सात दिवस, 64 विमानांची उड्डाणे, तेरा देशांत अडकलेले 14 हजार 800 भारतीय मायदेशी परतणार

यूएई, यूके, यूएसए, कतार, सौदी अरेबिया, सिंगापूर, मलेशिया, फिलिपिन्स, बांगलादेश, बहारेन, कुवैत आणि ओमान या तेरा देशांमधून भारतीयांना मायदेशी परत आणले जाईल (14,800 Indian nationals stranded abroad to return by 64 flights in seven days)

सात दिवस, 64 विमानांची उड्डाणे, तेरा देशांत अडकलेले 14 हजार 800 भारतीय मायदेशी परतणार
Follow us
| Updated on: May 05, 2020 | 3:24 PM

नवी दिल्ली : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे 13 विविध देशांमध्ये अडकलेल्या सुमारे 14 हजार 800 भारतीय नागरिकांना परत आणण्याच्या हालचाली मोदी सरकारने सुरु केल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात या नागरिकांना परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने आराखडा तयार केला आहे. 7 ते 13 मे या आठवड्याभराच्या कालावधीत 64 विमानांनी टप्प्याटप्प्यात जवळपास 15 हजार भारतीय मायदेशी परत येतील. (14,800 Indian nationals stranded abroad to return by 64 flights in seven days)

पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवार 7 मे रोजी दहा विमानांच्या उड्डाणांनी 2300 भारतीय परतणार आहेत. दुसर्‍या दिवशी नऊ देशांतील 2050 भारतीय नागरिक चेन्नई, कोची, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरु आणि दिल्लीला परत जातील. तिसर्‍या दिवशी 13 देशांतील अंदाजे 2050 भारतीय चेन्नई, कोची, मुंबई, लखनौ आणि दिल्लीला परततील. चौथ्या दिवशी अमेरिका, यूएई आणि लंडनहून 1850 भारतीयांना परत आणण्याची योजना आहे.

एअर इंडियाची उड्डाणे होणार

एअर इंडिया आणि त्यांचे सहाय्यक ‘एअर इंडिया एक्सप्रेस’मार्फत ही विशेष उड्डाणे केली जातील. यूएई, यूके, यूएसए, कतार, सौदी अरेबिया, सिंगापूर, मलेशिया, फिलिपिन्स, बांगलादेश, बहारेन, कुवैत आणि ओमान या तेरा देशांमधून भारतीयांना मायदेशी परत आणले जाईल.

7 ते 13 मे दरम्यान भारतातून यूएईसाठी 10, यूएस आणि ब्रिटनसाठी प्रत्येकी सात, सौदी अरेबिया आणि सिंगापूरला प्रत्येकी पाच, तर कतारसाठी दोन विमानांचं उड्डाण होईल.

हेही वाचा : स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस उचलणार, सोनिया गांधींची घोषणा

बांगलादेश आणि मलेशियाला प्रत्येकी सात, तर कुवैत आणि फिलीपिन्सला प्रत्येकी पाच उड्डाणे होतील. या व्यतिरिक्त ओमान आणि बहारेनसाठी प्रत्येकी दोन उड्डाणे होणार आहेत.

64 उड्डाणांपैकी केरळमधून 15, दिल्ली आणि तामिळनाडूहून प्रत्येकी 11, महाराष्ट्र आणि तेलंगणा येथून प्रत्येकी सात, तर उर्वरित उड्डाणे पाच इतर राज्यांमधून होतील. अमेरिकेत मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी आणि पर्यटक अडकले असल्याने येत्या आठवड्यात विमानांची संख्या वाढवली जाऊ शकते.

(14,800 Indian nationals stranded abroad to return by 64 flights in seven days)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.