AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुलाती है मगर जानेका नहीं, लिफ्ट मागून लुबाडणाऱ्या महिलेची दहशत

कराड तालुक्यातील मसूर, कोपर्डे भागात सध्या एक महिला चोराची दहशत माजली (karad women robbery) आहे.

बुलाती है मगर जानेका नहीं, लिफ्ट मागून लुबाडणाऱ्या महिलेची दहशत
| Edited By: | Updated on: Mar 04, 2020 | 4:02 PM
Share

सातारा : कराड तालुक्यातील मसूर, कोपर्डे भागात सध्या एक महिला चोराची दहशत माजली (karad women robbery) आहे. रात्रीच्या वेळी वाहनांना लिफ्ट मागून अडवून लूट मार करण्याचे प्रकार घडत आहेत. यातील एखाद दुसरा प्रकार खरा आहे. पण या घटनेवरुन परिसरात सध्या सोशल मीडियावर वो बुलाती है मगर जाने का नहीं, लिप्ट मांगती है रुकने का नहीं, या गाण्याखाली अफवांचे पेवच मसूर भागात फुटल्याने नागरिकांमध्ये भितीचे (karad women robbery) वातावरण आहे.

कराड तालुक्यातील मसूर, कोपर्डे हा सधन भाग आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामुळे या भागातील रस्त्यांवर सतत गर्दी असते. गेल्या काही दिवसांपूर्वी मसूर परिसरात शेतात गेलेल्या महिलेचा किरकोळ दागिन्यांसाठी चोरट्यांनी खून केला होता. तेव्हापासून लोकांमधे भिती आहे.

गेल्या आठवड्यात सह्याद्री कारखान्याचे कामगार दयानंद सरगडे यांना शिरवडे रस्त्यावर रात्री साडे नऊच्या सुमारास एका महिलेने हात केला. एवढ्या रात्रीची एक महिला रस्त्यावर आल्याने सरगडे यांना शंका आली त्यांनी न थांबता गाडीचा वेग वाढवला. त्यामुळे महिलेने आपल्या दुसऱ्या हातात असलेल्या दांडक्याने सरगडे यांच्यावर जोरदार प्रहार केला. हा प्रहार त्यांच्या डोक्यावर होणार होता. मात्र ते वाकल्यामुळे त्यांच्या पाठीवर बसला.

या प्रकाराबरोबरच कोपर्डे गावातील लहान मुलांबाबतही असा प्रकार घडल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही मुलंही महिलेनेच अस केल्याचे सांगत आहेत. अशाप्रकारच्या अनेक चर्चा या परिसरात सध्या सुरु आहेत. लोक रात्र-रात्र जागून गस्त घालत आहेत. मात्र अफवाच खूप असल्याच समोर आलं आहे.

पोलिसांनी बंदोबस्तही वाढवलाय आणि असा प्रकार घडल्यास तातडीने पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, या सर्व प्रकारामुळे कराड तालुक्यात भितीचे वातावरण आहे. शेती पंपासाठी लागणारी थ्री फेज वीज रात्रीच असल्याने शेतकरी रात्रभर जागेच असतात. मात्र गेल्या आठवड्यापासून रात्री शेतात जाण्याच धाडस शेतकरी करत नाहीत. यामुळे या दहशतीचा फटका शेतीलाही बसला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.