संकटकाळात महाराष्ट्र एक, मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्यांचे आभार : मुख्यमंत्री

| Updated on: Jun 03, 2020 | 10:32 PM

'निसर्ग' चक्रीवादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्या सगळ्यांचेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार (CM Uddhav Thackeray on Nisarga Cyclone) मानले.

संकटकाळात महाराष्ट्र एक, मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्यांचे आभार : मुख्यमंत्री
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट घोंघावत असताना निसर्ग चक्रीवादळाच्या तडाखा (CM Uddhav Thackeray on Nisarga Cyclone) बसला. संकट मोठे होते. पण हे संकट सगळ्यांनी परतवून लावले. ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्या सगळ्यांचेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“महाराष्ट्रावर करोनाचे संकट घोंघावत असतानाच चक्री वादळाचा तडाखा बसला. संकट म्हटले तर मोठे होते. पण हे संकट आपण सगळ्यांनी परतवून लावले आहे. जनतेसह प्रशासनाने झुंज दिली आणि संकटाची तीव्रता कमी केली. मात्र दुर्दैवाने दोघांचा यात मृत्यू झाला.

कोकणात तसेच इतरत्र नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. मुंबादेवीचीच कृपा मुंबईवर आहे, तसे पंढरपूरच्या विठू माऊलींचे आशिर्वाद आहेत. मुख्य म्हणजे या वादळाला थोपवून सामना करणारे महापालिका अधिकारी, जिल्हा प्रशासन, आपत्कालीन व्यवस्थापन, वैद्यकीय पथके या सगळ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. वृत्तवाहिन्यासुद्धा लोकांना चांगली माहिती देत होत्या.

निसर्गा पुढे कोणाचेही चालत नाही. पण संकटकाळात महाराष्ट्र एक आहे. खंबीर आहे हे या वादळात दिसून आले. हीच आपली एकजूट महाराष्ट्राला सर्व संकटातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही,” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray on Nisarga Cyclone) म्हणाले.

संबंधित बातम्या : 

Cyclone Nisarga | निसर्ग चक्रीवादळ घोंघावलं, पुण्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस