AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raymond Share : सिंघानिया परिवाराच्या वादाचा रेमंडच्या शेअरला फटका, नेमका काय आहे हा वाद?

Raymond Share, Gautam Singhania गेल्या पाच दिवसांत रेमंड कंपनीचे शेअर्स 132.70 रुपयांनी घसरले आहेत. बुधवारीही तो 4 टक्क्यांनी घसरून 1671 रुपयांवर बंद झाला. रेमंडचे शेअर्स गेल्या सात ट्रेडिंग सत्रांमध्ये 12.5 टक्क्यांनी घसरले आहेत. कंपनीचे बाजारमूल्यही 1500 कोटी रुपयांनी घसरून 11124.80 कोटी रुपयांवर आले आहे. गुरुवारी तो 1675 रुपयांवर चालू आहे. यासाठी कंपनीचे मालक गौतम सिंघानिया यांचा कौटूंबीक वाद कारणीभूत आहे.

Raymond Share : सिंघानिया परिवाराच्या वादाचा रेमंडच्या शेअरला फटका, नेमका काय आहे हा वाद?
रेमंडImage Credit source: Social Media
| Updated on: Nov 23, 2023 | 4:30 PM
Share

मुंबई : कौटूंबीक वाद चव्हाट्यावर आला की त्याचा फटका हा हमखास बसतो. याची अनेक उदाहरणं देखील आपल्यासमोर आहेत. व्यावसायीक क्षेत्रात अशाच एका वादाची जोरदार चर्चा सुरू आहे.  गौतम सिंघानिया (Gautam Singhania)  आणि त्यांची पत्नी नवाज मोदी यांच्यातील वादाचा रेमंड समूहावर खूप वाईट परिणाम होतांना दिसत आहे. नवाज मोदी यांनी गौतमपासून वेगळे होण्यासाठी संपत्तीतील 75 टक्के वाटा मागितला होता. गौतम सिंघानिया कौटुंबिक ट्रस्ट तयार करून ही रक्कम देण्यास तयार होते. पण नवाजने नकार दिला. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या वादाचा फटका कंपनीला बसत आहे. रेमंडच्या शेअरमध्ये जवळपास आठवडाभरापासून सातत्याने घसरण होत आहे. यामुळे कंपनीच्या बाजारमुल्यात थोडी थोडकी नाही तर 1500 कोटी रुपयांनी घसरण झाली आहे.

रेमंडच्या शेअरमध्ये होत आहे सातत्याने घसरण

गेल्या पाच दिवसांत कंपनीचे शेअर्स 132.70 रुपयांनी घसरले आहेत. बुधवारीही तो 4 टक्क्यांनी घसरून 1671 रुपयांवर बंद झाला. रेमंडचे शेअर्स गेल्या सात ट्रेडिंग सत्रांमध्ये 12.5 टक्क्यांनी घसरले आहेत. कंपनीचे बाजारमूल्यही 1500 कोटी रुपयांनी घसरून 11124.80 कोटी रुपयांवर आले आहे. गुरुवारी तो 1675 रुपयांवर चालू आहे.

नवाज मोदी हे रेमंडमध्ये आहेत समिती सदस्य

रेमंडमध्ये प्रवर्तकांची भागीदारी 49.11 टक्के आहे. गौतम सिंघानिया हे कंपनीचे एमडी आणि चेअरमन आहेत. नवाज मोदी हे देखील समितीत बिगर कार्यकारी संचालक आहेत. त्यांच्याकडे रेमंडचे सुमारे 2,500 शेअर्स आहेत. त्यामुळे ही कौटुंबिक समस्या राहण्याबरोबरच कंपनीशी संबंधित बाबही बनली आहे. गौतम सिंघानिया यांनी 13 नोव्हेंबर रोजी नवाज मोदींपासून वेगळे होण्याची घोषणा केली होती. रेमंड ग्रुपचा व्यवसाय फॅब्रिकपासून रिअल इस्टेटपर्यंत विस्तारलेला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीचे उत्पन्न सुमारे 8,215 कोटी रुपये होते. या काळात कंपनीला 537 कोटी रुपयांचा नफाही झाला होता.

पत्नी नवाजने मागितला आहे 75 टक्के हिस्सा

नवाज मोदींनी गौतम सिंघानियापासून वेगळे होण्यासाठी संपत्तीतील ७५ टक्के वाटा मागितला आहे. सिंघानिया ट्रस्ट स्थापन करून ही रक्कम देण्यास तयार होते. पण, नवाजने नकार दिला. गौतमच्या मृत्यूनंतर ही रक्कम नवाजकडे गेली असती.

नवाजने गौतमवर आपल्याला आणि आपल्या मुलीला मारहाण केल्याचा आरोपही केला आहे. नवाजचा दावा आहे की गौतमला मारहाणीचा अहवाल पोलिसात नोंदवायचा नव्हता. तथापि, रिपोर्ट्सनुसार, नीता अंबानी आणि त्यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या मदतीने हा अहवाल दाखल केला जाऊ शकतो. या सर्व वादामुळे गुंतवणूक दारांनी काढता पाय घेतला आहे. परिणामी कंपणीच्या भांडवलात घसरण झाली आहे.

कोंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा
कोंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु! नेमकं काय घडलं?
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु! नेमकं काय घडलं?.
अजित पवारांचा विलीनीकरणासाठी आग्रह होता - जयंत पाटील
अजित पवारांचा विलीनीकरणासाठी आग्रह होता - जयंत पाटील.
हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वाद; भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली
हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वाद; भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली.
राज्यभरात एटीएसची मोठी कारवाई; यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्ये छापे
राज्यभरात एटीएसची मोठी कारवाई; यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्ये छापे.
अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवारांचं अमित शाहांना पत्र
अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवारांचं अमित शाहांना पत्र.
महाराष्ट्र पालथा घातला असता तर...; राऊतांनी ठाकरे बंधूंचे कान टोचले
महाराष्ट्र पालथा घातला असता तर...; राऊतांनी ठाकरे बंधूंचे कान टोचले.
मी कान नाही टोचले, मी फक्त...; सामनातील अग्रलेखावर राऊतांचं उत्तर
मी कान नाही टोचले, मी फक्त...; सामनातील अग्रलेखावर राऊतांचं उत्तर.
मेट्रोच्या कामाच्या नावाखाली अख्खी मुंबई खोदून ठेवलीय; राऊतांची टीका
मेट्रोच्या कामाच्या नावाखाली अख्खी मुंबई खोदून ठेवलीय; राऊतांची टीका.
पैशाचा विषय येतो! भारत-पाक सामन्यावर संजय राऊतांचं मोठं विधान
पैशाचा विषय येतो! भारत-पाक सामन्यावर संजय राऊतांचं मोठं विधान.