AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा सल्ला, उद्धव ठाकरेंवर जितेंद्रानंदांची जहरी टीका

अखिल भारतीय संत समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे (Jitendranand Saraswati criticize Uddhav Thackeray).

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा सल्ला, उद्धव ठाकरेंवर जितेंद्रानंदांची जहरी टीका
| Updated on: Aug 03, 2020 | 8:21 AM
Share

नवी दिल्ली : हिंदू साधू आणि संतांच्या सर्वोच्च संस्थांपैकी एक अखिल भारतीय संत समितीने राम मंदिर भूमिपूजनाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे (Jitendranand Saraswati criticize Uddhav Thackeray). उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करता राम मंदिर भूमिपूजन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्याची सूचना केली होती. यावर अखिल भारतीय संत समितीचे महासचिव जितेंद्रानंद सरस्वती यांनी जहरी टीका केली. उद्धव ठाकरे मोठ्या नेत्याचा नालायक मुलगा असल्याची जहरी टीका त्यांनी केली. त्यामुळे आता शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता आहे.

जितेंद्रानंद सरस्वती म्हणाले, “उद्धव ठाकरे एका मोठ्या नेत्याचा नालायक मुलगा आहे. ते त्या मोठ्या नेत्याच्या वारशावर ताबा मिळवत आहेत. उद्धव ठाकरे यांनी एका कॉनव्हेंट शाळेत शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे त्यांना वास्तवात आणि व्हर्च्युअल यातला फरक कळत नाही.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“इटालियन बटालियनच्या कुशीत बसल्याने असंच होणार”

जितेंद्रानंद सरस्वती म्हणाले, “बापाच्या वारशांवर नालायक मुलगा बसला आहे. त्याला धर्म, अध्यात्माची भाषा राजकारणाची भाषा वाटते आहे हे दुखद आहे. इटालियन बटालियनच्या कुशीत बसल्यावर हेच होणार आहे. तुम्ही यापेक्षा अधिक काही अपेक्षितही करु शकता?”

सरस्वती यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतानाच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राम मंदिराला पाठिंबा देण्याच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांचे वडील एक मोठी व्यक्ती होते. मात्र, उद्धव ठाकरे एका मिशनरी शाळेत शिकत होते आणि आता त्यांना आभासी आणि वास्तवामधील फरक लक्षात येत नाही. पृथ्वीला स्पर्श केल्याशिवाय भूमिपूजन कसं करु शकतो?”

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

भूमिपूजनासाठी आमंत्रित धर्मगुरुंनी सांगितलं, की या कार्यक्रमात सहभागी होणारे उद्योगपती अयोध्याचं पुनर्निमाण करण्यासाठी मदत करणार आहेत. आजची अयोध्या भविष्यात भारताची अध्यात्मिक राजधानी असेल. अनेक उद्योगपती येथे येणार आहेत. ते अयोध्येची पुनर्निमिती करण्यात मदत करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे.”

“आता काशी आणि मथुरेतील मंदिरांची प्रतिक्षा”

जितेंद्रानंद सरस्वती आता काशी आणि मथुरामध्ये देखील भविष्यात मंदिरं निर्माण करण्यासाठी उत्सुक आहेत. ते म्हणाले, “आपण राम जन्मभूमीनंतर कृष्ण जन्मभूमीचे देखील साक्षीदार असू अशी अपेक्षा आहे. काशी आणि मथुरा आमच्यासाठी वेगळे नाहीत. आम्हाला केवळ आमची 3 मंदिरं परत हवी आहेत. ”

हेही वाचा :

शिवसेनेकडून एक रुपयाही नाही, अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांचा दावा; अनिल देसाईंकडून स्पष्टीकरण

Ayodhya Ram Mandir : राम मंदिराचा प्रसाद दुतावासांमार्फत जगभर वाटणार, अयोध्येत 1 लाख 11 हजार लाडूंची तयारी

Ayodhya Ram Mandir | रामाच्या जन्मापासून ते लंका दहनापर्यंतचे सर्व प्रसंग भिंतीवर, भूमिपूजनासाठी अयोध्या सज्ज

Jitendranand Saraswati criticize Uddhav Thackeray

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.