अंबरनाथमध्ये अस्वच्छ पाण्याच्या बाटल्यांचे अनधिकृतपणे उत्पादन, एफडीएकडून कारखान्यावर धाड

अंबरनाथमध्ये अनधिकृतपणे सीलबंद पाण्याच्या बाटल्यांचं उत्पादन करणाऱ्या कंपनीवर धाड टाकण्यात (FDA Raid on water bottel factory) आली आहे.

अंबरनाथमध्ये अस्वच्छ पाण्याच्या बाटल्यांचे अनधिकृतपणे उत्पादन, एफडीएकडून कारखान्यावर धाड
| Edited By: | Updated on: Mar 16, 2020 | 7:10 PM

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये अनधिकृतपणे सीलबंद पाण्याच्या बाटल्यांचं उत्पादन करणाऱ्या कंपनीवर धाड टाकण्यात (FDA Raid on water bottel factory) आली आहे. एमपीसीबी, एफडीए आणि अंबरनाथ नगरपालिकेनं संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. या कारखान्यात गलिच्छ जागेत विनापरवाना उत्पादन केले जाते होते. या कारखान्यातील सर्व पाण्याच्या बाटल्या जप्त केल्या असून अधिक (FDA Raid on water bottel factory) चौकशी सुरु आहे.

अंबरनाथ पूर्वेच्या बारकू पाडा परिसरात हा कारखाना गेली अनेक वर्षे सुरू होता. याच कारखान्यात तयार झालेल्या पाण्याच्या बाटलीत फुल आढळल्यानंतर त्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर कारखान्यावर धाड मारण्यात आली. यावेळी अतिशय अस्वच्छ जागेत बोअरिंगच्या पाण्याने या बाटल्या भरल्या जात असल्याचं समोर आलं.

या कारखान्याकडे फक्त 200 आणि 500 मिली बाटल्यांच्या उत्पादनाचा परवाना आहे. तरी सर्रासपणे 1 आणि 20 लिटरच्या बाटल्यांचं उत्पादन सुरू होतं. याशिवाय बंदी घालण्यात आलेले प्लॅस्टिक पाण्याचे पाऊचही मोठ्या प्रमाणात आढळून आले.

या कारखान्याच्या बाजूलाच असलेल्या पेप्सी कोला कारखान्यावरही धाड मारण्यात आली. यावेळी अत्यंत घाणेरड्या जागेत हे उत्पादन सुरू असल्याचं आणि सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याचं निदर्शनास आल्यानं या कारखान्यावरही कारवाई करण्यात आली.