AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारचं आयात धोरण, शेतकऱ्यांना पुन्हा फटका; डाळींचे दर घसरले

एकीकडे डाळीचे दर घसरल्याने नागरिकांना फायदा आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना मात्र याचा फटका बसणार आहे.

सरकारचं आयात धोरण, शेतकऱ्यांना पुन्हा फटका; डाळींचे दर घसरले
| Edited By: | Updated on: Dec 07, 2020 | 8:40 AM
Share

नागपूर : कोरोनाच्या (Corona) जीवघेण्या संसर्गामुळे शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं. अशात आता केंद्राच्या आयात धोरणामुळे शेतकऱ्यांना आणखी एक फटका बसला आहे. केंद्र सरकारने (Central Government) आयात धोरणात बदल केल्यामुळे डाळींच्या दरात 25 टक्के घसरण झाली आहे. यामुळे सर्वसामन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण एकीकडे डाळीचे दर घसरल्याने नागरिकांना फायदा आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना मात्र याचा फटका बसणार आहे. (Pulses prices have fallen by 25 percent due to changes in import policy by the central government)

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व डाळींच्या दरांमध्ये घट झाली आहे. दिवाळीनंतर ही दर घसरल्यामुळे ही आनंदाची बातमी आहे. पण यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होणार आहे. मुंबई एपीएमसी (Mumbai APMC) धान्य मार्केटमध्ये डाळींचे भाव पुन्हा घसरू लागले आहेत. खरंतर, देशात डाळ निर्मितीमध्ये जळगावचा वाटा हा मोठा आहे. इथे तयार झालेली डाळ ही देशातील विविध भागांसह विदेशातही निर्यात केली जाते. त्यामुळे या सर्व कडधान्याच्या उत्पादनाचा एकूणच परिणाम हा जळगावच्या बाजारपेठेवर होत असतो.

सध्या महाराष्ट्रासह, राजस्थान, मध्यप्रदेश यांसारख्या भागातून मोठ्या प्रमाणात कच्चा माल येत असल्याने डाळींचे उत्पादन वाढत आहे. तसेच, डाळींचे भाव कमी होण्यासदेखील मदत होत आहे. डाळीच्या पुरवठा आणि मागणीत बरीच तफावत निर्माण झाल्याने गेल्या काही महिन्यांमध्ये भाववाढ झाल्याचं दिसून आलं होतं. या भाववाढीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने तुरीची आयात आणि नाफेडच्या साठ्यातून 3.6 लाख टन तूर खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला.

काय आहे आताचे डाळींचे दर?

– तुर डाळींच्या दरात प्रति किलो 20 ते 25 रुपयांची घसरण

– तुर डाळींचे दर कमी होऊन 50 ते 94 रुपये प्रति किलोवर

– चणा डाळीचे दर कमी होऊन 58 ते 64 रुपये किलोवर

दरम्यान, आयातीला प्रोत्साहन देण्यासाठी आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळेही डाळींच्या दरात घसरण झाल्याचं बोललं जात आहे. दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसांतही डाळीचे दर कमी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता सर्वसामान्यांना नागरिकांना चिंता करण्याची काही गरज नाही अशी माहिती डाळीच्या व्यापाऱ्यांकडून देण्यात आली आहे. (Pulses prices have fallen by 25 percent due to changes in import policy by the central government)

इतर बातम्या – 

उदय सामंतांची प्राध्यापकांसाठी मोठी घोषणा, तब्बल 7 वर्षानंतर संप काळातील वेतन मिळणार

Corona Vaccine | पुण्यात रशियाच्या लसीचं दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण, या चाचण्या घेणारं महाराष्ट्र पहिलं राज्य

(Pulses prices have fallen by 25 percent due to changes in import policy by the central government)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.