AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र कोरोनाच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात, लक्षणे दिसल्यास डॉक्टरकडे जा : मुख्यमंत्री

कोरोनाची लक्षणं आढळल्यास लगेचच डॉक्टरांना दाखवा. ही लपवण्याची गोष्ट नाही," असेही मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray Corona) म्हणाले.

महाराष्ट्र कोरोनाच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात, लक्षणे दिसल्यास डॉक्टरकडे जा : मुख्यमंत्री
| Updated on: Mar 27, 2020 | 9:41 PM
Share

मुंबई :महाराष्ट्र कोरोना व्हायरसच्या अत्यंत महत्त्वाच्या (CM Uddhav Thackeray Corona)  टप्प्यात आहे. आपल्याकडे पॉझिटिव्ह केसेस वाढतात. मात्र यातील दिलासादायक बाब म्हणजे जे कोणी वेळेत आले त्यातील काहींना डिस्चार्ज दिला आहे. या अर्थ असा की जर तुम्हाला लक्षणे दिसली, तर ताबडतोब डॉक्टरकडे जा,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“हे संकट घराबाहेर आहे, घरात नाही. त्यामुळे (CM Uddhav Thackeray Corona) लोकांनी गर्दी करु नये. तसे कोरोनाची लक्षणं आढळल्यास लगेचच डॉक्टरांना दाखवा. ही लपवण्याची गोष्ट नाही,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

“दिवसेंदिवस रस्त्यावरची गर्दी कमी होत आहे. रस्त्यावर किंवा घराबाहेर पडू नका हा नियम नागरिक पाळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर काहींनी कारण नसताना दुकानात झुंबड केली. हे सर्व आपल्याला टाळायला हवे,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“कृपा करुन शिस्त पाळा. भाज्यांची आवाक होत आहे. डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद करु नका,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“राज्यभर शिवभोजन केंद्र ही ३ तास सुरु राहणार, केंद्रांची संख्या वाढवावी. मात्र त्या ठिकाणी गर्दी करु नका,” असेही मुख्यमंत्री म्हणाले

“कोणत्याही परिस्थितीत गरीब, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या व्यक्ती उपाशी राहणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभाग तसेच जिल्हा प्रशासन यांना दिले आहेत. केंद्राने नुकतेच जाहीर केलेल्या पॅकेजप्रमाणे तसेच राज्य शासनाच्या यंत्रणेतील रेशनवरील धान्य त्यांना तात्काळ मिळेल. त्यांची अजिबात उपासमार होणार नाही हे पाहण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.”

“लॉकडाऊनमुळे आपल्याला अडकावे लागले आहे, हि परिस्थिती नाईलाजाने उदभवली आहे. आपण कोरोना निगेटिव्ह असले पाहिजे. मात्र घरातले वातावरण पॉझिटिव्ह ठेवा,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवभोजन उद्दिष्ट्य वाढवले

“या संकटात राज्यभरातून शिवभोजन केंद्रांनी गरजू आणि भुकेल्या लोकांची भूक भागवावी, त्यांचे उद्दिष्ट्यही आम्ही १ लाख वाढवत आहोत . त्याचा लाभ घ्यावा. मात्र त्यासाठी गर्दी करून आरोग्याला धोका होईल, असे करू नका,” असेही ते म्हणाले.

“रिटेल सप्लाय चेन आणि होम डिलिव्हरी सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आम्ही निर्देश दिले आहेत. पोलीस, महसूल, सहकार, पणन आणि कामगार विभाग याना यादृष्टीने सर्व सूचना दिल्या आहेत. त्यामुळे वस्तूंचा पुरवठा हा व्यवस्थित होत राहील याची खात्री बाळगा,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले

“जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांतून , टँकर्स, कंटेनर यामधून कोणत्याही परिस्थितीत लोकांची वाहतूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. त्यातून एखादा अपघात घडल्यास दुर्दैवी प्रसंग ओढवू शकतो.”

“ऊसतोड कामगार आणि त्यांच्या परिवाराची काळजी घ्या असे साखर कारखान्यांना सांगितले आहे. हे कामगार आपल्या कुटुंबाचाच एक भाग आहे हे लक्षात ठेवा.”

दूध संकलन व्यवस्थित होईल

“ग्रामीण भागातून दूध संकलन व्यवस्थित होईल जेणे करून शेतकरी आणि ग्राहक या दोघांची कुचंबणा होणार नाही हे पाहण्याचे निर्देशही दिले आहेत.”

“परराज्यातून आपल्या राज्यात मोठ्या संख्येने नागरिक अडकले आहेत, कुणी इथे काम करणारे कामगार आणि श्रमिक आहेत. त्यांची व्यवस्थित काळजी प्रशासन घेईल. काही स्वयंसेवी संस्था त्यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. मात्र त्यांनी देखील गर्दी न करता व आपल्या मदतीचे योग्य नियोजन करून मदत कार्य करावे.”

खासगी डॉक्टर्सवर देखील मोठी जबाबदारी

“खासगी डॉक्टर्सवर देखील मोठी जबाबदारी आहे. या लढाईत त्यांची भूमिका महत्वाची आहे. त्यांनी आपले दवाखाने सुरु ठेवले पाहिजेत. त्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची व आरोग्याची जबादारी आमची आहे.”

रक्तदान शिबिरे घ्यावी

“राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवतोय. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी रक्तदान शिबिरे घ्यावी मात्र अनावश्यक गर्दी होऊ देऊ नये असे मी आवाहन करतो.”

“कुठल्याही परिस्थिती कायदा व सुव्यवस्था यांचे प्रश्न निर्माण होणार हि जबाबदारी नागरिक म्हणून आपली सर्वांची आहे. पोलिसाना सहकार्य देखील आम्ही सूचना दिल्या आहेत”

“शिर्डी संस्थानाने 51 कोटी रुपये सहायता निधीसाठी दिले आहेत, सिद्धीविनायकने देखील 5 कोटी देऊ केले आहेत अशी माहिती देताना ते म्हणाले कि वेळीच उपचार झाले तर कोरोना बरा होऊ शकतो. मात्र योग्य उपचार झाले पाहिजेत,” असेही ते (CM Uddhav Thackeray Corona) म्हणाले

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.