AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“कर्नाटकचा निकाल म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या विजयाची सुरूवात”

Karnataka Assembly Election Results 2023 Counting Update : कर्नाटकातील निवडणुकीचा निकाल, 2024 ची लोकसभा निवडणूक अन् काँग्रेसचा नवा आशेचा किरण; वाचा सविस्तर...

कर्नाटकचा निकाल म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या विजयाची सुरूवात
| Updated on: May 13, 2023 | 3:12 PM
Share

Karnataka Assembly Election Results 2023 Counting Update : कर्नाटकातील विजय ही लोकसभा निवडणुकीच्या विजयाची सुरुवात आहे, असं काँग्रेसचे नेते म्हणत आहेत. कर्नाटकात काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेस 134 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपला 67 जागांवर समाधान मानावं लागत आहे. जेडीएस 19 जागांवर पुढे आहे. तर अपक्ष आणि इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत. कर्नाटकच्या आजच्या निकालांमुळे काँग्रेसला पुन्हा नवा आशावाद मिळाला आहे. काँग्रेसच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

ही तर लोकसभा निवडणुकीच्या विजयाची सुरुवात

काँग्रेसचे माजी गृहमंत्री एम. बी. पाटील यांनी कर्नाटकच्या निवडणुकीच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसच्या 2024 च्या लोकसभा विजयाचा गुलाल कर्नाटकातून उधळला आहे, असं एम. बी. पाटील यांनी म्हटलं आहे. भाजपने केलेल्या भ्रष्टाचाराला कर्नाटकातील जनतेने नाकारलं. भाजप सरकारने कर्नाटकमध्ये चाळीस टक्के भ्रष्टाचार केला होता, त्यामुळं जनतेने त्यांना नाकारलं आहे. इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांनी कर्नाटकमधूनच विजयाची सुरवात केली होती. आताही 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या विजयाची सुरूवात आज झाली आहे, असं ते म्हणालेत.

कर्नाटकात मुख्यमंत्री कोण होईल? यावर एम. बी. पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच सत्तास्थापनेच्या आगामी कार्यक्रमावरही ते बोलतेत.

राज्यातील लिंगायत समाज, धनगर, एस.सी., एस.टी. तसेच वाक्कलगी आदी समाज सुरवातीपासून काँग्रेससोबत होता. जनतेच्या बळावरच काँग्रेस सत्तेत आलीये. मुख्यमंत्री कोण असेल हे हायकमांड ठरवतील. आम्ही हैद्राबादला जाणार नाही तर बंगळुरूमध्ये आमची बैठक होणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

कर्नाटकातील विजयावर राहुल गांधी म्हणतात…

कर्नाटकात काँग्रेसला घवघवीत यश मिळालं आहे. त्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी कर्नाटकच्या जनतेचे आभार मानलेत. कर्नाटक निवडणुकीत एका बाजूला गरीब जनता होती आणि एका बाजूला ताकतवर नेते होते. आम्ही गरिबांच्या मुद्द्यांवर लढलो. आम्ही द्वेषाने राजकारण करत लढाई लढलो नाही. कर्नाटकात द्वेषाचा बाजार बंद झाला आहे प्रेमाची दुकान खोलली आहेत. आम्ही कर्नाटकच्या जनतेला जी आश्वासनं दिली होती. ती आम्ही पूर्ण करणार आहोत, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यावेळी दिली.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.