AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वामन हरी पेठे ज्वेलर्समधून अर्धा क्विंटल सोने चोरीला

औरंगाबादमध्ये थोडेथोडके नव्हे तर तब्बल 58 किलो सोने चोरीला गेले आहेत.  वामन हरी पेठे ज्वेलर्समधून 27 कोटी रुपयांचे 58 किलो सोने चोरीला गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वामन हरी पेठे ज्वेलर्समधून अर्धा क्विंटल सोने चोरीला
यामुळे आताच सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची योग्य संधी आहे.
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 04, 2019 | 4:45 PM
Share

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये थोडेथोडके नव्हे तर तब्बल 58 किलो सोने चोरीला गेले आहेत.  वामन हरी पेठे ज्वेलर्समधून 27 कोटी रुपयांचे 58 किलो सोने चोरीला गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ज्वेलर्सचा मॅनेजर आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्धा क्विंटलपपेक्षा अधिक सोने चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादच्या समर्थनगर परिसरातील वामन हरी पेठे शाखेतून हे सोने चोरीला गेले आहे.

समर्थनगर भागातील वामन हरी पेठे ज्वेलर्समध्ये मॅनेजरनेच इतर तीन साथीदाराच्या मदतीने 27 कोटी 31 लाख रुपयांचे 58 किलो सोने लंपास केले. याप्रकरणी  पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. अंकुर राणे, राजेंद्र जैन, लोकेश जैन आणि एक महिला (सर्व राहणार औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत.

समर्थनगर भागातील पेठे ज्वेलर्समध्ये अंकुर राणे हा मॅनेजर पदावर कार्यरत होता. दुकानाची सर्व जबाबदारी विश्वासाने राणेवर सोपविण्यात आली होती. दुकानातील सोने हिरे दागदागिन्यांची विक्री आणि व्यवहार राणेच सांभाळत होता. मागील सहा महिन्यांपासून दुकानातील व्यवहारात अनियमितता आढळून आली.

याबाबत ऑडीट केली असता गैरव्यवहार समोर आला. त्यानंतर पेठे जेवलेर्सचे मालक विश्वनाथ प्रकाश पेठे (रा.मुंबई) यांना याबाबत माहिती मिळाली असता, त्यांनी शहानिशा केली आणि 58 किलो सोने लंपास असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पेठे यांच्या तक्रारी वरून क्रांतीचौक पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सूत्र हलवत अंकुर राणे ,राजेंद्र जैन, लोकेश जैन यांना अटक केली आहे.

Follow Us
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...