AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अस्पृश्यता निवारणाचे शिलेदार महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या अफाट कार्याचे स्मृतिदिनी स्मरण!

कोणत्याही फळाची अपेक्षा न बाळगता काम करणारे थोर समाजसेवक म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे. त्यांचा आज 2 जानेवारी रोजी स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या अफाट कार्याची ओळख.

अस्पृश्यता निवारणाचे शिलेदार महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या अफाट कार्याचे स्मृतिदिनी स्मरण!
Maharshi Vitthal Ramji Shinde
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Jan 02, 2022 | 7:05 AM
Share

नाशिकः कोणत्याही फळाची अपेक्षा न बाळगता काम करणारे थोर समाजसेवक म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे. त्यांनी इंग्लंडला जावून त्या काळी उच्चशिक्षण घेतले. त्यानंतर भारतात परतल्यानंतर मोठमोठाले मान-सन्मान आणि नोकऱ्या नाकारून अस्पृश्यता निवारण आणि स्वातंत्र्यलढ्यात वाहून घेतले. शेतकरी चळवळीलाही बळ दिले. या थोर समाजसेवकाचा आज 2 जानेवारी रोजी स्मृतिदिन. त्यांच्या अफाट कार्याची ही ओळख.

इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण

विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म 23 एप्रिल 1873 रोजी कर्नाटकातील जमखंडी येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी प्रारंभी जमखंडी येथे शिक्षकाची नोकरी केली. पुढे वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. त्यासाठी त्यांना प्रार्थना समाजाने मदत केली. भारतात परतल्यानंतर त्यांनी मिळणारे सारे मान सन्मान, उच्च अधिकाराच्या जागा नाकारल्या आणि स्वतःला प्रार्थना समाजाच्या कार्याला वाहून घेतले. आपल्या समाजाला अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, कर्मकांड, रुढी आणि परंपररांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी अवघे जीवन समर्पित केले.

स्वातंत्र्यलढ्यात सहभागी

विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्वातंत्र्यलढात सहभाग घेतला. अस्पृश्यता निवारणाचे काम हाती घेतले. अस्पृश्य समजात शिक्षणाचा प्रसार घडवून आणणे, अस्पृश्यांना नोकरीची संधी मिळवून देणे, त्यांच्या अडचणी सोडवणे, त्यांना खऱ्या धर्माची शिक्षण देणे, त्यांच्या प्रगती आणि ज्ञानाची तहान निर्माण करणे यासाठी त्यांनी 18 ऑक्टोबर 1906 रोजी ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ची स्थापना केली. अस्पृश्य समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करण, अस्पृश्य बांधवांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या अडचणींचे निवारण करणे, अस्पृश्यांना खऱ्या धर्माची शिकवण देणे आणि त्यांचे शीलसंवर्धन घडून आणणे ही या मिशनची वैशिष्ट्ये होती.

राज्यभर काम

‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ संस्थेच्या माध्यमातून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यांमध्ये अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरू करणे, त्यांच्यासाठी वसतिगृहे उघडणे, शिवणकामाचे वर्ग चालवणे, प्रबोधनपर व्याख्याने कीर्तने आयोजित करणे, आजारी असणाऱ्या लोकांची सेवा करणे, इत्यादी गोष्टींचा समावेश या संस्थेच्या कार्यामध्ये होता. संस्थेच्या अकोला, अमरावती, इंदूर, कोल्हापूर, ठाणे, दापोली, पुणे, भावनगर, मद्रास, मालवण, मुंबई, सातारा, हुबळी, इत्यादी ठिकाणी उघडण्यात आल्या होत्या. सोबतच 1933 मध्ये ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ लिहिला. त्याद्वारे या प्रश्नाकडे लोकांचे लक्ष वेधण्याचे काम केले.

शेतकरी चळवळ

विठ्ठल रामजी शिंदे एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केले. त्यांना जागृत आणि संघटित करण्यासाठी त्या काळात शेतकरी परिषदांचे आयोजन केले. 1920 ते 1926 या काळात त्यांनी शेतकरी चळवळ उभी केली, पण सरकारने तुकडे बंदीचे बिल मागे घेताच चळ‍वळीत वाद सुरू झाले आणि चळवळ थांबली. आपल्या समाजातील पददलित, उपेक्षित वर्गाच्या उन्नतीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत ते झटले. मात्र, आयुष्यभर त्यांच्या कामाची उपेक्षाच झाली. या थोर समाजसेवकाने 2 जानेवारी 1944 रोजी या जगाचा निरोप घेतला.

विपुल लेखन

वि. रा. शिंदे यांनी विपुल लेखन केले. त्यांच्या आत्मपर लिखाणाचे अनेक खंड प्रकाशित झाले आहेत. पहिल्या खंडात भारतीय ‘अस्पृश्यतेचा प्रश्न : संशोधन आणि चिंतन’ हे लेखन आहे. दुसऱ्या खंडात महर्षी श‌िंदे यांच्या चार रोजनिशींचा समावेश असून, ‘माझ्या आठवणी व अनुभव’ हे 375 पानी आत्मचरित्र व काही प्रवासवर्णने आहेत. ‘माझ्या आठवणी व अनुभव’ नावाचे हे आत्मचरित्र तीन भागांत आहे. इंग्लंडमधील रोजनिशीत त्यांनी प्रथम त्यांच्या बोटीवरील प्रवासाबद्दल लिहिले आहे. ब्राह्मो समाजास शंभर वर्षे झाली, त्यानिमित्ताने शिंदे यांनी पश्चिम बंगालची सफर केली. तेव्हा ते ब्राह्मो उपासना केंद्रे चालवणाऱ्या रवींद्रनाथांना भेटले. त्यानंतर शिंदे पूर्व बंगालमध्ये गेले. तेथे त्यांनी वेगवेगळ्या शहरांत व गावांत ब्राह्मो धर्मावर भाषणे दिली.

वि. रा. शिंदे यांची ग्रंथसंपदा

– भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न -१९३३ – माझ्या आठवणी व अनुभव – भागवत धर्माचा विकास – मराठ्यांची पूर्वपीठिका – कानडी – मराठी संबंध – कोकणी – मराठी संबंध – Untouchable of India – History of Parihars – Thiestic directory

इतर बातम्याः

Corona Third Wave | ‘तेव्हा ऑटोमॅटिक लॉकडाऊन लागणार!’ आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं महत्त्वाचं आणि मोठं विधान

मोठी बातमी: मुंबईकरांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, 500 चौ.फुटापर्यंतचा मालमत्ता कर माफ !

Corona : बॉलिवूडमधल्या ‘या’ सेलिब्रिटींना झालेला कोरोनाचा संसर्ग, खबरदारी घेत केली यशस्वी मात! पाहा Photos

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?