Farmers Protest Live Update | आज पंजाबसाठी 26/11 चा दिवस : सुखबीर सिंग बादल

| Updated on: Nov 26, 2020 | 5:36 PM

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधत पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. Farmer Protest Chalo Delhi

Farmers Protest Live Update | आज पंजाबसाठी 26/11 चा दिवस : सुखबीर सिंग बादल
Follow us on

नवी दिल्ली:  सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारनं तीन कृषी कायद्यांना मंजुरी दिली होती. या कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी आवाज उठवला होता. पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी चलो दिल्ली आंदोलन सुरु केले असून मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीकडे निघाले आहेत. शेतकऱ्यांचा विरोध पाहता हरियाणा सीमा सील करण्यात आली आहे. 26 आणि 27 नोव्हेंबरला सीमा बंद राहणार आहे. (Delhi chalo Farmers protest live and latest updates)

LIVE Updates:

[svt-event title=”आज पंजाबसाठी 26/11 चा दिवस : सुखबीर सिंग बादल” date=”26/11/2020,5:34PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”शेकाप आणि डाव्या पक्षांचा अलिबागमध्ये केंद्र सरकार विरोधात मोर्चा ” date=”26/11/2020,3:36PM” class=”svt-cd-green” ] अलिबाग मधील शेतकरी भवन येथुन सुरु झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापासून काही अतंरावर मोर्चा अडविण्यात आला. कन्या शाळा चोकात मोर्चा अडविल्या नतंर सभा घेण्यात आली. कॉ. अशोक ढवळे, माजी आमदार धैर्यशील पाटील, आ. जयंत पाटील यांनी सभेला संबोधित केले. केंद्र सरकार विरोधात व वाढीव वीजबिलांविरोधात राज्य सरकार विरुद्ध रोष व्यक्त करण्यात आला. मोठ्या संख्येने शेकापचे जिल्हाभरातून कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी आ. जयंत पाटील व कॉ.अशोक ढवळे यांनी ट्रॅक्टरच्या बोनेटवर बसून मोर्चाचे नेतृत्व केले. [/svt-event]

[svt-event title=”पंजाबचे शेतकरी कुरुक्षेत्रावर पोहोचणार” date=”26/11/2020,3:27PM” class=”svt-cd-green” ] हरियाणा पोलिसांनी पंजाबम ते दिल्ली आगेकूच करत असलेल्या शेतकऱ्यांना कुरुक्षेत्रमध्ये अडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. कुरुक्षेत्रमधील त्योडा-तोडी जवळ पोलीस शेतकऱ्यांना अडवण्यासाठी रणनिती बनवत आहेत. अंबालामध्ये पोलीस बंदोबस्त असूनही शेतकऱ्यांना रोखण्यात पोलिसांना अपयश आले होते. [/svt-event]

[svt-event title=”पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र” date=”26/11/2020,1:12PM” class=”svt-cd-green” ] पंजाबचे मुख्यमंत्री कॅपट्न अमरिंदरसिंग यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. हरियाणा सरकारनं राज्याच्या सीमा सील केल्या आहेत. याद्वारे शेतकऱ्यांना हरियाणाच्या सीमेवरच अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. शेतकऱ्यांना अडवल्यामुळे अमरिंदरसिंग आक्रमक झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी पंजाबमध्ये कोणत्याही अडचणीशिवाय आंदोलन करत आहेत. हरियाणा सरकार शेतकऱ्यांची अडवणूक करुन त्यांना उसकवण्याचे काम करत आहे. शेतकऱ्यांना शांततेच्या मार्गानं महामार्गावरुन जाण्याचा अधिकार नाही का?, असा प्रश्न अमरिंदरसिंग यांनी मनोहरलाल खट्टर यांना विचारला आहे. संविधान दिनाच्यादिवशी शेतकऱ्यांना त्यांच्या संविधानिक अधिकारांपासून वंचित ठेवलं जातेय, असा आरोपही पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी केला.

[svt-event title=”शंभू बार्डरवर शेतकरी आक्रमक” date=”26/11/2020,12:53PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”शंभू बॉर्डरवर शेतकरी मोठ्या संख्येने जमा, पोलिसांनी अश्रूधुराच्या कांड्या फोडल्या” date=”26/11/2020,12:51PM” class=”svt-cd-green” ] हरियाणा-पंजाब सीमेवरील शंभू बार्डरवर मोठ्या संख्येन शेतकरी जमा झाले आहेत. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूराचा वापर केला. यापूर्वी शेतकऱ्यांवर पाण्याचा मारादेखील करण्यात आला होता.Farmer Protest Chalo Delhi

[svt-event title=”शेतकऱ्यांकडून हिरावून घेत उद्योगपतींच्या हवाली केलं जाते” date=”26/11/2020,12:38PM” class=”svt-cd-green” ] प्रियांका गांधी यांनी शेतकऱ्यांना अडवणाऱ्या भाजप सरकारवर टीका केली आहे. भाजप सरकार शेतकऱ्यांचा आवाज ऐकून घेण्याऐवजी त्यांच्यावर पाण्याचा मारा करतेय. शेतकऱ्यांकडून सर्व हिरावूरन घेतले जात आहे. उद्योगपतींना बँक, कर्जमाफी, विमानतळ आणि रेल्वे स्टेशन दिली जात आहेत, असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला.

[svt-event title=” हरियाणामधील कर्नाल कर्ना तलाव भागात मोठ्या प्रमाणावर शेतकरी जमा झाले. दिल्लीला जाण्यासाछी शेतकरी जमा झाले होते. सर्व शेतकरी कृषी कायद्यांचा विरोध करत आहेत.” date=”26/11/2020,12:34PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पृथ्वीराज चव्हाणांची मोदी सरकारवर टीका” date=”26/11/2020,12:31PM” class=”svt-cd-green” ]

कृषी कायद्यांच्या विरोधासह इतर मागण्यांसाठी पंजाब-हरयाणातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ महामोर्चा काढला आहे. दिल्लीकडे निघालेल्या या मोर्चाला हरयाणामध्ये अंबाला-पटियाला बोर्डवर अडवण्यात आलं आहे. त्यामुळे पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड धुमश्चक्री उडाली आहे. सीमेवरच अडवणाऱ्या पोलिसांच्या दिशेने कूच करत शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स फेकून दिल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्यामुळे अंबाला-पटियाला सीमेवर प्रचंड तणावाचं वातावरण आहे. Farmer Protest Chalo Delhi

संबंधित बातम्या

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबमधील शेतकरी आंदोलनं सुरुच, 41 रेल्वेगाड्या रद्द

कृषी कायद्यातील सुधारणांचा विचार आवश्यक, शेतकरी प्रतिनिधींच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची भूमिका

farmers agitation ! शेतकऱ्यांचा आसूड कडाडला! बॅरिकेडिंग फेकल्या, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या; हरयाणा बॉर्डवर पोलीस-शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री

(Delhi chalo Farmers protest live and latest updates)