तालुक्यातील सरपंचांना केले.

शेख यांनी वादळग्रस्तांना भेट देऊन राज्य शासन वादळग्रस्तांच्या पाठीशी उभे असल्याचे नमूद केले. नुकसान भरपाईचा निधी तातडीने लाभार्थ्यांना मिळावा यासाठी प्रशासनास सूचना दिल्या.

यावेळी शेख यांनी श्रीवर्धन तालुक्यातील कोळंबी संवर्धन प्रकल्पाच्या नुकसानीची, जीवना बंदराची हानी, भरडखोल आदी ठिकाणीच्या हानीची पाहणी केली. तसेच तेथील मच्छीमारांशी चर्चा केली.

यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार भाई जगताप, आमदार योगेश कदम, आमदार अनिकेत तटकरे, माजी मंत्री रामदास कदम, यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्र्यांकडून वादळग्रस्त रत्नागिरी-सिंधुदुर्गाचा आढावा, 100 कोटींची एकत्रित मदत जाहीर

रत्नागिरी जिल्ह्याला चक्रीवादळाचा फटका, 27 हजार घरांची पडझड, आंबा, काजू, पोफळीच्या बागांचेही नुकसान