पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर राज्याचा विकास करण्यासाठी जनतेला शब्द दिलाय. देशाला संबोधित करताना या राज्याचा विकास करण्याचं व्हिजन मोदींनी समोर मांडलं. यापैकी काही मुद्द्यावर केंद्र सरकार तातडीने अंमलबजावणी करणार आहे.
परिस्थिती सामान्य होताच काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळेल, लडाख केंद्रशासित प्रदेशच राहिल.
इतर केंद्रशासित प्रदेशात असलेले सर्व अधिकार काश्मीर आणि लडाखमधील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतील.
जगातलं सर्वात सुंदर पर्यटनस्थळ बनवण्यासाठी पायाभूत सुविधा
काश्मीरच्या तरुणांना क्रीडा क्षेत्रात विकासासाठी चालना, हाताला रोजगार आणि भविष्याची सुरक्षा
क्रीडा क्षेत्रातील काश्मिरी तरुण परदेशातही भारताचा झेंडा फडकवतील
सिनेसृष्टीला गुंतवणुकीचं आवाहन
काश्मीरमध्ये सर्वांना मतदानाचा अधिकार मिळेल, काश्मिरी तरुण आता नेतृत्त्व करतील
पारदर्शक पद्धतीने विधानसभा निवडणूक होईल, लोकांना त्यांचा लोकप्रतिनिधी निवडता येईल.
अल्पसंख्यांकाच्या संरक्षणासाठीचा कायदा लागू होईल. यामुळे अल्पसंख्यांकांवर अन्याय होणार नाही.
कलम 370 मुळे दहशतवाद, परिवारवादाला बळ मिळालं. पण आता काश्मीरचा युवक स्वतःच्या भविष्यासाठी जागरुक होईल.