पुण्यात विळखा घट्ट, भवानी पेठेत 56 कोरोनाग्रस्त, कोणत्या वॉर्डमध्ये किती रुग्ण?

| Updated on: Apr 12, 2020 | 3:44 PM

भवानी पेठ परिसरात सर्वाधिक प्रादुर्भाव झाल्याचं दिसत आहे. दोन दिवसात 16 रुग्णांची वाढ झाल्याने इथे 56 रुग्णसंख्या झाली आहे. (Pune Corona Patient Ward wise Division)

पुण्यात विळखा घट्ट, भवानी पेठेत 56 कोरोनाग्रस्त, कोणत्या वॉर्डमध्ये किती रुग्ण?
Follow us on

पुणे : राज्यावरील कोरोनाचं सावट दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. पुण्यात आज (12 एप्रिल) दोन महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पुण्यात कोरोनामुळे आतापर्यंत 31 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. पुण्यातील कोणत्या वॉर्डमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक  (11 एप्रिलपर्यंत) झाला आहे, याची माहिती महापालिकेने जारी केली आहे. भवानी पेठ परिसरात सर्वाधिक म्हणजे 56 रुग्ण सापडले आहेत. (Pune Corona Patient Ward wise Division)

पुण्यातील संगमवाडी परिसरातील 58 वर्षीय आणि सोमवार पेठेतील 56 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दोन्ही रुग्णांना कोरोनाशिवाय इतर आजारही जडलेले होते.

दरम्यान, भवानी पेठ परिसरात सर्वाधिक प्रादुर्भाव झाल्याचं दिसत आहे. दोन दिवसात 16 रुग्णांची वाढ झाल्याने इथे 56 रुग्णसंख्या झाली आहे. कसबा-विश्रामबाग वाडा भागात 29, तर धनकवडी-सहकारनगरमध्ये 14 रुग्ण आहेत.

वॉर्ड – रुग्ण संख्या

औंध – बाणेर – 3
कोथरूड – बावधन – 1
सिंहगड रोड – 5
वारजे – कर्वेनगर – 1
धनकवडी – सहकारनगर – 14
कोंढवा – येवलेवाडी – 8
बिबवेवाडी – 8
हडपसर – मुंढवा – 21
वानवडी – रामटेकडी – 8
ढोले पाटील रोड – 28
भवानी पेठ – 56
कसबा – विश्रामबाग वाडा – 29
शिवाजीनगर – घोले रोड – 7
नगररोड – वडगावशेरी – 3
येरवडा – धनोरी – 9
पुण्याबाहेरील रुग्ण – 10

पुण्यात कोरोनाबाधितांचा मृत्यूदर देशात सर्वाधिक आहे. पुण्याचा मृत्यूदर हा 11. 96% असून त्या तुलनेने जगाचा मृत्यूदर 5.97 टक्के आहे. (Pune Corona Patient Ward wise Division)

हेही वाचा : Corona | महाराष्ट्राची विभागणी रेड, ऑरेंज, ग्रीन झोनमध्ये, कोणता जिल्हा कोणत्या विभागात?

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 1895 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात आज 134 नवे रुग्ण आढळले. यापैकी सर्वाधिक म्हणजे 113 मुंबईत आढळले आहेत. तर मीरा-भाइंदरमध्ये 7, पुण्यात 4; नवी मुंबई, ठाणे, वसई-विरारमध्ये प्रत्येकी 2, तर रायगड, अमरावती, भिवंडी, आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. 14 एप्रिल नाही, तर किमान 30 एप्रिलपर्यंत राज्यात लॉकडाऊन असणार आहे.