
मुंबई : एकट्याने आयुष्य जगण हे फार कठीण असतं असं आपण बऱ्याचदा बोलतो. त्यामुळेत आपल्याकडे विवाह (Relation Tips) संस्थेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मुलगा मुलगी लग्नाच्या वयात आले की घरची मोठी मंडळी त्यांच्या लग्नाच्या बाबतीत चर्चा सुरू करतात, कारण त्यांनी चार उन्हाळे पावसाळे पाहिलेले असतात. जीवन जगण्यासाठी जोडीदार किती महत्त्वाचा असतो याची त्यांना अनुभूती असते. एखादे नाते जुळणे जितके महत्त्वाचे असते तीतकेच ते टिकणे देखील महत्त्वाचे आहे. नाते टिवण्यासाठी पुढाकार घेणारे सध्याच्या काळात फार कमी झाले आहे. नात्यातला ‘इगो फॅक्टर’ हा एखादी वाळवी लागल्यासारखे नात्याला पोखरत जातो आणि अनेक जण घटस्फोटाच्या किंवा नातं तोडण्याच्या उंबरठ्यावर येऊन थांबतात.
समुपदेशक शितल देशमुख यांच्या मते हे सगळ टाळता येणं शक्य आहे. प्रत्त्येक नात्याला त्याच्या सिमारेषा म्हणजेच रिलेशनशीप बॉन्ड्रीज असतात. त्या जपण फार महत्त्वाचं आहे. आज आपण अशाच पाच सिमारेषांवर आणि नात्यातल्या काही नाजुक घटकांवर प्रकाश टाकूया.
लैंगिक सीमा- कोणत्याही नातेसंबंधात निरोगी आणि सहमतीपूर्ण लैंगिक सीमा असणे खूप महत्वाचे आहे. जोडीदाराला सुरक्षित वाटण्यासाठी नातेसंबंधात संवाद, संमती आणि लैंगिक सीमा असणे अत्यंत आवश्यक आहे.
डिजिटल सीमा – लोकं शारीरिकदृष्ट्या कसे एकत्र असतात परंतु भावनिक आणि मानसिकदृष्ट्या कसे वेगळे असतात याबद्दल आपण बरेच काही ऐकले आहे आणि याचे एक कारण डिजिटलायझेशन आहे. कोणत्याही नातेसंबंधात, तंत्रज्ञानाच्या वापराबाबत तुम्ही काही सीमा निश्चित करणे महत्त्वाचे आहे. याव्यतिरिक्त, भागीदारांनी एकमेकांच्या वैयक्तिक डिजिटल जागेत हस्तक्षेप करू नये हे देखील महत्त्वाचे आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)