AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात दररोज सकाळी या पद्धतीने प्या नारळ पाणी, तुम्हाला मिळतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

उन्हाळा आपल्यासोबत अनेक आरोग्य समस्या घेऊन येतो. हे हंगामी आजार टाळण्यासाठी लोकं वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खातात आणि पितात. जर तुम्हालाही तुमचे आरोग्य टिकवायचे असेल तर तुमच्या आहारात नारळ पाण्याचा समावेश करा. त्याचे काही आश्चर्यकारक आरोग्य फायदे आपण जाणून घेऊया.

उन्हाळ्यात दररोज सकाळी या पद्धतीने प्या नारळ पाणी, तुम्हाला मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे
| Edited By: | Updated on: May 03, 2025 | 1:37 PM
Share

उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे. आता या वाढत्या तापमानात आपले शरीर थंड ठेवणे खूप महत्वाचे आहे. कारण हळूहळू उष्णता वाढल्यामुळे आपल्याला अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. याकरिता उष्मघातापासून बचाव करण्यासाठी काहीजण त्यांच्या आहारात वेगवेगळ्या प्रकारचे थंड पेये पितात. ज्यामध्ये नारळपाणी देखील समाविष्ट असते. कारण नारळपाणी शरीराला थंड ठेवण्यासाठी नैसर्गिक पेय म्हणून काम करते.

उन्हाळ्यात लोकं शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि थंड ठेवण्यासाठी नारळ पाण्याचे सेवन करतात. पण नारळपाणी हे शरीर थंड ठेवण्यापुरते मर्यादित नाही. जर तुम्ही उन्हाळ्यात दररोज सकाळी नारळ पाणी प्यायले तर तुम्हाला त्याचे 6 आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात. चला जाणून घेऊया या 6 आरोग्यदायी फायद्यांबद्दल.

शरीर हायड्रेटेड ठेवा

उन्हाळ्यात घामामुळे शरीर खूप लवकर डिहायड्रेट होते. पण नारळ पाणी हे शरीराला हायड्रेट करण्यासाठी सर्वोत्तम पेयांपैकी एक आहे. हे इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजांनी समृद्ध आहे जे शरीराला पाण्याच्या कमतरतेमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवते. यासाठी तुम्ही सुद्धा उन्हाळ्यात नारळपाण्याचे सेवन नक्की करा.

तुमची पचनसंस्था चांगली होते

नारळाच्या पाण्यात कॅटालेस, पेरोक्सिडेस सारखे बायोटिक एंजाइम आढळतात. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. नारळपाण्याच्या सेवनाने तुमचे पोट फुगणे, आम्लपित्त आणि बद्धकोष्ठता यासारख्या पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम देण्यास देखील मदत करते. रिकाम्या पोटी ते सेवन करणे अधिक प्रभावी आहे.

तुमचे शरीर डिटॉक्स करा

नारळपाणी यामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट तत्व आणि हायड्रेटिंग गुणधर्मांमुळे नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करते. दररोज सकाळी याचे सेवन केल्याने रात्रभर शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते.

वजन कमी करण्यास उपयुक्त

जर तुम्ही या उन्हाळ्यात वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर नारळ पाणी तुम्हाला यामध्ये मदत करू शकते. नारळाच्या पाण्यात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे त्याचे सेवन वजन नियंत्रित करण्यास मदत करते. तसेच, त्यात फॅट सुद्धा नसते.

त्वचेसाठी फायदेशीर

उन्हाळ्यात त्वचा खूपच निर्जीव होते. पण जर तुम्ही दररोज सकाळी नारळ पाणी प्यायले तर ते तुमची त्वचा चमकदार आणि निरोगी बनवते. नारळाच्या पाण्यातील अँटीऑक्सिडंट गुणधर्म त्वचेला आतून निरोगी बनवतात.

रक्तदाब नियंत्रित करा

रक्तदाबाच्या रुग्णांसाठीही नारळ पाणी फायदेशीर आहे. नारळाच्या पाण्यात पोटॅशियम आढळते. जे सोडियम काढून टाकण्यास मदत करते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.