AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासगी बस 500 फूट दरीत कोसळली, 43 प्रवाशांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशातील पर्यटन स्थळ कुलूमध्ये एक खासगी बस 500 फूट दरीत कोसळून 43 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 35 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत.

खासगी बस 500 फूट दरीत कोसळली, 43 प्रवाशांचा मृत्यू
| Updated on: Jun 20, 2019 | 11:10 PM
Share

शिमला : हिमाचल प्रदेशातील पर्यटन स्थळ कुलूमध्ये एक खासगी बस 500 फूट दरीत कोसळून 43 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 35 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. आज (20 जून) रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, या खासगी बसमध्ये जवळपास 60 पेक्षा जास्त प्रवाशी होते. तर काही प्रवाशी बसच्या छतावरही बसले होते. ही बस कुलूजवळी बंजारच्या भेउटजवळच्या घाटातून गाडागुशैणी याठिकाणी जात असताना हा अपघात घडला. यावेळी भेउट घाटातील धोकादायक वळणावर बस 500 फूट दरीत कोसळली. यात जवळपास 43 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान या ठिकाणी पोलीस, प्रशासन आणि स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. तसेच स्थानिक लोक पाठीवर बसवून जखमींना दरीतून वर काढत आहेत. आतापर्यंत बसमधील काही जखमींना दरीतून वर काढण्यात आले आहे. या सर्व जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.