AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील सर्वात गोड फळ तरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी ठरतो फायदेशीर

Benefits of Figs : अंजीर हे अतिशय गोड फळ असले तरी त्याचा मधुमेहाच्या रुग्णांवर विपरीत परिणाम होत नाही. रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी अंजीरचा उपयोग होतो, अंजीर या फळापासून अनेक आरोग्याचे फायदे होतात. अंजीर खाल्ल्याने कोणते फायदे होतात हे जाणून घ्या.

जगातील सर्वात गोड फळ तरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी ठरतो फायदेशीर
| Edited By: | Updated on: Feb 12, 2024 | 6:46 PM
Share

Benefits of Anjir : गोड फळे खाण्यासाठी सगळ्यांनाच आवडतात. पण तुम्हाला माहिती आहे का की, जगातील सर्वात गोड फळांच्या यादीत अंजीरचा देखील समावेश आहे. अंजीर हे गोड असले तरी ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. अंजीर खाण्याचे अनेक मोठे फायदे आहेत. अंजीरमध्ये फायबर, तांबे, मॅग्नेशियम, पोटॅशियम, रिबोफ्लेविन, थायामिन, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते. अंजीरमध्ये अनेक महत्त्वाचे घटक आढळतात. गोड असूनदेखील ते मधुमेह दूर करण्यास मदत करतात. अंजीरचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम असतो, म्हणजेच ते खाल्ल्याने रक्तातील ग्लुकोज वेगाने वाढत नाही.

आपल्या शरीराला उर्जा हवी असेल तर आपल्याला ग्लुकोजची आवश्यकता असते. पण जेव्हा याचेच प्रणाण वाढू लागते. तेव्हा मधुमेहासारखे आजार होतात. त्यामुळे मधुमेहामध्ये रक्तातील ग्लुकोज कमी ठेवण्यासाठी अंजीर खावे. अंजीर हे पौष्टिक ड्रायफ्रूट आहे. अंजीरच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. रक्तातील अतिरिक्त ग्लुकोज काढून टाकण्याची क्षमता अंजीरमध्ये असते.

अंजीरमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो

अंजीर हे फळ म्हणून खाल्ले तर त्याचा आरोग्यासाठी चांगला फायदा होतो. ताज्या अंजीरचा ग्लायसेमिक इंडेक्स सुमारे 51 आणि वाळलेल्या अंजीरांचा ग्लायसेमिक इंडेक्स सुमारे 61 असतो. हे कमी ते मध्यम GI श्रेणीत येते. असे पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच ग्लुकोजची पातळी वाढत नाही.

पोटाच्या आजारांचा शत्रू

जर पोटाशी संबंधित कोणतीही समस्या असतील तर अंजीर खालले पाहिजे. पोट व्यवस्थित साफ होत नसेल किंवा बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या समस्या असतील तर त्यांनी अंजीर खालले पाहिजे. अंजीरमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे साखरेचे चयापचय मंदावते. अंजीर खाल्ल्याने रक्तातील साखर अचानक वाढत नाही. यामुळे पचनशक्ती मजबूत होते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.

अंजीर पाण्यात भिजवून खाण्याचे फायदे

अंजीर जर तुम्ही पाण्यात भिजवून खालले तर तुम्हाला याचा दुप्पट फायदा मिळू शकतो. भिजवलेले अंजीर खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. यामुळे अंजीर अतिशय मऊ बनते जे सहज पचवता येते. अंजीर खाल्ल्याने शरीराला भरपूर पोषण मिळते.

Follow Us
विश्व मराठी साहित्य संमेलन: मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
विश्व मराठी साहित्य संमेलन: मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती.
निर्दोष मुक्तता अन् अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर!
निर्दोष मुक्तता अन् अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर!.
कांद्याच्या भावात घसरण; नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक!
कांद्याच्या भावात घसरण; नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक!.
जालन्यात अतिक्रमणावर पालिका प्रशासनाचा हतोडा
जालन्यात अतिक्रमणावर पालिका प्रशासनाचा हतोडा.
अखेर माकपचा लाँग मार्च यशस्वी! महत्त्वाच्या मागण्यांना सरकारची मंजुरी
अखेर माकपचा लाँग मार्च यशस्वी! महत्त्वाच्या मागण्यांना सरकारची मंजुरी.
जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी
जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी.
रोहित पवारांनी घेतली संजय शिरसाटांची भेट; एकनाथ शिंदेंनाही भेटणार
रोहित पवारांनी घेतली संजय शिरसाटांची भेट; एकनाथ शिंदेंनाही भेटणार.
लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय होतोय! गणेश नाईकांचा आरोप
लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय होतोय! गणेश नाईकांचा आरोप.
कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर? विधानसभेत अनिल परब यांचा प्रश्न
कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर? विधानसभेत अनिल परब यांचा प्रश्न.
अजित पवारांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंचा प्रश्न
अजित पवारांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंचा प्रश्न.