AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi : 21 जुलै राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी पोलिसांना राहुल गांधी यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. यावर आता राहुल गांधींनी भाष्य केले आहे.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी
Rahul Gandhi on CJP ProtestImage Credit source: Google
| Updated on: Jul 22, 2026 | 5:30 PM
Share

राजधानी दिल्लीत सध्या कॉकरोज जनता पार्टीकडून आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलन करत आहेत. 21 जुलै राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी पोलिसांना राहुल गांधी यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. मात्र काही काळानंतर त्यांना सोडून देण्यात आले आहे. अशातच आज या घटनेबाबत राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. याबाबत जाणून घेऊयात.

मोदींच्या घरापर्यंत का गेलात?

राहुल गांधी यांनी म्हटले की, ‘मोदींच्या घरापर्यंत गेलो त्याची दोन कारणं आहेत. हिंदुस्थानचे विद्यार्थी रस्त्यावर आहेत. तर विरोधकांनाही रस्त्यावर आलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे, आमची नॅचरल स्पेस पार्लमेंट आहे. पंतप्रधान निवासाला जाण्यापूर्वी विरोधक स्पीकरकडे गेले. त्यांना आम्ही सांगितलं हा मुद्दा आहे. आम्हाला त्यावर बोलू द्या. चर्चा करू द्या. स्पीकर म्हणाले मी सरकारला विचारतो. हा सरकारचा निर्णय असतो की स्पीकरचा? आम्ही म्हटलं ठीक आहे. तुम्ही विचारा. पण त्यानंतर काहीच चर्चा होऊ दिली नाही.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ‘धर्मेंद्र प्रधान हे एक सिम्बॉल आहे. विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने छळलं त्याचं सिम्बॉल आहे. त्यामुळे सिम्बॉल हटवला पाहिजे. आम्हाला ते माहीत आहे. त्यांची बॅकग्राऊंड माहिती आहे. आम्हाला देशाला संदेश द्यायचा आहे, अशा माणसाला हटवलं आहे. आम्हाला वाटतं हा मध्यवर्ती मुद्दा आहे. त्यावर निर्णय आला पाहिजे. आम्हाला बदल हवा आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठीच आम्ही मोदींच्या घरासमोर आंदोलन केलं.

समाजाचं आवाज बुलंद करायचा आहे – राहुल गांधी

आम्ही विद्यार्थी आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देत आहोत. माझ्या तोंडातून काल रक्त येतं होतं. आम्ही पूर्ण पाठिंबा देत आहोत. जितेंद्र सिंह या चर्चेत इरेलव्हंट आहे. चर्चा सोपी आहे. आमच्या मागण्या स्पष्ट आहेत. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला पाहिजे. ज्यांनी मारहाण केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि मोदींनी माफी मागितील पाहिजे. या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत. माझं कर्तव्य लोकांचा आवाज बुलंद करण्याचं आहे. विद्यार्थी असो, तरुण असो की शेतकरी असो त्यांचा आवाज बुलंद करणं हे माझं काम आहे. त्यांच्या वेदनांना वाचा फोडणं आहे. मला पंच बसला ही मोठी गोष्ट नाही. ही काही समस्या नाही. अजून पंच खायला मी तयार आहे.

पोलीस म्हणाले सरकारला हटवा…

पुढे बोलताना राहुल गांधी यांनी सांगितलं की, ‘मला माझ्या सुरक्षेची चिंता नाही. पोलिस मला फरफटत घेऊन गेले. पण माझ्या कानात सांगत होते या सरकारला हटवा. खरंच. मी राजस्थानचा आहे. यांना हटवा. आम्ही केवळ वर्दी घालून आलो आहोत. दुसरा म्हणत होता, मी हरियाणाचा आहे. त्यांना हटवा. हे वास्तव आहे. त्या बिचाऱ्यांना फक्त ऑर्डर फॉलो करायची असते.’

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...