AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अल्जायमर ते कॅन्सर, गंभीर रोगांवर रामबाण उपाय, काळा लसूण खा, आजाराला गुड बाय म्हणा

लसूणामध्ये अनेक गुणकारी गुणधर्म असतात. पण सफेद लसूणच्या वासाने अनेकांना खूप त्रास होतो. या लोकांसाठी काळा लसूण हा उत्तम पर्याय आहे. लसूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

अल्जायमर ते कॅन्सर, गंभीर रोगांवर रामबाण उपाय, काळा लसूण खा, आजाराला गुड बाय म्हणा
black garlic
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Oct 20, 2021 | 11:08 AM
Share

मुंबई : लसूणामध्ये अनेक गुणकारी गुणधर्म असतात. पण सफेद लसूणच्या वासाने अनेकांना खूप त्रास होतो. या लोकांसाठी काळा लसूण हा उत्तम पर्याय आहे. लसूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. लसूण अन्नाची चव वाढवण्यास मदत करते. पण काही लोकांना लसणाचा वास आवडत नाही, म्हणून ते त्याचे सेवन करत नाहीत आणि त्याच्या असंख्य फायद्यांपासून दूर राहतात. अशा लोकांसाठी काळा लसूण हा उत्तम पर्यय असू शकतो.

काळा लसूण हा पांढऱ्या लसूणावर प्रक्रियाकरुन तयार केला जातो. या प्रक्रियेमध्ये लसूणाचा उग्रवास निघून जातो. लसूणावर केलेल्या प्रक्रियेमुळे या लसणात अँटीऑक्सिडंट्स निर्माण होतात. त्यामुळे या लसणाचे फायदे मोठ्या प्रमाणात वाढतात. या लसूनाचे नियमित सेवन केल्याने व्यक्ती अल्झायमरपासून कर्करोगापर्यंत सर्व धोकादायक आजारांपासून स्वतःचे रक्षण करू शकते.

काळ्या लसणाचे फायदे

कर्करोगापासून संरक्षण करते

एका संशोधनात असे निश्पन्न झाले आहे की जर काळे लसूण रोज रिकाम्या पोटी खाल्ले तर रक्त कर्करोगाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. एवढेच नाही तर जर या समस्यांनी ग्रस्त असलेले लोक नियमितपणे काळे लसूण खातात, तर ते त्यांच्या उपचारात सकारात्मक परीणाम होतो.

यकृतासाठी उपयुक्त

यकृताच्या समस्यांमुळे शरीराला अनेक गंभीर परिणामही भोगावे लागतात. त्यामुळे आपले यकृत निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. काळा लसूण यासाठी खूप चांगला मानला जातो. त्याच्या नियमित सेवनाने यकृत डिटॉक्सिफाय होत राहते आणि यकृताला कोणतेही नुकसान होत नाही.

हृदय ठेवणे

जर तुम्हाला हृदयाचे आजार टाळायचे असतील तर रोज सकाळी रिकाम्या पोटी काळे लसूण खाण्यास सुरुवात करा. हे शरीरातून खराब कोलेस्टेरॉल काढून टाकते आणि बीपी सामान्य ठेवण्यात मदत करते. यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.

रोगप्रतिकार शक्ती वाढवते

काळा लसूण शरीराच्या पेशींवर नियंत्रण ठेवून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो. यामुळे रोगांशी लढण्याची शक्ती व्यक्तीच्या आत वाढते आणि तो लवकर आजारी पडत नाही.

अल्झायमर प्रतिबंध

काळा लसूण एक सुपरफूड मानला जातो, कारण त्यात शरीरातून मनापर्यंत समस्या दूर करण्याची शक्ती असते. याचे सेवन केल्याने अल्झायमर आणि डिमेंशियासारख्या समस्या टाळल्या जावू शकतात.

इतर बातम्या :

6 देशांत रहा, व्यवसाय करा आणि 20 लाख मिळवा, तुमच्यासाठी भन्नाट ऑफर

Mental Fitness : तीक्ष्ण आणि निरोगी मेंदूसाठी ‘हे’ पदार्थ आहारात समाविष्ट करा!

Olive Oil Benefits : ऑलिव्ह ऑईल केसांसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा सविस्तर! 

Follow Us
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?