AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील सर्वात गोड फळ तरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी ठरतो फायदेशीर

Benefits of Figs : अंजीर हे अतिशय गोड फळ असले तरी त्याचा मधुमेहाच्या रुग्णांवर विपरीत परिणाम होत नाही. रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी अंजीरचा उपयोग होतो, अंजीर या फळापासून अनेक आरोग्याचे फायदे होतात. अंजीर खाल्ल्याने कोणते फायदे होतात हे जाणून घ्या.

जगातील सर्वात गोड फळ तरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी ठरतो फायदेशीर
| Edited By: | Updated on: Feb 12, 2024 | 6:46 PM
Share

Benefits of Anjir : गोड फळे खाण्यासाठी सगळ्यांनाच आवडतात. पण तुम्हाला माहिती आहे का की, जगातील सर्वात गोड फळांच्या यादीत अंजीरचा देखील समावेश आहे. अंजीर हे गोड असले तरी ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. अंजीर खाण्याचे अनेक मोठे फायदे आहेत. अंजीरमध्ये फायबर, तांबे, मॅग्नेशियम, पोटॅशियम, रिबोफ्लेविन, थायामिन, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते. अंजीरमध्ये अनेक महत्त्वाचे घटक आढळतात. गोड असूनदेखील ते मधुमेह दूर करण्यास मदत करतात. अंजीरचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम असतो, म्हणजेच ते खाल्ल्याने रक्तातील ग्लुकोज वेगाने वाढत नाही.

आपल्या शरीराला उर्जा हवी असेल तर आपल्याला ग्लुकोजची आवश्यकता असते. पण जेव्हा याचेच प्रणाण वाढू लागते. तेव्हा मधुमेहासारखे आजार होतात. त्यामुळे मधुमेहामध्ये रक्तातील ग्लुकोज कमी ठेवण्यासाठी अंजीर खावे. अंजीर हे पौष्टिक ड्रायफ्रूट आहे. अंजीरच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. रक्तातील अतिरिक्त ग्लुकोज काढून टाकण्याची क्षमता अंजीरमध्ये असते.

अंजीरमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो

अंजीर हे फळ म्हणून खाल्ले तर त्याचा आरोग्यासाठी चांगला फायदा होतो. ताज्या अंजीरचा ग्लायसेमिक इंडेक्स सुमारे 51 आणि वाळलेल्या अंजीरांचा ग्लायसेमिक इंडेक्स सुमारे 61 असतो. हे कमी ते मध्यम GI श्रेणीत येते. असे पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच ग्लुकोजची पातळी वाढत नाही.

पोटाच्या आजारांचा शत्रू

जर पोटाशी संबंधित कोणतीही समस्या असतील तर अंजीर खालले पाहिजे. पोट व्यवस्थित साफ होत नसेल किंवा बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या समस्या असतील तर त्यांनी अंजीर खालले पाहिजे. अंजीरमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे साखरेचे चयापचय मंदावते. अंजीर खाल्ल्याने रक्तातील साखर अचानक वाढत नाही. यामुळे पचनशक्ती मजबूत होते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.

अंजीर पाण्यात भिजवून खाण्याचे फायदे

अंजीर जर तुम्ही पाण्यात भिजवून खालले तर तुम्हाला याचा दुप्पट फायदा मिळू शकतो. भिजवलेले अंजीर खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. यामुळे अंजीर अतिशय मऊ बनते जे सहज पचवता येते. अंजीर खाल्ल्याने शरीराला भरपूर पोषण मिळते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.