पार्थ पवार आणि लक्ष्मण जगतापांच्या भेटीने भुवया उंचावल्या

| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

पुणे: मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार आज प्रचारानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात आहेत. आज शिवजयंती असल्यामुळे त्यांनी शहरातील तरुण मंडळांच्या भेटी घेतल्या. पिंपळे गुरवमध्ये मंडळांच्या भेटीला ते गेले होते. त्यावेळी भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप हे देखील त्यावेळी मंडळांच्या भेटीसाठी तिथे आले होते. हे दोघेही एकाचवेळी आल्यामुळे उपस्थित मंडळी गोंधळात पडली. दोघांनी एकमेकांची विचारपूस करुन हातात […]

पार्थ पवार आणि लक्ष्मण जगतापांच्या भेटीने भुवया उंचावल्या
Follow us on

पुणे: मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार आज प्रचारानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात आहेत. आज शिवजयंती असल्यामुळे त्यांनी शहरातील तरुण मंडळांच्या भेटी घेतल्या. पिंपळे गुरवमध्ये मंडळांच्या भेटीला ते गेले होते. त्यावेळी भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप हे देखील त्यावेळी मंडळांच्या भेटीसाठी तिथे आले होते. हे दोघेही एकाचवेळी आल्यामुळे उपस्थित मंडळी गोंधळात पडली. दोघांनी एकमेकांची विचारपूस करुन हातात हात दिला.

या दोघांमध्ये इथे कुठलीच राजकीय चर्चा झाली नसली तरी, हे दोघे एकत्र आल्यामुळे पुढची समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मावळमध्ये पार्थ पवारांविरोधात शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे रणांगणात आहेत. मात्र श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला लक्ष्मण जगताप यांचा विरोध आहे. ते सध्या नाराज आहेत. स्वत: लक्ष्मण जगताप मावळमधून लढण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी शेवटपर्यंत मतदारसंघ भाजपला सोडण्यासाठी प्रयत्न केला. पण ही जागा शिवसेनेकडे असल्याने श्रीरंग बारणे यांनाच तिकीट मिळालं.

त्यामुळे नाराज जगताप आता युतीचा प्रचार करणार का? असा सवाल राजकीय जाणकारांना पडला असताना, आज पार्थ पवार आणि लक्ष्मण जगताप एकत्र आल्यामुळे वेगळ्याच चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लक्ष्मण जगताप यांच्या सहकाऱ्यांनी श्रीरंग बारणे यांच्याविरोधात काम करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पार्थ पवार आणि लक्ष्मण जगताप यांच्या आजच्या भेटीला महत्व आहे. बारणे आणि लक्ष्मण जगताप हे राजकरणतील विरोधक आहेत. लक्ष्मण जगताप युतीचा धर्म निभावणार की अजित पवार यांना मदत करुन मागील निवडणुकीचा बदला घेणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांचा श्रीरंग बारणेंनी पराभव केला होता.