सोलापूरहून निघालेल्या मजुरांच्या एसटीला यवतमाळमध्ये भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

| Updated on: May 19, 2020 | 8:55 AM

मजुरांना आपल्या मूळगावी घेऊन जाणाऱ्या एसटी बसने टिप्परला मागून धडक दिली. बसमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 22 जण जखमी आहेत. (Migrant Workers travelling from Solapur to Jharkhand killed in Bus Accident in Yawatmal)

सोलापूरहून निघालेल्या मजुरांच्या एसटीला यवतमाळमध्ये भीषण अपघात, चौघांचा मृत्यू
Follow us on

यवतमाळ : लॉकडाऊनच्या घरची वाट धरणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या अपघाताचं सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. सोलापूरहून कामगारांना झारखंडला घेऊन जाणाऱ्या एसटी बसची टिप्परला धडक बसून यवतमाळमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये बसमधील चौघा मजुरांचा जागीच मृत्यू झाला. (Migrant Workers travelling from Solapur to Jharkhand killed in Bus Accident in Yawatmal)

मजुरांना आपल्या मूळगावी घेऊन जाणाऱ्या एसटी बसने टिप्परला मागून धडक दिली. यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णीजवळील कोळवन गावानजीक हा अपघात झाला. सोलापूरहून निघालेले मजूर एसटी बसने झारखंड राज्यात जात होते.

ही धडक इतकी भीषण होती, की बसमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 22 जण जखमी आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना उपचारासाठी आर्णी आणि यवतमाळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

हेही वाचाउत्तर प्रदेशमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात, 24 जणांचा मृत्यू

चार दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या औरैया जिल्ह्यात मजुरांनी भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला होता. एका मालवाहू ट्रकने मजुरांनी भरलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला होता. या दुर्घटनेत 23 मजुरांचा जागेवर मृत्यू झाला तर एका मजुराचा उपचारदरम्यान मृत्यू झाला होता.

गेल्या आठवड्यात बिहारला जाणाऱ्या स्थलांतरित कामगारांचा उत्तर प्रदेशमध्ये बसखाली चिरडून मृत्यू झाला होता. मुझफ्फरनगर-सहारनपूर महामार्गावरुन चालणार्‍या सहा मजुरांना भरधाव बसने चिरडले होते. घळौली चेकपोस्टजवळ रात्री उशिरा हा अपघात झाला होता.

मालवाहू ट्रेनखाली चिरडून 16 मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली होती. रात्रीच्या वेळेस रेल्वे रुळावरच विश्रांती घेण्यासाठी झोपलेल्या मजुरांचा पहाटेच्या सुमारास करुण अंत झाला. जालन्यातील स्टील कंपनीत काम करणारे मजूर मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी होते. (Migrant Workers travelling from Solapur to Jharkhand killed in Bus Accident in Yawatmal)