रत्नागिरी जिल्ह्याला चक्रीवादळाचा फटका, 27 हजार घरांची पडझड, आंबा, काजू, पोफळीच्या बागांचेही नुकसान

निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील  किनारपट्टीतील गावांना जोरदार फटका (Ratnagiri Cyclone Damage)  बसला

रत्नागिरी जिल्ह्याला चक्रीवादळाचा फटका, 27 हजार घरांची पडझड, आंबा, काजू, पोफळीच्या बागांचेही नुकसान
फोटो - फेसबुक
Follow us
| Updated on: Jun 06, 2020 | 1:24 PM

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील  किनारपट्टीतील गावांना जोरदार फटका (Ratnagiri Cyclone Damage)  बसला. यात सर्वाधिक नुकसान हे दापोली आणि मंडणगड तालुक्याचे झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 27 हजार 782 घरांची पडझड झाली आहे. या वादळात 3200 झाड कोसळली आहे. तर हजारो वीजेचे खांबही जमीनदोस्त झाले आहेत.

निसर्ग चक्रीवादळात मनुष्यहानी झालेली नसली तरी 11 जनावरांना जीव गमवावा लागला आहे. तर दापोली आणि मंडणगडमध्ये संपर्क यंत्रणा कोलमडली आहे.

फोटो – फेसबुक

रत्नागिरी जिल्ह्यातील 57.81 हेक्टर जमिनीवरील पिकांना चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. यात आंबा, काजू, नारळ, पोफळी बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच जिल्ह्यातील 41 शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे.

फोटो – फेसबुक

यामध्ये मंडणगड तालुक्यात 7 इमारती, दापोलीतील एक महाविद्यालय, एक शासकीय गोदाम, खेडमध्ये 5 गोठे, गुहागरमध्ये 1 टॉवर, 2 शासकीय इमारती, 1 समाजमंदीर, चिपळूणमध्ये 1 शासकीय गोदाम, 1 गॅरेज, रत्नागिरीत तलाठी कार्यालय आणि मंगलकार्यालयाचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा : कोकणात 5 हजार कोटींचं नुकसान, सरकारने पंचनाम्याआधी तातडीने 500 कोटींची मदत करावी : सुनील तटकरे

दरम्यान “निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात साधारणत: 5 हजार कोटींचं नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने नियमित आणि प्रचलित नियम बाजूला ठेवून आपत्तीग्रस्तांना 5 हजार कोटींची मदत करावी. याशिवाय पंचनाम्याआधी सरकारने तातडीने 500 कोटींची मदत करावी”, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी (Ratnagiri Cyclone Damage) केली होती.

संबंधित बातम्या : 

चक्रीवादळाने कागदावरील नुकसानीपेक्षा जास्त नुकसान, अनेक ठिकाणी प्रशासन अजूनही पोहोचलेलं नाही : प्राजक्त तनपुरे

पुण्याला चक्रीवादळाचा तडाखा, अजित पवार थेट बांधावर, शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.