AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या वीरपुत्रांना अखेरचा सलाम, निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला

मुंबई : जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील दोन वीरपुत्रांवर त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यातील सीआरपीएफ जवान संजय राजपूत आणि नितीन राठोड यांना गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलं. त्यांचं पार्थिव आज मूळगावी आणण्यात आलं. त्याआधी औरंगाबाद विमानतळावर या वीरांच्या पार्थिवाला वंदन केलं. या वीरांना अखेरचा सलाम करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटला. […]

महाराष्ट्राच्या वीरपुत्रांना अखेरचा सलाम, निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM
Share

मुंबई : जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील दोन वीरपुत्रांवर त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यातील सीआरपीएफ जवान संजय राजपूत आणि नितीन राठोड यांना गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलं. त्यांचं पार्थिव आज मूळगावी आणण्यात आलं. त्याआधी औरंगाबाद विमानतळावर या वीरांच्या पार्थिवाला वंदन केलं. या वीरांना अखेरचा सलाम करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटला. संजय राजपूत यांच्यावर मलकापूरमध्ये तर नितीन राठोड यांच्यावर लोणार तालुक्यातील चोरपांग्रा इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama Attack) जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात बुलडाण्यातील मलकापूर येथील 49 वर्षीय संजय राजपूत आणि लोणार तालुक्यातील चोरपांग्रा येथील नितीन राठोड या दोन जवानांना वीरमरण आलं. संजय राजपूत 10 दिवसापूर्वी सुट्टी संपवून काश्मीरला गेले होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबासह मित्रांनाही मोठा हादरा बसला आहे.

कोण होते संजय राजपूत?

संजय राजपूत हे 115 बटालियनचे होते. त्यांना 3 भाऊ आणि 1 बहीण आहे. यातील एका भावाचा अपघातात मृत्यू झाला होता. सध्या दोघे भाऊ आहेत. संजय यांना 12 वर्षीय जय आणि 11 वर्षांचा शुभम अशी 2 मुले आहेत. 8 मे 1973 रोजी जन्मलेले संजय राजपूत हे वयाच्या 23 व्या वर्षी भरती झाले होते. त्यांची सीआरपीएफमध्ये 20 वर्षे पूर्ण झाली होती. मात्र त्यांनी पाच वर्षे वाढवून घेतली होती.

वाचा: पुलवामा हल्ल्यानंतर मोदींकडून पाकिस्तानला 10 इशारे

अतिशय गरीब परिस्थितीत 8 मे 1973 रोजी संजय राजपूत यांचा जन्म झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण मलकापूरच्या नूतन विद्यालयात झालं. तर माध्यमिक शिक्षण हे जनता कला महाविद्यालयात झालं. शाळेच्या दिवसातच संजय यांना देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती, म्हणून त्यांनी एनसीसी जॉईन केली. त्यानंतरच बारावीनंतर ते सीआरपीएफमध्ये भरती झाले होते.

1996 मध्ये ते नागपूरमध्ये सीआरपीएफमध्ये भरती झाले. त्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग त्रिपुरामध्ये झाली होती. संजय यांनी देशासाठी 23 वर्ष सेवा केली..त्यात त्यांनी 5 वर्ष वाढवून घेतली होती.

वाचा: पुलवामा हल्ला : कुणी सुट्टी संपवून परतलं होतं, तर कुणाचं लग्न ठरलं होतं

संजय यांनी देशासाठी प्राणांची बाजी लावली. याचा त्यांच्या कुटुंबाला सार्थ अभिमान आहे. मात्र शत्रूशी दोन हात करताना नाही तर पाकिस्तानच्या भेकड हल्ल्यात त्यांना जीव गमवावा लागल्याचं दुःखही आहे.

संजय राजपूत यांच्या निधनानं अवघ्या राज्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या शौर्याचं आणि बलिदानाचं प्रतिक म्हणून येत्या काळात मलकापूरमध्ये त्यांचं स्मारक बांधण्यात येणार आहे.

कोण होते नितीन राठोड?

काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातीचे सुपुत्र शहीद झालेत. नितीन राठोड यांना पुलवामात वीरमरण आलं. नितीन राठोर हे बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्याल्या चोरपांग्री गावाचे रहिवाशी होते. नितीन राठोड यांना विरमरण आल्याची बातमी समजातच त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. पत्नी आणि आई वडिलांच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचं नाव घेत नाही. गावातही शोककळा पसरली आहे. नितीन राठोड यांना विरमरण आल्याची बातमी समजातच गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या घरी धाव घेतली. संपूर्ण गावात शोककळा पसरली. त्यामुळं दहशतवादी हल्ला करणाऱ्या लोकांना भारत सरकारनं चांगलाच धडा शिकवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. पाकिस्तानला चांगला धडा शिकवल्याशिवाय हल्ले थांबणार नाहीत. त्यामुळं पाकिस्तानला त्यांच्या घरात जावून मारा अशा तीव्र भावना नागरिकांनी व्यक्त केल्यात.

पुलवामा हल्ला

जम्मू काश्मीरच्या पुलवामा इथं गुरुवारी (14 फेब्रुवारी) मोठा दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे जवळपास 40 जवान शहीद झाले आहेत, तर 38 जवान जखमी आहेत. जखमी जवानांवर जम्मूतील बदामीबागच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले जवान 92, 17, 54, 82, 61, 21, 98, 118, 76, 45, 3 आणि 176 या बटालीयनचे होते. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने (Jaish E Mohammed) या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. आदिल अहमद डार (Adil Ahmad Dar) नावाच्या दहशतवाद्याने हा आत्मघाती हल्ला केला. आदिल हा पुलावामातील काकापोरा भागात राहात होता.

व्हिडीओ पाहा :

Follow Us
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत
महायुतीसमोरचं सर्वात मोठं संकट टळलं; गोकुळ गीते यांचं बंड अखेर थंडावलं
मोठी ब्रेकिंग! महायुतीसमोरचं सर्वात मोठं संकट टळलं; गोकुळ गीते यांचं बंड अखेर थंडावलं
घरं फोडा, पक्ष फोडा आणि सत्तेत या! भाजप सरकारवर सुळेंचा हल्लाबोल
Supriya Sule | घरं फोडा, पक्ष फोडा आणि सत्तेत या! भाजप सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
कुंभार समाजाला सरकारची मोठी भेट! बावनकुळेंची थेट महत्त्वाची घोषणा
Chandrashekhar Bawankule | कुंभार समाजाला सरकारची मोठी भेट! बावनकुळेंची थेट महत्त्वाची घोषणा; नेमका काय फायदा होणार?
मोठी बातमी! लोकसभेची सदस्यसंख्या 824 पर्यंत वाढवणार? सल्लागारांच्या
मोठी बातमी! लोकसभेची सदस्यसंख्या 824 पर्यंत वाढवणार? सल्लागारांच्या शिफारस पत्रात नेमकं काय?
अखेरचा पत्ता उघडणार! गोकुळ गितेसोबत उदय सामंत अन् गिरिश महाजनांच्या
अखेरचा पत्ता उघडणार! गोकुळ गितेसोबत उदय सामंत अन् गिरिश महाजनांच्या अंतिम चर्चेत नेमकं काय घडलं?
एकच खळबळ! मशिदीच्या भिंतीआड भयंकर कांड; 7 वर्षाच्या.... नेमकं काय घडलं
एकच खळबळ! मशिदीच्या भिंतीआड भयंकर कांड; 7 वर्षाच्या.... नेमकं काय घडलं?