AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजीव बजाज काँग्रेसच्या जवळचे उद्योगपती, त्यांचं मत वैज्ञानिक नाही : सुधीर मुनगंटीवार

"राजीव बजाज काँग्रेसच्या जवळचे उद्योगपती आहेत (Sudhir Mungantiwar on Rajiv Bajaj Statement). त्यांनी मांडलेलं मत वैज्ञानिक नाही", असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

राजीव बजाज काँग्रेसच्या जवळचे उद्योगपती, त्यांचं मत वैज्ञानिक नाही : सुधीर मुनगंटीवार
| Updated on: Jun 05, 2020 | 8:45 PM
Share

चंद्रपूर :राजीव बजाज काँग्रेसच्या जवळचे उद्योगपती आहेत (Sudhir Mungantiwar on Rajiv Bajaj Statement). त्यांनी मांडलेलं मत वैज्ञानिक नाही. लोकशाहीत त्यांना किंवा इतर कुणालाही मत मांडण्याचा अधिकार आहे”, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. याशिवाय “लॉकडाऊन किती उपयोगी ठरलं यावरुन देशातील उद्योगपतींमध्ये दोन गट तयार झाले आहेत, असं म्हणता येणार नाही”, असंही मत त्यांनी मांडलं (Sudhir Mungantiwar on Rajiv Bajaj Statement).

प्रसिद्ध उद्योगपती राजीव बजाज यांनी काल (4 मे) काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत आर्थिक स्थितीवर आपली भूमिका स्पष्ट केली होती. भारताने अत्यंत कठोरपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी केली, यामुळे कोरोना तर आटोक्यात आला नाहीच, पण अर्थव्यवस्थादेखील कोलमडल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. त्यांच्या याच भूमिकेवर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली.

मुनगंटीवारांची राज्य सरकारवर टीका

“राज्य कर्मचार्‍यांचे पगार घेण्यासाठी कर्ज काढावे लागणार असल्याची वार्ता आश्चर्यजनक आहे. यामागचं कारणही कळत नाही. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती सुदृढ आहे. राज्याने आपल्या कर्जाचे नियमित हप्ते दिले असून गेल्या दोन-तीन महिन्यातच ही स्थिती नाजूक झाल्याचे चित्र रंगवणे योग्य नाही”, असं मुनगंटीवार म्हणाले.

“राज्यात विविध विभागांकडे एक लाख कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यांच्या व्याजावरच राज्याचे अनेक निर्णय धाडसाने घेतले जाऊ शकतात. याशिवाय केंद्रानेही कर्ज मर्यादा वाढवून दिली आहे. त्यातूनही आणखी कर्ज मिळते. राज्य सरकार स्वतः उदासीन वातावरण तयार करत महाराष्ट्राची छवी डागाळत आहे”, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

संबंधित बातमी :

लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त, मात्र लोक बोलायला घाबरत आहेत : राजीव बजाज

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.