AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका व्यक्तीला एकच घर, सरकार नवे गृहनिर्माण धोरण आणण्याच्या तयारीत

राज्य सरकार गृहनिर्माण धोरणात मोठे बदल करण्याची शक्यता आहे. नव्या धोरणानुसार सरकारी योजनांमध्ये एकदा घर मिळाल्यास पुन्हा अर्ज करता येणार नाही.

एका व्यक्तीला एकच घर, सरकार नवे गृहनिर्माण धोरण आणण्याच्या तयारीत
तुमच्याकडे जेवढे पैसे असतील तेवढेच कर्ज फेडले तरी हरकत नाही. कर्जाची मूळ रक्कम कमी झाल्यास साहजिकच तुमचे व्याजही कमी होईल. त्यामुळे तुम्हाला कमी रकमेचा हप्ता भरावा लागेल. लोन फोरक्लोझरसाठी केवायएसी आणि इतर कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतील. लोन फोरक्लोजर करताना तुमच्या मालमत्तेची कागदपत्र बँकेकडून घ्यायया विसरु नका.
| Updated on: Aug 16, 2019 | 9:39 AM
Share

मुंबई : राज्य सरकार गृहनिर्माण धोरणात (housing policy) मोठे बदल करण्याची शक्यता आहे. नव्या धोरणानुसार सरकारी योजनांमध्ये एकदा घर मिळाल्यास पुन्हा अर्ज करता येणार नाही. म्हणजेच एक व्यक्ती एक घर, अशी योजना आणण्याची तयारी सरकारची आहे. त्यानुसार म्हाडा, सिडको किंवा केंद्रीय योजनांमध्ये बदल लागू झाल्यास, एकदा घर मिळाल्यावर, दुसऱ्या कोणत्या योजनेमध्ये घरासाठी पुन्हा अर्ज करता येणार नाही.

सरकारी योजनांमध्ये एकदा घर मिळूनही अनेकजण अनेकवेळा अर्ज करतात. परिणामी वर्षानुवर्षे घरासाठी वाट पाहणाऱ्यांना घरापासून वंचित राहावं लागतं. अनेकांनी म्हाडा, सिडको लॉटरीमध्ये घरे मिळाली असूनही, पुन्हा-पुन्हा अर्ज केल्याचं पाहायला मिळतं.

शिवाय एका विभागातील सोडतीत घर मिळालं, तरी दुसऱ्या विभागातही अर्ज केला जातो. जसे पुण्यातील गृहनिर्माण योजनेत घर मिळालं तरी मुंबईत किंवा महाराष्ट्रातील अन्य योजनांसाठी अर्ज केला जातो.

जर नवं धोरण लागू झालं तर यावर बंदी येऊन, गरजवंतांपर्यंत सरकारी गृहनिर्माण योजना पोहोचतील, अशी सरकारची धारणा आहे.

मुंबई म्हाडाचे अध्यक्ष मधू चव्हाण यांची प्रतिक्रिया

“सरकारच्या बदलाबाबत अद्याप माहिती नाही. नवा बदल नक्कीच आम्हाला समजेल. जर सरकार असा कोणता बदल करणार असेल, तर तो निर्णय नक्कीच स्वागतार्ह असेल. कारण जर एखाद्याची पुण्याला जागा असते आणि पुन्हा मुंबईत अर्ज केला जातो. त्यामुळे खरोखरचे गरजवंत मागे पडतात. त्यामुळे सरकारने जर असा निर्णय घेतला तर मी अभिनंदन करतो”, असं मुंबई म्हाडाचे अध्यक्ष मधू चव्हाण म्हणाले.

संबंधित बातम्या 

म्हाडाच्या 14 हजार 621 घरांसाठी ऑगस्ट महिन्यात लॉटरी 

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.