AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यंदा इंजिनला डब्बा लागेल, इंजिन सुस्साट सुटेल; मनसे आमदाराचं सूचक विधान

येणाऱ्या सत्तेत आमचा सहभाग असेल आणि 2029 मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आमचा असेल असा आशावाद मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसे आमदाराने सूचक वक्तव्यं केलेलं आहे.

यंदा इंजिनला डब्बा लागेल, इंजिन सुस्साट सुटेल; मनसे आमदाराचं सूचक विधान
महाविकास आघाडीसोबत आम्ही जाणार नाहीत. शिवसेनेत असताना माझा सर्वाधिक संबंध भाजपशीच आला. सरकार महायुतीचं बनणार, 3 महिन्यापूर्वी मविआचं सरकार येणार असं वाटत होतं. पण हरियाणाच्या निकालानंतर थोडं चित्र बदललं आहे, मात्र महायुतीला इतकं सोपंही नाही. मुख्यमंत्री भाजपचा होईल, आणि मनसे सत्तेत असेल. भाजपचा मुख्यमंत्री मनसेच्या साथीनं होईल असं राज ठाकरे म्हणालेत.
| Updated on: Oct 31, 2024 | 1:30 PM
Share

मी शाळा-कॉलेजात असल्यापासून डोंबिवलीच्या फडके रोडवर दिवाळी आणि गुढीपाडव्याला येत आलो आहे. येथे येऊन तरुणांशी संवाद साधतो. डोंबिवलीची जी शान आहे ती फडके रोड…या ठिकाणी येऊन आणि आनंद घेत असतो. माझा विरोधकांनाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. येणारा काळ त्यांना भरभराटीचे जावो आणि जो सत्तेत येईल त्यांना ,सुसंस्कृतपणे सत्ता आणि राज्य करण्याची सदबुद्धी मिळो असे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी म्हटले आहे. सणासुदीत राजकारण आणू नये, प्रत्येकाने हा सण आपल्या पद्धतीने साजरा करावा असेही राजू पाटील यावेळी म्हणाले.

डोंबीवली येथील गणेश मंदिराचा सिद्धिविनायक मंदिरासारखे आहे. मी येथे गणेशाचा आशीवार्द घ्यायला त्याला साकंड घालायला देखील आलो असल्याचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी म्हटले आहे. सर्वांचे आरोग्य व्यवस्थित राहो आणि माझ्या पक्षाला भरभरुन यश मिळो असेही राजू पाटील यांनी यावेळी सांगितले. मनसेला या ठिकाणी चांगलं यश मिळणार आहे.राज ठाकरे यांनी स्वतः म्हटलंय की आम्ही सत्तेत असणार आहे. येणारा काळ हा माणसासाठी चांगला असणार असणार आहे असा आत्मविश्वासही राजू पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

यंदा इंजिनाला डब्बाही लागेल

यावेळेस 100% इंजिन धावणार आहे. पाच वर्षे एकटं इंजिन धावत होते. यावेळेस त्याला डब्बाही लागलेला असेल, त्यामुळे हे इंजिन सुसाट धावेल असे राजू पाटील यावेळी म्हणाले. सगळीकडे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे राज ठाकरे यांची भूमिका लोकांना पटत आहे. राजकारणाचा चिखल झालेला आहे त्यात सुधार आणि दुरुस्ती करण्यासाठी राजकारणातील शान आणि महाराष्ट्राची संस्कृती परत कशी येईल यासाठी राज ठाकरे यांनी जाहिरात दिली होती ती लोकांना भावली. त्यामुळे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला राजकारणाची पत आणि पोस्त सुधारली पाहिजे असे लोकांचे मत आहे. त्या अनुषंगाने आम्हाला चांगल्या समर्थन मिळत आहे, त्यामुळे आमचे इंजिन सुसाट धावणार असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Follow Us
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत.
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ.
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप.
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची....
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची.....
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल.
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर....
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर.....
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या...
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या....
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.