
पावसाळा सुरू झाला की वातावरणात गारवा आणि आर्द्रता निर्माण होत असते. त्यामुळे आपण दिवसभरात पाणी खूप कमी प्रमाणात पित असतो. तर काहींना या दिवसात पाण्याअभावी किंवा हवामानातील आर्द्रतेमुळे जास्त घाम येतो, त्यामुळे एखाद्याला डिहायड्रेशनची समस्या सतावते. पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेमुळे पाणी प्यावसे वाटत नसले तरी दिवसभर योग्य प्रमाणात पाणी पित राहणे गरजेचं आहे. अशातच जर कोणी दिवसभर पुरेसे पाणी पीत नसेल तर त्याचा त्यांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो.
दिवसातून किती पाणी पिणे योग्य आहे हे तुमच्या दिनचर्येवर आणि ॲक्टिव्हिटीवर अवलंबून असले तरी तुम्ही निर्धारित प्रमाणापेक्षा कमी पाणी प्यायले तर शरीर योग्यरित्या कार्य करू शकत नाही. यामुळे हृदयावरही वाईट परिणाम होतो. जर कोणत्याही कारणास्तव तुम्ही दिवसा पुरेसे द्रवपदार्थ घेऊ शकत नसाल तर रात्री डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. तर शरीरातील पाण्याची कमतरता या उपायांच्या मदतीने पूर्ण केली जाऊ शकते. कशी ते आजच्या या लेखात जाणून घेऊयात…
दिवसभर फक्त पाणी पिणे म्हणजे हायड्रेटेड राहणे नाही. जर तुम्ही इतर कोणत्याही स्वरूपात द्रवपदार्थ घेतले तर त्याचा कमतरता देखील पूर्ण होऊ शकतो. काकडी, टोमॅटो, द्राक्षे, टरबूज, शिमला मिरची, संत्री , दही, सूप आणि स्मूदी यासारख्या फळे आणि भाज्यांसोबतच पाण्याची कमतरता देखील पूर्ण करू शकतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)